शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

पाच वर्षांत केवळ १३० प्राण्यांची वाढ

By admin | Updated: September 9, 2015 00:57 IST

दर वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला जंगलात प्राण्यांची जनगणना केली जाते. यात मानवी वस्त्यांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही प्राण्यांच्या आकडेवारीत घट होत असल्याचे समोर येत आहे.

- नामदेव पाषाणकर,  घोडबंदरदर वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला जंगलात प्राण्यांची जनगणना केली जाते. यात मानवी वस्त्यांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही प्राण्यांच्या आकडेवारीत घट होत असल्याचे समोर येत आहे. येऊर परिसरात २०१० मध्ये एकूण २५८ प्राण्यांची मोजदाद झाली होती. २०१५ मध्ये हा आकडा ३८८ वर पोहचला आहे. या पाच वर्षात प्राण्यांची संख्या १३० ने वाढली. मात्र वानर,भेकर,ससे यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे.येऊर परिसर जवळपास १५ हजार एकर जागेत विस्तारला आहे. यामध्ये पाचपाखाडी, कावेसर, मानपाडा, ओवळा, घोडबंदर, चेना, काशी, ससुनघर, नागला, सारजामोरी हा विभाग येत आहे. नैसिर्गक असलेल्या १५ पाणवठ्यांवर आणि ज्या जागेवर प्राणी येण्याची शक्यता असते तिथे पहारा देऊन वन कर्मचारी त्यांची गणती करतात. ती करताना सर्वच प्राणी त्या रात्री आढळतात, असे नाही. त्यामुळेच प्राप्त झालेल्या आकडेवारीत बराचसा फरक आढळत आहे. २०१० मध्ये वानर १०१, ससे २४, माकडे ४८, रानडुकर १६, सांबर १५, भेकर १३, मोर १५, उदमांजर १, रानमांजर १, बिबटे १० असे एकूण ३८८ प्राणी दिसून आले होते.2013-14 या आर्थिक वर्षात सस्तन प्राणी ४३, सरपटणारे प्राणी ३८, उभयचर प्राणी ९, पक्षी २५० असे एकूण ३४० प्राणी आढळले होते. २०१५ मध्ये झालेल्या गणनेत बिबटे २, वानर ६२, माकड १७१ , रानडुक्कर १५ सांबर १५, ,भेकर ३,मोर १, उदमांजर २, रानकोंबडी २९ ,रानमांजर ३,वटवाघुळ ३८, मुंगुस २२, चितळ २१, कोल्हे २, सर्प गरु ड २ अशा एकूण ३८८ प्राण्यांची आकडेवारी नोंद आहे. २०१५ च्या या गणनेत बिबटे कमी असल्याचे आढळले असले तरी ते कमी झाले नसून त्यांची संख्या वाढली असल्याचे वन अधिकारी संजय वाघमोडे यांनी सांगितले. उद्यानात जवळपास ५० च्या आसपास बिबटे असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.