शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

शेतकर्‍यांचा आनंद हिरावला जाणार

By admin | Updated: May 7, 2014 22:30 IST

बैलगाडा शर्यती बंद करण्याच्या आदेशावर बैलगाडामालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

घोडेगाव : बैलगाडा शर्यती बंद करण्याच्या आदेशावर बैलगाडामालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये शेतकरी पैसा मिळविण्यासाठी भाग घेत नाहीत, तर एक शान मान म्हणून वर्षभर संभाळलेले बैल आनंद लुटण्यासाठी पळवतात. बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे गावोगावी झालेले घाट ओस पडणार आहेत. यामधून शेतकर्‍यांना मिळणारा आनंद हिरावला जाणार आहेत. ज्या बैलांना आपल्या मालकाची हाक झोपेतून जागी करते, त्या बैलांना मारण्याची गरज नाही, असे बैलगाडामालक म्हणतात. घाटामध्ये जर बैल जखमी झाला, तर विमा कंपन्या आहेत. एवढे संरक्षण असताना बैलगाडा शर्यती बंद करण्याच्या निर्णयावर बैलगाडामालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बैलगाडा म्हणजे शेतकर्‍यांची शान आहे. बैलांमुळे शेतकर्‍यांना समाजात मान आहे. पैसेवाल्यांना लोक नमस्कार करतात; पण आम्हाला बैलांमुळे गावोगावी लोक ‘रामराम’ घालतात. बैलगाडा नसेल, तर शेतकर्‍यांची ओळख राहणार नाही. बैलगाडा शर्यतीमध्ये बैल पळविल्याने शेतकर्‍यांची छाती फुगते, यात्रांमध्ये ओळखी वाढतात, नातेवाईक-मित्रमंडळी भेटतात, सोयरिक जमते, समाज एकत्र राहतो. यात्रांमध्ये शेतकरी कुटुंबे आपली हौस करीत असतात. शर्यतीमध्ये बैलांना मारण्याची गरजच पडत नाही, एक आवाज टाकला तर बैले सळसळून तयार होतात. कुलदैवतांच्या यात्रेमध्ये बैल पळवावे लागतात. या यात्रा बिगरइनामी असतात, अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून येत होत्या. सरकारला बैलगाडा बंद करायचा असेल, तर त्यांनी प्रथम ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या बैलांचा वापर थांबविला पाहिजे. घोड्यांच्या रेस बंद केल्या पाहिजेत, दर वर्षी हजारो गोहत्या होतात त्या थांबविल्या पाहिजेत. बैलगाडा शर्यतीमध्ये चाबूकबंदी, काठीबंदी घाला; पण शर्यती बंद करू नका, अशी मागणी बैलगाडा शौकीन करीत आहेत. (वार्ताहर) ४न्यायालयाने बंदी घातलेल्या बैलगाडा शर्यती वर्षभरापूर्वी पुन्हा सुरू झाल्या. या एक वर्षात अतिशय उत्साहात यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती झाल्या. या बैलगाडा शर्यतींना राजकीय स्वरूप आले. छोट्या-मोठ्या नेत्यांच्या वाढदिवसाला बैलगाडा शर्यती होऊ लागल्या. ४स्वत:च्या जिवापेक्षा बैलांवर अधिक प्रेम करणारे शेतकरी या शर्यतींमध्ये उत्साहात नाचले. मुलाप्रमाणे बैलांवर प्रेम करून शर्यतींसाठी त्यांना चांगले खाऊ घातले; मात्र आता शर्यती बंद झाल्यामुळे हा आनंद हिसकावून घेतल्यासारखे झाले आहे.