शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

पाच वर्षांत केवळ १३० प्राण्यांची वाढ

By admin | Updated: September 9, 2015 00:57 IST

दर वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला जंगलात प्राण्यांची जनगणना केली जाते. यात मानवी वस्त्यांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही प्राण्यांच्या आकडेवारीत घट होत असल्याचे समोर येत आहे.

- नामदेव पाषाणकर,  घोडबंदरदर वर्षाच्या बुद्ध पौर्णिमेला जंगलात प्राण्यांची जनगणना केली जाते. यात मानवी वस्त्यांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील काही प्राण्यांच्या आकडेवारीत घट होत असल्याचे समोर येत आहे. येऊर परिसरात २०१० मध्ये एकूण २५८ प्राण्यांची मोजदाद झाली होती. २०१५ मध्ये हा आकडा ३८८ वर पोहचला आहे. या पाच वर्षात प्राण्यांची संख्या १३० ने वाढली. मात्र वानर,भेकर,ससे यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे.येऊर परिसर जवळपास १५ हजार एकर जागेत विस्तारला आहे. यामध्ये पाचपाखाडी, कावेसर, मानपाडा, ओवळा, घोडबंदर, चेना, काशी, ससुनघर, नागला, सारजामोरी हा विभाग येत आहे. नैसिर्गक असलेल्या १५ पाणवठ्यांवर आणि ज्या जागेवर प्राणी येण्याची शक्यता असते तिथे पहारा देऊन वन कर्मचारी त्यांची गणती करतात. ती करताना सर्वच प्राणी त्या रात्री आढळतात, असे नाही. त्यामुळेच प्राप्त झालेल्या आकडेवारीत बराचसा फरक आढळत आहे. २०१० मध्ये वानर १०१, ससे २४, माकडे ४८, रानडुकर १६, सांबर १५, भेकर १३, मोर १५, उदमांजर १, रानमांजर १, बिबटे १० असे एकूण ३८८ प्राणी दिसून आले होते.2013-14 या आर्थिक वर्षात सस्तन प्राणी ४३, सरपटणारे प्राणी ३८, उभयचर प्राणी ९, पक्षी २५० असे एकूण ३४० प्राणी आढळले होते. २०१५ मध्ये झालेल्या गणनेत बिबटे २, वानर ६२, माकड १७१ , रानडुक्कर १५ सांबर १५, ,भेकर ३,मोर १, उदमांजर २, रानकोंबडी २९ ,रानमांजर ३,वटवाघुळ ३८, मुंगुस २२, चितळ २१, कोल्हे २, सर्प गरु ड २ अशा एकूण ३८८ प्राण्यांची आकडेवारी नोंद आहे. २०१५ च्या या गणनेत बिबटे कमी असल्याचे आढळले असले तरी ते कमी झाले नसून त्यांची संख्या वाढली असल्याचे वन अधिकारी संजय वाघमोडे यांनी सांगितले. उद्यानात जवळपास ५० च्या आसपास बिबटे असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.