शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डी हाच आपला ‘आत्मा’

By admin | Updated: July 14, 2014 22:56 IST

कबड्डी दिन विशेष : शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू सीताराम तायडे यांचे मत

खामगाव : कुठल्याही चांगल्या गोष्टीवर प्रेम केल्यास त्या गोष्टीतून, खेळातून भगवंतांची प्राप्ती होते. प्रामाणिकपणे कबड्डीचा ध्यास घेतला.. कबड्डीनेच मला घडविले.. माझ्या कुटूंबाला सावरले..त्यामुळे कबड्डी हा खेळच आपला आत्मा असल्याचे मत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी पटू सीताराम तायडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. कबड्डी दिवसाच्या पुर्व संध्येला त्यांना बोलते केले असता, त्यांनी कबड्डी विषयी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. कबड्डी या खेळातच आपल्याला भगवंताचे दर्शन होते. कबड्डीच्या सातत्यपूर्ण उच्चारामुळे प्राणायमाचे धडेही मिळतात. त्यामुळे कबड्डी हा आपला आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले. मैदानी खेळातून शरीर निरोगी राहू शकते. निरोगी शरिरातच भगवंताचा वास असतो. प्रत्येक शुभ कार्यात भगवंत आहे. प्रदुषण आणि रासायनिक खतांच्या अन्न धान्यापासून मैदानी खेळच वाचवू शकतात. टिव्ही आणि इंटरनेटच्या जमान्यात मैदानी खेळाची नाळं तुटता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

** कष्ट केल्या निश्‍चित फलश्रृती!

जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकता हीच यशाची त्रिसुत्री आहे. या त्रिसुत्रीनेच जीवनात यशस्वी झालो. माझ्या यशात पत्नी गीता आणि माझ्यावर प्रेम करणार्‍या असंख्य खेळाडूंचा वाटा आहे. कबड्डीनेच आपणास नोकरी दिली, कुटूंब सावरले. त्यामुळे माझ्या मुलींसह मुलांनीही या क्षेत्रात वाहून घेतले आहे. कबड्डीमुळेच मुलगा पंकज नागपूर येथे पीएसआय होवू शकला. आपण धडे दिलेले आतापर्यंत २५0 (कबड्डीपटू )मुलं कबड्डीमुळे विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. यामध्ये पोलिस, वीज वितरण कंपनी, एसटी महामंडळ या सारख्या सेवेत कार्यरत आहेत. १३ मुलींनीही (महिला) कबड्डीतून आपले करिअर घडविले असून मानस कन्या कु. शारदा घोगरे दारूबंदी पोलिस म्हणून कार्यरत आहे.

** 'कबड्डी बोलो कबड्डी' या शब्दांनीच निरोप द्यावा!

मानवी जीवनात मृत्यू हा शाश्‍वत आहे. प्रत्येक चांगल्या कार्यात ह्यरामह्ण आहे. त्यामुळे माझा मृत्यू झाल्यानंतर 'राम बोलो भाई राम' याऐवजी ह्यकबड्डी बोलो भाई कबड्डीह्ण या शब्दांनीच मला निरोप द्यावा, अशीच आपली अंतिम इच्छा आहे. कुठलाही संकोच न करता माझ्या अंत्ययात्रेतील प्रत्येकाने 'कबड्डी बोलो भाई कबड्डी' या शब्दांनी निरोप देणे, हाच माझ्या कार्याचा, कबड्डीवरील प्रेमाचा गौरव ठरेल! असेही ते शेवटी म्हणाले.

** सीताराम तायडे यांचा कबड्डीचा प्रवास

१९५७ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड, १९६0 मध्ये भारतीय संघात श्रीलंका दौर्‍यासाठी निवड,१९६१ मध्ये न्यूईरा शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून रूजू,१९६१ अंबिका क्रीडा मंडळाची स्थापना, १९६२-१९७५ कबड्डी पटू म्हणून विविध ठिकाणी सहभाग, १९७५-२0१२ कबड्डी पंच, १९८२ मध्ये एशियाड स्पर्धेचे राज्यातील एकमेव पंच, २00५ मध्ये लोकमतच्या वर्धापनीदिनी सत्कार, २00७-0८ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, २00७ खामगाव प्रेस क्लबचा जीवनगौरव पुरस्कार.