शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

कोल्हापुरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत बस घुसली; दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 21:39 IST

सहा जखमी; संतप्त जमावाने बस पेटविली, पोलिसांचा सौम्य लाठीमार, बसचा ब्रेक निकामी झालाकोल्हापूर : कोल्हापुरातील गंगावेश परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस (कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) घुसल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन भाविक ठार झाले; तर सहाजण गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने केएमटी बसची ...

ठळक मुद्देसहा जखमी; संतप्त जमावाने बस पेटविली, पोलिसांचा सौम्य लाठीमार, बसचा ब्रेक निकामी झाला

सहा जखमी; संतप्त जमावाने बस पेटविली, पोलिसांचा सौम्य लाठीमार, बसचा ब्रेक निकामी झालाकोल्हापूर : कोल्हापुरातील गंगावेश परिसरात ताबूत विसर्जन मिरवणुकीत केएमटी बस (कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट) घुसल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन भाविक ठार झाले; तर सहाजण गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने केएमटी बसची तोडफोड करून ती पेटविली, तर अग्निशामकच्या दोन गाड्यांचीही मोडतोड केली. संतप्त जमावाला रोखणे पोलिसांना अवघड झाल्याने जलद कृती दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या. बसचा ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.तानाजी भाऊ साठे (वय ५०), सुजल भानुदास अवघडे (१५, रा. राजारामपुरी तिसरी गल्ली, मातंग वसाहत, कोल्हापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. जखमींमध्ये अमर रामा कवाळे, स्वप्निल सुनील साठे, सचिन दत्ता साठे, आकाश तानाजी साठे, संदीप तानाजी साठे, साहील घाटगे (सर्व रा. राजारामपुरी, कोल्हापूर) यांचा समावेश आहेत.रविवारी सायंकाळी ताबूत, पंजे विसर्जन मिरवणूक पारंपरिक थाटात सुरू होती. पापाची तिकटी, गंगावेशमार्गे हे पंजे पंचगंगा नदीकडे प्रयाण करीत होते. याचवेळी विसर्जन मिरवणुकीमुळे या मार्गावर प्रचंड गर्दी होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पापाची तिकटीहून घसरतीला केएमटी बस जात असताना ती विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीत घुसली. यामुळे परिसरात हाहाकार उडाला. या दुर्घटनेत दोन भाविक जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींंना नागरिकांनी तातडीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. संतप्त जमावाने केएमटी बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवून बसची तोडफोड केली. त्यानंतर काही वेळात ही बस पेटवून दिली. प्राथमिक तपासात केएमटी बसचा ब्रेक निकामी झाल्याची माहिती आहे.जमाव इतका प्रक्षुब्ध झाला की, त्यांनी त्या ठिकाणी आलेल्या पोलिसांवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार केला; पण जमावाचा संताप वाढत चालला होता. पेटविलेली केएमटी बस विझविण्यासाठी घटनास्थळी आलेल्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्यांवरही जमावाने हल्ला चढवून या गाड्यांचीही मोडतोड केली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले होते.