शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा लढत अटळ

By admin | Updated: May 8, 2017 04:12 IST

कर्जमुक्तीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत सांगितले. आम्ही दिल्लीला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्जमुक्तीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत सांगितले. आम्ही दिल्लीला गेलो, पण दिल्लीश्वरांनी हात वर केले. विधानसभेतील शब्द हा वचनाप्रमाणे असतो. एक महिना झाला; परंतु अजून काहीही झालेले नसल्याचे सांगत, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर लढत निश्चित आहे, असा अल्टीमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.मराठवाड्यातील ४६ विधानसभा मतदारसंघांत आमदार, नगरसेवकांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून तयार केलेला ग्राऊंड रिपोर्ट पक्षप्रमुख ठाकरे यांना सादर केला. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, सरकारचा पाठिंबा काढण्याबाबत हा दौरा नाही. कर्जमाफीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. पेरणीचा हंगाम आता सुरू होण्यात आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर पुन्हा वाढणार आहे. पहिले कर्ज तसेच राहणार आहे. मुख्यमंत्री म्हणतात मागेल त्याला कर्ज देऊ. परंतु पहिल्या कर्जातून त्यांना मुक्त करणे गरजेचे आहे. जिल्हा बँका मोडीत काढल्या आहेत. राष्ट्रीय बँका गावागावांत गेल्या असल्या तरी त्यांचे शेतकऱ्यांशी नाते नसल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेतून बाहेर पडणार नाहीहे अभियान निवडणुकीचा स्टंट नाही. माझ्या मार्गाने कर्जमुक्तीसाठी पुढे जाणार आहे. तीन वर्षांपासून वाटच पाहत आहोत. यापुढे मला जे वाटते ते करणार, माझ्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार. मी सत्तेला चिकटून राहिलेलो नाही. बऱ्याच वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले. सरकारकडून अपेक्षा असणे चूक नाही. पूर्वीच्या सरकारसारखे अनुभव जनतेला येऊ नयेत. सत्तेत असताना विरोध करून जनतेसोबत राहण्याचा हा प्रयत्न आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.तूर खरेदीबाबत नियोजन चुकलेशेती उत्पादनाचे नियोजन करणाऱ्यांमध्ये शेतकरीच नाहीत. तूर खरेदीमध्ये शासनाचे नियोजन चुकले आहे. शेतकरी तूर ठेवणार कुठे, असा प्रश्न असून खरेदीच्या अटी, शर्ती कमी करून तूर खरेदी केली जावी. राष्ट्रपतिपदासाठी भागवतच योग्य देशाला हिंदुत्वादी राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर देशाला कणखर राष्ट्रपती पाहिजे. देशात आरआरएसचे कार्यकर्ते अनेक राज्यांत राज्यपाल झालेले आहेत. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव योग्यच वाटते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. माजी कृषिमंत्री शरद पवार राष्ट्रपती होऊ शकतात, असे खा. संजय राऊत म्हणाले होते. याचे स्पष्टीकरण देताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी त्यांना गुरू मानले आहे. खा.राऊत यांचा तो शाब्दिक वाद होता.