शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

ज्वारी उत्पादनात २० टक्के वाढ

By admin | Updated: November 6, 2015 01:25 IST

यंदा उशिरा झालेल्या पावसाचा फायदा ज्वारीला होणार असल्याने २० टक्के उत्पादन वाढीचा दावा राहुरी कृषी विद्यापीठाने केला आहे. देशात ४५ तर महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टरवर ज्वारीची

- भाऊसाहेब येवले,  राहुरी(अहमदनगर)यंदा उशिरा झालेल्या पावसाचा फायदा ज्वारीला होणार असल्याने २० टक्के उत्पादन वाढीचा दावा राहुरी कृषी विद्यापीठाने केला आहे. देशात ४५ तर महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. सध्या पेरणी झालेली रब्बी ज्वारी गर्भावस्थेत असून महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टर क्षेत्रावर समाधानकारक परिस्थिती आहे़ स्वाती नक्षत्र ७ नोव्हेंबर रोजी संपत असून, या दरम्यान पाऊस झाला, तर ज्वारी उत्पादनात भरघोस वाढ होईल, परंतु पाऊस झाला नाही, तरी २० टक्के वाढ अपेक्षित आहे. अहमदनगर, पुणे, सोलापूर या तीन जिल्ह्यात तब्बल १६ लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारी उभी असून, उत्पादन वाढण्याची चिन्हे असल्याचे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ ज्वारी पैदासकार शरद गडाख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ भारी जमिनीवर २९ टक्के, मध्यम जमिनीवर ४८ टक्के, तर हलक्या जमिनीवर २३ टक्के रब्बी ज्वारीचे पीक उभे असल्याची माहिती गडाख यांनी दिली़यंदा ज्वारी पेरणीपूर्वी पाऊस पडला नव्हता़ ९ सप्टेंबरपासून पाऊस सुरू झाला़ मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात पावसाने हजेरी लावली होती़ यंदा वरच्या थरात पाऊस उपयुक्त ठरला. यंदा केवळ २६२ मिलीमीटर पाऊस नगर जिल्ह्यात पडला़ मागील वर्षी पावसाचे प्रमाण अधिक होते़ यावर्षी १४ दिवस पावसाने हजेरी लावली़ हा पाऊस ५० टक्के असला, तरी ज्वारीचे चित्र समाधानकारक आहे़ यंदा मात्र हुमणीच्या किडीचा प्रादुर्भाव ज्वारी पिकावर आढळून आला़ या किडीच्या नियंत्रणासाठी क्लोरोफायरीफास हे औषध १० लीटरला २५ मिली याप्रमाणे फवारावे, त्यामुळे दोन दिवसांत कीड आटोक्यात येईल, असे गडाख यांनी सांगितले.अशी घ्या काळजी़़़ज्वारीला तीन, पाच व आठ आठवड्यांच्या अंतराने कोळपण्या द्याव्यात़ अन्यथा जमिनीला दीड मीटर भेगा पडतात़ विरळणी करताना केवळ एकच कोंब ठेवावा़ हेक्टरी १ लाख ४८ हजार कोंब संख्या अपेक्षित आहे़ विरळणीमुळे ज्वारीच्या उत्पादनात २० टक्के वाढ होते़ खोडमाशीमुळे फुटवे फुटले असतील, तर त्यातून एक फुटवा ठेवावा़ज्वारी उत्पादक शेतकरी आत्माराम वाघ, ज्ञानदेव कुऱ्हे, लहू मडके, उत्तमराव आहेर, शिवाजी काकडे, शशिकांत पवार, भाऊसाहेब खैरे, बाळासाहे खरात यांनी रब्बी ज्वारी यंदा उत्पादन वाढविण्यास हातभार लावील, असा विश्वास व्यक्त केला़ शेतकऱ्यांनी ज्वारीची वेळेवर विरळणी केली आहे़ याशिवाय कोळपणी करण्यात आली आहे़