शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

तरूणाईच्या देशात रोजगाराचे आव्हान

By admin | Updated: May 29, 2016 00:33 IST

भारतासारख्या तरुणाईच्या देशासमोर रोजगाराचे फार मोठे आव्हान आहे. या उलट उद्योगासमोर पैसा, तंत्रज्ञानाच्या नव्हे तर रोजगारक्षम युवकांची समस्या आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध

अमरावती : भारतासारख्या तरुणाईच्या देशासमोर रोजगाराचे फार मोठे आव्हान आहे. या उलट उद्योगासमोर पैसा, तंत्रज्ञानाच्या नव्हे तर रोजगारक्षम युवकांची समस्या आहे. त्यामुळे रोजगार उपलब्ध असूनही बेरोजगारीची समस्या कायम असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.कौशल्य विकास व उद्योजकता विभागाद्वारा शनिवारी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित विभागीय महारोजगार मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीवप्रताप रूडी, ना. रणजित पाटील, ना. प्रवीण पोटे, आ. चैनसुख संचेती, आ. अनिल बोंडे, आदी उपस्थित होते. जोवर ह्यव्हॅल्यू अ‍ॅडीशनह्ण होत नाही, युवक कौशल्य प्राप्त करीत नाही, तोवर रोजगार मिळणार नाही. यासाठी कौशल्य प्राप्त करणे महत्वाचे आहे. शेतीमुळे ५५ टक्के रोजगार निर्मिती होते. त्यामध्ये राज्याचा वाटा ११ टक्के आहे. शेतीपुरक उद्योग वाढवावे लागतील, असेही ते सांगितले. (प्रतिनिधी)- रोजगाराच्या नावावर बोलविण्यात आलेल्या अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा या पाच जिल्ह्यातून आलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली. नोकरीच्या नावावर बोलविले मात्र रित्या हाती परत जावे लागत असल्याची प्रतिक्रिया बहुतांश पदवीधरांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. यासंबंधाने काही जण तक्रारी नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते. तथापि आज कार्यालयाला सुटी होती. कौशल्य विकासात महाराष्ट्र अव्वलदेशाच्या ईतिहासात फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास विभाग स्थापन केला. आजवर युवकांना केवळ पदवीशी जोडले गेले आहे. १० वर्षांच्या शिक्षणानंतर १० आठवड्यांचे प्रशिक्षण महत्वाचे आहे. सार्वजनिक क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षित युवकांची गरज आहे. विदेशात ८० टक्के कौशल्य प्रशिक्षित युवक असताना देशात हे प्रमाण केवळ ४ टक्के आहे. या तुलनेत महाराष्ट्र कौशल्य प्रशिक्षणात प्रथम क्रमांकावर आहे.- राजीवप्रताप रूडी, कौशल्य विकास राज्यमंत्री, भारत सरकार