शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

कल्याण-कर्जत ४ तास ठप्प

By admin | Updated: June 27, 2015 02:22 IST

मुसळधार पावसामुळे उल्हासनगर स्थानकादरम्यान डाऊन मार्गावरील रुळांखालची माती वाहून गेल्याने सुमारे १२ फूट खोल खड्डा पडला

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे उल्हासनगर स्थानकादरम्यान डाऊन मार्गावरील रुळांखालची माती वाहून गेल्याने सुमारे १२ फूट खोल खड्डा पडला. वरून तीन-चार फूट दिसणारा हा खड्डा अजून खोल असल्याचे रेल्वे अभियंत्यांच्या वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे कल्याण-कर्जत मार्गावरील लोकल सेवा पहाटे ५.४५ च्या सुमारास ठप्प झाली. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेने कल्याण-कर्जतची अप/डाऊनची वाहतूक बंद ठेवली होती. आठ दिवसात पाच वेळा मध्य रेल्वे विविध तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.प्रशासनाकडून युद्ध पातळीवर त्या खड्यात भराव टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. घटनास्थळी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसह अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. तांत्रिक विभागानेही गांभिर्याने तातडीने सर्व मदत यंत्रणा हालविली. प्रवाशांना ठिकठिकाणच्या स्थानकात उद्घोषणा यंत्राद्वारे घटनेबाबत सूचित करण्यात येत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वेला सहकार्य केल्याचे अंबरनाथ, बदलापूर, वांगणीसह कर्जतच्या प्रवाशांनी सांगितले. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या पुण्याकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय वाहतुकीचे तीनतेरा वाजले. सकाळीच ही घटना घडल्याने इंद्रायणीसह अन्य चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना त्याचा फटका बसला. अखेरीस सकाळी ९.१५ च्या सुमारास पहिली गाडी या मार्गावरुन बदलापूरच्या दिशेने धावली आणि हळूहळू रेल्वेसेवा रूळावर आली.