शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा लढत अटळ

By admin | Updated: May 8, 2017 04:12 IST

कर्जमुक्तीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत सांगितले. आम्ही दिल्लीला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्जमुक्तीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत सांगितले. आम्ही दिल्लीला गेलो, पण दिल्लीश्वरांनी हात वर केले. विधानसभेतील शब्द हा वचनाप्रमाणे असतो. एक महिना झाला; परंतु अजून काहीही झालेले नसल्याचे सांगत, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर लढत निश्चित आहे, असा अल्टीमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.मराठवाड्यातील ४६ विधानसभा मतदारसंघांत आमदार, नगरसेवकांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून तयार केलेला ग्राऊंड रिपोर्ट पक्षप्रमुख ठाकरे यांना सादर केला. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, सरकारचा पाठिंबा काढण्याबाबत हा दौरा नाही. कर्जमाफीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. पेरणीचा हंगाम आता सुरू होण्यात आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर पुन्हा वाढणार आहे. पहिले कर्ज तसेच राहणार आहे. मुख्यमंत्री म्हणतात मागेल त्याला कर्ज देऊ. परंतु पहिल्या कर्जातून त्यांना मुक्त करणे गरजेचे आहे. जिल्हा बँका मोडीत काढल्या आहेत. राष्ट्रीय बँका गावागावांत गेल्या असल्या तरी त्यांचे शेतकऱ्यांशी नाते नसल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेतून बाहेर पडणार नाहीहे अभियान निवडणुकीचा स्टंट नाही. माझ्या मार्गाने कर्जमुक्तीसाठी पुढे जाणार आहे. तीन वर्षांपासून वाटच पाहत आहोत. यापुढे मला जे वाटते ते करणार, माझ्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार. मी सत्तेला चिकटून राहिलेलो नाही. बऱ्याच वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले. सरकारकडून अपेक्षा असणे चूक नाही. पूर्वीच्या सरकारसारखे अनुभव जनतेला येऊ नयेत. सत्तेत असताना विरोध करून जनतेसोबत राहण्याचा हा प्रयत्न आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.तूर खरेदीबाबत नियोजन चुकलेशेती उत्पादनाचे नियोजन करणाऱ्यांमध्ये शेतकरीच नाहीत. तूर खरेदीमध्ये शासनाचे नियोजन चुकले आहे. शेतकरी तूर ठेवणार कुठे, असा प्रश्न असून खरेदीच्या अटी, शर्ती कमी करून तूर खरेदी केली जावी. राष्ट्रपतिपदासाठी भागवतच योग्य देशाला हिंदुत्वादी राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर देशाला कणखर राष्ट्रपती पाहिजे. देशात आरआरएसचे कार्यकर्ते अनेक राज्यांत राज्यपाल झालेले आहेत. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव योग्यच वाटते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. माजी कृषिमंत्री शरद पवार राष्ट्रपती होऊ शकतात, असे खा. संजय राऊत म्हणाले होते. याचे स्पष्टीकरण देताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी त्यांना गुरू मानले आहे. खा.राऊत यांचा तो शाब्दिक वाद होता.