शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

..तर बस वाहतूक बंद करा - हायकोर्ट

By admin | Updated: June 11, 2014 00:07 IST

बसमधील आपातकालीन खिडकी अपघातजन्य परिस्थितीत प्रवाशांना बाहेर पडण्या योग्य नसल्यास अशा बसची सेवा तात्काळ बंद करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले़

आपतकालीन खिडकी सुस्थितीत नसलेल्या बस तात्काळ बंद कराहायकोर्टाचे आदेश: ठिकठिकाणी तपासणी करामुंबई : बसमधील आपातकालीन खिडकी अपघातजन्य परिस्थितीत प्रवाशांना बाहेर पडण्या योग्य नसल्यास अशा बसची सेवा तात्काळ बंद करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले़न्या़ अभय ओक व न्या़ अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ बसमध्ये आपातकालीन खिडकी आहे की नाही तसेच एखादा प्रसंग ओढावल्यास प्रवासी त्यातून सुखरूप बाहेर पडू शकतात का हे केवळ चेकनाक्यांवर न तपासता ठिकठिकाणी याची तपासणी करावी़ या तपासणीत आपातकालीन खिडकी सुस्थितीत नसलेल्या बसची वाहतूक तात्काळ बंद करावी व या अटीची पूर्तता होईपर्यंत ती बस बंद ठेवा, असेही न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे़आपातकालीन खिडकी प्रवासी बाहेर पडण्याच्या स्थितीत नसल्याने काही दिवसांपूर्वी प्रवाशांचा बसला लागलेल्या आगती होरपळून मृत्यू झाला होता़ याची दखल घेत न्यायालय म्हणाले, अधिक प्रवासी घेण्याच्या स्वार्थामुळे आपातकालीन खिडकीजवळही प्रवासी बसलेले असतात़ याने अपघातजन्य परिस्थितीत प्रवाशांना तात्काळ बसबाहेर पडता येत नाही़ हे टाळण्यासाठी प्रत्येक बसमधील आपातकालीन खिडकी सुस्थितीत असणे आवश्यक आहे़याप्रकरणी पुणे येथील श्रीकांत कर्वे यांनी जनहित याचिका केली आहे़ वाहनांना न तपासताच फिटनेस सर्टिफीकेट दिले जाते़ हे वाढत्या अपघाताचे मूळ कारण असून याप्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी कर्वे यांनी याचिकेत केली आहे़ त्यात न्यायालयाने वरील आदेश दिले़ यासह एआरआयए या केंद्रीय संस्थेने आरटीओंना कोणतीही पूर्वकल्पना न देता भेट द्यावी व तेथे वाहनांची तपासणी केली जाते का हे तपासून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असे निर्देशही खंडपीठाने दिले़तसेच वाहन नीट तपासल्याशिवाय फिटनेस सर्टिफीकेट जारी करू नये व यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक निरीक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत़ यासह सर्व आरटीओंना वाहनांची चाचणी करण्यासाठी आवश्यक अत्याधुनिक यंत्र द्यावीत, सर्व आरटीओ संगणकाने जोडावीत व मुंबईप्रमाणे ऑनलाईन लर्निंग लायन्स सुविधा सर्व आरटीओंमध्ये सुरू करावी, असे आदेशही न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत़(प्रतिनिधी)