शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांची थट्टा

By admin | Updated: March 9, 2015 05:42 IST

आधी गारपीट आणि नंतर दुष्काळ, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांची राज्य सरकारने अक्षरश: फसवणूक केली आहे

सुनील कच्छवे, औरंगाबादआधी गारपीट आणि नंतर दुष्काळ, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांची राज्य सरकारने अक्षरश: फसवणूक केली आहे. सलग दुसऱ्यांदा आपत्ती ओढवल्यास बहुभूधारक शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत द्यावी, असे केंद्राचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, सरकारकडून या निर्देशांची पायमल्ली करीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोनऐवजी एक हेक्टरपर्यंतच मदत दिली जात आहे. संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील इतर काही जिल्ह्यांतही यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. यातील बहुतेक भागांत २०१४मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्या पॅकेजचे सध्या वाटप सुरू आहे. या पॅकेजनुसार अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या पूर्ण क्षेत्रापुरती मदत दिली जात आहे. तर पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या बहुभूधारक शेतकऱ्यांना केवळ एक हेक्टरपर्यंतच मदत दिली आहे. परिणामी, आधी गारपीट आणि नंतर दुष्काळ यामुळे रब्बी आणि खरीप, अशी दोन्ही पिके गमावलेले मोठे शेतकरी अडचणीत आले आहेत. सलग दुसऱ्यांदा आपत्ती ओढवल्यास वैयक्तिक आर्थिक मदत देताना मोठ्या शेतकऱ्यांनाही दोन हेक्टरपर्यंत मदत दिली जावी, असे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियम आहेत. केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१३मध्ये सर्व राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांना लेखी स्वरूपात ही नियमावली पाठविलेली आहे. परंतु तरीही फडणवीस सरकारने दुष्काळी मदत देताना हे नियम पायदळी तुडविले आहेत.