शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वैद्य यांच्या भूमिकेला जोशींचा सुरुंग

By admin | Updated: November 8, 2015 00:26 IST

देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची

नागपूर : देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची भूमिका नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी शनिवारी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत संघ पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरी येथे झालेली हत्या व त्यानंतर साहित्यिकांचा पुरस्कार परत करण्याचा घटनाक्रम, यामुळे देशात आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीस संघ जबाबदार असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. एरवी संघाकडून कुठल्याही टीका किंवा आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत नाही, परंतु डॉ. मनमोहन वैद्य यांनी या संदर्भात थेट काँग्रेसविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. मुळात काँग्रेस पक्षच संघाबद्दल असहिष्णू आहे. संघाची वाढ, तसेच जनतेमधून मिळणारी मान्यता या बाबी सहन करणे त्यांना कठीण झाले आहे, असे मत डॉ. वैद्य यांनी व्यक्त केले होते. डॉ. वैद्य यांच्या या प्रत्युत्तरामुळे संघ परिवारातील सदस्यही आश्चर्यचकित झाले होते.या संदर्भात भय्याजी जोशी यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, त्यांनी ही संघाची भूमिकाच नसल्याचे वक्तव्य दिले. ‘देशात असहिष्णुतेसाठी संघालाचा जबाबदार धरण्याची परंपराच आहे, परंतु प्रत्यक्षात स्थिती काय आहे? अशी आक्रमक भूमिका घेणे हे संघाचे धोरण नाही. आम्ही असे मतदेखील व्यक्त केलेले नाही,’ असे ते म्हणाले. संघाची नेमकी भूमिका काय?डॉ. मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसविरोधातील त्यांचे वक्तव्य ‘टष्ट्वीटर’वरदेखील ‘पोस्ट’ केले होते. शिवाय संघाचे अधिकृत पदाधिकारीच संघातर्फे भूमिका मांडतात, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे, परंतु भय्याजी जोशी यांनी ही संघाची भूमिका नसल्याचे प्रतिपादन केल्यामुळे संभ्रम वाढला आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून संघ आक्रमक होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.