शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

जीवनविद्या मिशनचा गुरुपौर्णिमा सोहळा

By admin | Updated: July 15, 2017 03:05 IST

वामनराव पै यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ३ ते ९ जुलैदरम्यान कर्जत येथील जीवनविद्या ज्ञानपीठाच्या पुण्यस्थळी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जीवनविद्या मिशनच्या वतीने सद्गुरू वामनराव पै यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ३ ते ९ जुलैदरम्यान कर्जत येथील जीवनविद्या ज्ञानपीठाच्या पुण्यस्थळी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव संपन्न झाला. दर दिवशी राज्यातील विविध ठिकाणांहून तीन ते चार हजार नामधारक ज्ञानपीठात येत होते. त्यांची व्यवस्था करण्यासाठी जीवनविद्या मिशनचे युवा नामधारक १५ दिवस अगोदरपासूनच सज्ज झाले होते. संपूर्ण नियोजन शिस्तबद्धरीतीने करण्यात आले. यासाठी सुरक्षा, स्वच्छता, किचन, पार्किंग, आयटी/टेक्निकल, सभागृह व्यवस्था अशा विविध समिती कार्यरत होत्या. सभामंडपात विविध स्टॉल लावण्यात आले होते. त्याद्वारे नामधारकांना अवयवदान अभियान, वृक्षारोपण अभियान, ग्राम समृद्धी अभियान याची माहिती देण्यात येत होती. ‘करावी पूजा मनेची उत्तम... लौकिकाचे तिथे काय काम’ या संत उक्तीवर आधारित वामनराव पै यांनी मानसपूजेची निर्मिती केली. अशी मानसपूजा ज्येष्ठ नामधारक सर्व नामधारकांकडून करून घेत होते. या वेळी शिवाजीराव पालव, शीतल गोरे, संतोष तोत्रे, वंदना बेल्हे, भरत पिंगळे, नामदेव मिरगुले, शंकर बांदकर यांनी मार्गदर्शन केले. प्रल्हाद पै यांनी मानवी संस्कृतीचे संस्कार-समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि कृतज्ञता याविषयी ७ दिवस मार्गदर्शन केले.>प्रथम पारितोषिक जीवनविद्या ज्ञानपीठाला वास्तुरचनेसाठी आणि पर्यावरणाला अनुकूल अशा सुंदर लँडस्केपिंगसाठी ‘दिल्ली आर्किटेक्चर फेस्टिव्हल २०१६’चे प्रथम पारितोषिक मिळाले. हे प्रशंसापत्रक देण्यासाठी वास्तुविद्याविशारद रोहित सिंकरे उपस्थित होते. त्यांनी हे प्रशंसापत्रक प्रल्हाद दादांना सुपुर्द केले.>सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी...सुख, समाधान आणि शांती या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. त्यासाठी जीवनविद्या मिशनचे समाज उपयुक्त काम प्रेमाने केले पाहिजे. दृष्टी समतेची, कृती सभ्यतेची, वागणूक सामंजस्याची, वृत्ती सहिष्णुतेची, बैठक समाधानाची आणि युक्ती कृतज्ञतेची यालाच युक्तियोग म्हणतात. सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. मानवी संस्कृतीचे हे सहा संस्कार आत्मसात करून तुम्ही तुमचे जीवन सुखी आणि आनंदी करू शकता.- प्रल्हाद वामनराव पैअवयवदानजीवनविद्या मिशनचे सचिव विवेक बावकर यांनी अवयवदान अभियानात, आतापर्यंत ३ हजार अवयवदात्यांनी नोंदणी केल्याची माहिती दिली. अवयवदानाविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष दिलीप पटवर्धन यांनी अवयवदान म्हणजे जीवनदान या विषयावर मार्गदर्शन केले. वृक्षारोपणदोन लाख वृक्ष लागवड आणि त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प जीवनविद्या मिशनने केला आहे. जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै आणि इतर विश्वस्त यांनी कृतज्ञता दिनानिमित्ताने वृक्षारोपण करून लोकांसमोर आदर्श घालून दिला. ६० गावे दत्तक महाराष्ट्र सरकारच्या ग्राहक हक्क संरक्षण जनजागृती चळवळीमध्येही मिशनचा सहभाग जाहीर करण्यात आला. जीवन विद्या मिशनच्या हीरक महोत्सवी वर्षांतर्गत ६० गावे दत्तक घेऊन त्यांचा सर्वोतोपरी विकास करण्याचा निर्णय ग्राम समृद्धी अभियानांतर्गत घेतला होता. त्यांच्या विकासासाठी मिशनने जे योजनाबद्ध नियोजन केले आहे त्याचा तपशील देण्यात आला.बेटी बचाओ बेटी पढाओसद्गुरूंनी स्त्रीला नेहमीच आदराचे स्थान दिले आहे. याची दखल घेत भारत सरकारच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानात जीवनविद्या मिशनचा सहभाग आहे, असे या वेळी सांगण्यात आले.