शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
5
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
6
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
7
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
8
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
9
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
10
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
11
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
12
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
13
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
14
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
15
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
16
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
17
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
18
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
19
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
20
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!

वैद्य यांच्या भूमिकेला जोशींचा सुरुंग

By admin | Updated: November 8, 2015 00:26 IST

देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची

नागपूर : देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची भूमिका नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी शनिवारी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत संघ पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरी येथे झालेली हत्या व त्यानंतर साहित्यिकांचा पुरस्कार परत करण्याचा घटनाक्रम, यामुळे देशात आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीस संघ जबाबदार असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. एरवी संघाकडून कुठल्याही टीका किंवा आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत नाही, परंतु डॉ. मनमोहन वैद्य यांनी या संदर्भात थेट काँग्रेसविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. मुळात काँग्रेस पक्षच संघाबद्दल असहिष्णू आहे. संघाची वाढ, तसेच जनतेमधून मिळणारी मान्यता या बाबी सहन करणे त्यांना कठीण झाले आहे, असे मत डॉ. वैद्य यांनी व्यक्त केले होते. डॉ. वैद्य यांच्या या प्रत्युत्तरामुळे संघ परिवारातील सदस्यही आश्चर्यचकित झाले होते.या संदर्भात भय्याजी जोशी यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, त्यांनी ही संघाची भूमिकाच नसल्याचे वक्तव्य दिले. ‘देशात असहिष्णुतेसाठी संघालाचा जबाबदार धरण्याची परंपराच आहे, परंतु प्रत्यक्षात स्थिती काय आहे? अशी आक्रमक भूमिका घेणे हे संघाचे धोरण नाही. आम्ही असे मतदेखील व्यक्त केलेले नाही,’ असे ते म्हणाले. संघाची नेमकी भूमिका काय?डॉ. मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसविरोधातील त्यांचे वक्तव्य ‘टष्ट्वीटर’वरदेखील ‘पोस्ट’ केले होते. शिवाय संघाचे अधिकृत पदाधिकारीच संघातर्फे भूमिका मांडतात, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे, परंतु भय्याजी जोशी यांनी ही संघाची भूमिका नसल्याचे प्रतिपादन केल्यामुळे संभ्रम वाढला आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून संघ आक्रमक होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.