शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

शेतक-यांची थट्टा

By admin | Updated: March 9, 2015 05:42 IST

आधी गारपीट आणि नंतर दुष्काळ, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांची राज्य सरकारने अक्षरश: फसवणूक केली आहे

सुनील कच्छवे, औरंगाबादआधी गारपीट आणि नंतर दुष्काळ, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांची राज्य सरकारने अक्षरश: फसवणूक केली आहे. सलग दुसऱ्यांदा आपत्ती ओढवल्यास बहुभूधारक शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत द्यावी, असे केंद्राचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, सरकारकडून या निर्देशांची पायमल्ली करीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोनऐवजी एक हेक्टरपर्यंतच मदत दिली जात आहे. संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील इतर काही जिल्ह्यांतही यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. यातील बहुतेक भागांत २०१४मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्या पॅकेजचे सध्या वाटप सुरू आहे. या पॅकेजनुसार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या पूर्ण क्षेत्रापुरती मदत दिली जात आहे. तर पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या बहुभूधारक शेतकऱ्यांना केवळ एक हेक्टरपर्यंतच मदत दिली आहे. परिणामी, आधी गारपीट आणि नंतर दुष्काळ यामुळे रब्बी आणि खरीप, अशी दोन्ही पिके गमावलेले मोठे शेतकरी अडचणीत आले आहेत. सलग दुसऱ्यांदा आपत्ती ओढवल्यास वैयक्तिक आर्थिक मदत देताना मोठ्या शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जावी, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियम आहेत. केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१३मध्ये सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना लेखी स्वरूपात ही नियमावली पाठविलेली आहे. परंतु तरीही फडणवीस सरकारने दुष्काळी मदत देताना हे नियम पायदळी तुडविले आहेत.