शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेला चंद्रपुरातून सुरुवात

By admin | Updated: March 29, 2017 18:33 IST

राज्यातल्या भाजपा-शिवसेना सरकारला संवेदना राहिल्या नसून हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे.

ऑनलाइन लोकमतचंद्रपूर, दि. 29 - राज्यातल्या भाजपा-शिवसेना सरकारला संवेदना राहिल्या नसून हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. या सरकारविरोधात सुरू झालेला हा संघर्ष कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर येथे संघर्ष यात्रेच्या शुभारंभाच्या जाहीर सभेत बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. चव्हाण म्हणाले की, ९ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या तरी हे सरकार कर्जमाफी करत नाही. या सरकारमध्ये संवेदनाच राहिल्या नाहीत. मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ, यांची योग्य वेळ येणार नाही. हे पुढच्या निवडणुकीत पुन्हा कर्जमाफीचे आश्वासन देतील, आम्हाला शेतक-यांच्या अडचणींची जाणीव होती म्हणून आम्ही देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. या सरकारमध्ये संवेदना आणि निर्णयक्षमता नाही. त्यामुळे कर्जमाफी मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही पोकळ गप्पा मारत नाही. आम्ही कर्जमाफी करून दाखवली. हे सरकार निर्दयी आहे, त्यामुळे संघर्ष आणखी तीव्र करावा लागेल. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. सरकार वाचवण्यासाठी 19 आमदारांचे निलंबन करून सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. न्याय मागणा-या शेतक-यांना मंत्रालयात मारहाण केली जात आहे.  शेतक-यांसाठी कर्जमाफी मागणे हा दोष आहे का? असा सवाल त्यांनी केला. याच सभेत बोलताना पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आमदार जोगेंद्र कवाडे म्हणाले की, आमदारांचे निलंबन म्हणजे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.  सरकार निर्लज्ज असून पेटून उठलेले शेतकरी हे सरकार भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर आमदार विजय वडेट्टीवार यांनी, एकाही शेतक-याने कर्ज भरू नये, असे आवाहन केले. चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव जाट येथील आत्महत्या केलेले शेतकरी बंडू करकाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, शेकाप, एमआयएम या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली. करकाडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यास आजपर्यंत सरकारच्या एकाही मंत्र्याला वेळ मिळाला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी करकाडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच करकाडे यांचे कर्ज फेडण्याचे आश्वासन दिले. या संघर्ष यात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, शेकापचे धैर्यशील पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, जयदत्त क्षीरसागर, राजेश टोपे, मधुकर चव्हाण, बसवराज पाटील यांच्यासह विरोधी पक्षांचे आमदार उपस्थित होते.