शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
5
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
6
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
8
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
9
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
10
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
11
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
12
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
13
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
14
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
15
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
16
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
17
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
18
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
19
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
20
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग

कबड्डी हाच आपला ‘आत्मा’

By admin | Updated: July 14, 2014 22:56 IST

कबड्डी दिन विशेष : शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डीपटू सीताराम तायडे यांचे मत

खामगाव : कुठल्याही चांगल्या गोष्टीवर प्रेम केल्यास त्या गोष्टीतून, खेळातून भगवंतांची प्राप्ती होते. प्रामाणिकपणे कबड्डीचा ध्यास घेतला.. कबड्डीनेच मला घडविले.. माझ्या कुटूंबाला सावरले..त्यामुळे कबड्डी हा खेळच आपला आत्मा असल्याचे मत शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कबड्डी पटू सीताराम तायडे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. कबड्डी दिवसाच्या पुर्व संध्येला त्यांना बोलते केले असता, त्यांनी कबड्डी विषयी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. कबड्डी या खेळातच आपल्याला भगवंताचे दर्शन होते. कबड्डीच्या सातत्यपूर्ण उच्चारामुळे प्राणायमाचे धडेही मिळतात. त्यामुळे कबड्डी हा आपला आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले. मैदानी खेळातून शरीर निरोगी राहू शकते. निरोगी शरिरातच भगवंताचा वास असतो. प्रत्येक शुभ कार्यात भगवंत आहे. प्रदुषण आणि रासायनिक खतांच्या अन्न धान्यापासून मैदानी खेळच वाचवू शकतात. टिव्ही आणि इंटरनेटच्या जमान्यात मैदानी खेळाची नाळं तुटता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

** कष्ट केल्या निश्‍चित फलश्रृती!

जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकता हीच यशाची त्रिसुत्री आहे. या त्रिसुत्रीनेच जीवनात यशस्वी झालो. माझ्या यशात पत्नी गीता आणि माझ्यावर प्रेम करणार्‍या असंख्य खेळाडूंचा वाटा आहे. कबड्डीनेच आपणास नोकरी दिली, कुटूंब सावरले. त्यामुळे माझ्या मुलींसह मुलांनीही या क्षेत्रात वाहून घेतले आहे. कबड्डीमुळेच मुलगा पंकज नागपूर येथे पीएसआय होवू शकला. आपण धडे दिलेले आतापर्यंत २५0 (कबड्डीपटू )मुलं कबड्डीमुळे विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. यामध्ये पोलिस, वीज वितरण कंपनी, एसटी महामंडळ या सारख्या सेवेत कार्यरत आहेत. १३ मुलींनीही (महिला) कबड्डीतून आपले करिअर घडविले असून मानस कन्या कु. शारदा घोगरे दारूबंदी पोलिस म्हणून कार्यरत आहे.

** 'कबड्डी बोलो कबड्डी' या शब्दांनीच निरोप द्यावा!

मानवी जीवनात मृत्यू हा शाश्‍वत आहे. प्रत्येक चांगल्या कार्यात ह्यरामह्ण आहे. त्यामुळे माझा मृत्यू झाल्यानंतर 'राम बोलो भाई राम' याऐवजी ह्यकबड्डी बोलो भाई कबड्डीह्ण या शब्दांनीच मला निरोप द्यावा, अशीच आपली अंतिम इच्छा आहे. कुठलाही संकोच न करता माझ्या अंत्ययात्रेतील प्रत्येकाने 'कबड्डी बोलो भाई कबड्डी' या शब्दांनी निरोप देणे, हाच माझ्या कार्याचा, कबड्डीवरील प्रेमाचा गौरव ठरेल! असेही ते शेवटी म्हणाले.

** सीताराम तायडे यांचा कबड्डीचा प्रवास

१९५७ मध्ये नागपूर विद्यापीठाच्या आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड, १९६0 मध्ये भारतीय संघात श्रीलंका दौर्‍यासाठी निवड,१९६१ मध्ये न्यूईरा शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून रूजू,१९६१ अंबिका क्रीडा मंडळाची स्थापना, १९६२-१९७५ कबड्डी पटू म्हणून विविध ठिकाणी सहभाग, १९७५-२0१२ कबड्डी पंच, १९८२ मध्ये एशियाड स्पर्धेचे राज्यातील एकमेव पंच, २00५ मध्ये लोकमतच्या वर्धापनीदिनी सत्कार, २00७-0८ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, २00७ खामगाव प्रेस क्लबचा जीवनगौरव पुरस्कार.