शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना न्याय द्या, अन्यथा लढत अटळ

By admin | Updated: May 8, 2017 04:12 IST

कर्जमुक्तीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत सांगितले. आम्ही दिल्लीला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कर्जमुक्तीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जाण्याबाबत सांगितले. आम्ही दिल्लीला गेलो, पण दिल्लीश्वरांनी हात वर केले. विधानसभेतील शब्द हा वचनाप्रमाणे असतो. एक महिना झाला; परंतु अजून काहीही झालेले नसल्याचे सांगत, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर लढत निश्चित आहे, असा अल्टीमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला.मराठवाड्यातील ४६ विधानसभा मतदारसंघांत आमदार, नगरसेवकांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून तयार केलेला ग्राऊंड रिपोर्ट पक्षप्रमुख ठाकरे यांना सादर केला. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, सरकारचा पाठिंबा काढण्याबाबत हा दौरा नाही. कर्जमाफीबाबत सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहत आहे. पेरणीचा हंगाम आता सुरू होण्यात आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर पुन्हा वाढणार आहे. पहिले कर्ज तसेच राहणार आहे. मुख्यमंत्री म्हणतात मागेल त्याला कर्ज देऊ. परंतु पहिल्या कर्जातून त्यांना मुक्त करणे गरजेचे आहे. जिल्हा बँका मोडीत काढल्या आहेत. राष्ट्रीय बँका गावागावांत गेल्या असल्या तरी त्यांचे शेतकऱ्यांशी नाते नसल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेतून बाहेर पडणार नाहीहे अभियान निवडणुकीचा स्टंट नाही. माझ्या मार्गाने कर्जमुक्तीसाठी पुढे जाणार आहे. तीन वर्षांपासून वाटच पाहत आहोत. यापुढे मला जे वाटते ते करणार, माझ्या पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय मिळून देणार. मी सत्तेला चिकटून राहिलेलो नाही. बऱ्याच वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले. सरकारकडून अपेक्षा असणे चूक नाही. पूर्वीच्या सरकारसारखे अनुभव जनतेला येऊ नयेत. सत्तेत असताना विरोध करून जनतेसोबत राहण्याचा हा प्रयत्न आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.तूर खरेदीबाबत नियोजन चुकलेशेती उत्पादनाचे नियोजन करणाऱ्यांमध्ये शेतकरीच नाहीत. तूर खरेदीमध्ये शासनाचे नियोजन चुकले आहे. शेतकरी तूर ठेवणार कुठे, असा प्रश्न असून खरेदीच्या अटी, शर्ती कमी करून तूर खरेदी केली जावी. राष्ट्रपतिपदासाठी भागवतच योग्य देशाला हिंदुत्वादी राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर देशाला कणखर राष्ट्रपती पाहिजे. देशात आरआरएसचे कार्यकर्ते अनेक राज्यांत राज्यपाल झालेले आहेत. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव योग्यच वाटते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. माजी कृषिमंत्री शरद पवार राष्ट्रपती होऊ शकतात, असे खा. संजय राऊत म्हणाले होते. याचे स्पष्टीकरण देताना ठाकरे म्हणाले, पंतप्रधानांनी त्यांना गुरू मानले आहे. खा.राऊत यांचा तो शाब्दिक वाद होता.