शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

वैद्य यांच्या भूमिकेला जोशींचा सुरुंग

By admin | Updated: November 8, 2015 00:26 IST

देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची

नागपूर : देशात असहिष्णुतेसाठी संघाला जबाबदार ठरविणाऱ्या काँग्रेसविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी थेट हल्लाबोल केला होता, परंतु अशी संघाची भूमिका नसल्याचे संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी शनिवारी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत संघ पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरी येथे झालेली हत्या व त्यानंतर साहित्यिकांचा पुरस्कार परत करण्याचा घटनाक्रम, यामुळे देशात आरोप-प्रत्यारोपांचे प्रमाण वाढले आहे. या परिस्थितीस संघ जबाबदार असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली होती. एरवी संघाकडून कुठल्याही टीका किंवा आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत नाही, परंतु डॉ. मनमोहन वैद्य यांनी या संदर्भात थेट काँग्रेसविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. मुळात काँग्रेस पक्षच संघाबद्दल असहिष्णू आहे. संघाची वाढ, तसेच जनतेमधून मिळणारी मान्यता या बाबी सहन करणे त्यांना कठीण झाले आहे, असे मत डॉ. वैद्य यांनी व्यक्त केले होते. डॉ. वैद्य यांच्या या प्रत्युत्तरामुळे संघ परिवारातील सदस्यही आश्चर्यचकित झाले होते.या संदर्भात भय्याजी जोशी यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता, त्यांनी ही संघाची भूमिकाच नसल्याचे वक्तव्य दिले. ‘देशात असहिष्णुतेसाठी संघालाचा जबाबदार धरण्याची परंपराच आहे, परंतु प्रत्यक्षात स्थिती काय आहे? अशी आक्रमक भूमिका घेणे हे संघाचे धोरण नाही. आम्ही असे मतदेखील व्यक्त केलेले नाही,’ असे ते म्हणाले. संघाची नेमकी भूमिका काय?डॉ. मनमोहन वैद्य यांनी काँग्रेसविरोधातील त्यांचे वक्तव्य ‘टष्ट्वीटर’वरदेखील ‘पोस्ट’ केले होते. शिवाय संघाचे अधिकृत पदाधिकारीच संघातर्फे भूमिका मांडतात, असे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे, परंतु भय्याजी जोशी यांनी ही संघाची भूमिका नसल्याचे प्रतिपादन केल्यामुळे संभ्रम वाढला आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून संघ आक्रमक होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.