शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

कल्याण-कर्जत ४ तास ठप्प

By admin | Updated: June 27, 2015 02:22 IST

मुसळधार पावसामुळे उल्हासनगर स्थानकादरम्यान डाऊन मार्गावरील रुळांखालची माती वाहून गेल्याने सुमारे १२ फूट खोल खड्डा पडला

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे उल्हासनगर स्थानकादरम्यान डाऊन मार्गावरील रुळांखालची माती वाहून गेल्याने सुमारे १२ फूट खोल खड्डा पडला. वरून तीन-चार फूट दिसणारा हा खड्डा अजून खोल असल्याचे रेल्वे अभियंत्यांच्या वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातामुळे कल्याण-कर्जत मार्गावरील लोकल सेवा पहाटे ५.४५ च्या सुमारास ठप्प झाली. सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेने कल्याण-कर्जतची अप/डाऊनची वाहतूक बंद ठेवली होती. आठ दिवसात पाच वेळा मध्य रेल्वे विविध तांत्रिक कारणांमुळे खंडित झाल्याने चाकरमान्यांसह प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.प्रशासनाकडून युद्ध पातळीवर त्या खड्यात भराव टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. घटनास्थळी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांसह अन्य विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली. तांत्रिक विभागानेही गांभिर्याने तातडीने सर्व मदत यंत्रणा हालविली. प्रवाशांना ठिकठिकाणच्या स्थानकात उद्घोषणा यंत्राद्वारे घटनेबाबत सूचित करण्यात येत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वेला सहकार्य केल्याचे अंबरनाथ, बदलापूर, वांगणीसह कर्जतच्या प्रवाशांनी सांगितले. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या पुण्याकडे जाणाऱ्या आणि तेथून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय वाहतुकीचे तीनतेरा वाजले. सकाळीच ही घटना घडल्याने इंद्रायणीसह अन्य चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना त्याचा फटका बसला. अखेरीस सकाळी ९.१५ च्या सुमारास पहिली गाडी या मार्गावरुन बदलापूरच्या दिशेने धावली आणि हळूहळू रेल्वेसेवा रूळावर आली.