शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

JNU प्रकरण - पीडीपीबरोबर सत्ता स्थापणा-या भाजपानं देशभक्तीची प्रमाणपत्र वाटू नये - राज ठाकरे

By admin | Updated: February 27, 2016 12:54 IST

जेएनएयू प्रकरणात भाजपा राजकारण आणत आहे, देशभक्तीची प्रमाणपत्रं भाजपानं वाटू नये असं सांगत, अफझल गुरूसंदर्भात ठराव मांडणा-या पीडीपीसोबत भाजपानं सरकार स्थापन केलं आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - जेएनएयू प्रकरणात भाजपा राजकारण आणत आहे, देशभक्तीची प्रमाणपत्रं भाजपानं वाटू नये असं सांगत, अफझल गुरूसंदर्भात ठराव मांडणा-या पीडीपीसोबत भाजपानं सरकार स्थापन केलं आहे याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली आहे. देशविरोधी घोषणा कोणी देत असेल तर त्याला तिथं जागच्या जागी फोडायला हवं असं राज ठाकरे म्हणाले. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अभाविपला जेएनयूमध्ये स्थिरस्थावर करण्यासाठी हे केलं जातंय का असं वाटावं अशी स्थिती असल्याचं राज ठाकरे म्हणाले. अशा मुद्यांमध्ये राजकारण आणू नये आणि जे कोणी देशविरोधी घोषणा देतील त्यांना तिथल्या तिथं फोडावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
टोल, रेल्वेतल्या नोक-या इथपासून ते नरेंद्र मोदींच्या सरकारचं काम इथपर्यंत राज यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- भारतविरोधी घोषणा देणा-यांचा भाजपाला तिटकारा वाटतो मग हाच विचार काश्मीरमध्ये पीडीपीशी युती करताना का आला नाही?
- भारताविरोधात कोणी घोषणा देत असतील तर तिथल्या तिथे फोडून काढा, शिक्षा करा पण त्यावरून कोणीही राजकारण करू नये.
- २००८ नंतर (मनसेच्या आंदोलनानंतर) मराठी चित्रपटांचा ट्रेंड बदलला.
- बाजीराव मावळ्यांसह नाचतात हे पाहिल्यानंतरच माझा त्यातील (चित्रपटातील) रस संपला. इतिहास लोकांसमोर आणताना तो योग्य पद्धतीनेच मांडला गेला पाहिजे, असं मला वाटतं.
- आपण केलेले लिखाण वा कामाला लोकांनी दिलेली पावती, त्यांचं प्रेम हाच सगळ्यात मोठा पुरस्कार असतो असं मला वाटतं.
- टोल घेणे हे सरकारचे काम आहे, मग खासगी कंपन्यांना का दिला जातो?
- टोल बंद करण्याचे श्रेय मनसेला जातं.
- मोदींनी झटक्यात भ्रमनिरास केला, ते उद्योग गुजरातकडे वळवत आहेत.
- मराठीसाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज.
- मराठी ही इंग्रजीसारखी सर्वसमावेशक हवी, नवे शब्द सामील करून घ्यायला हवे.
- साहित्य संमेलनातून निष्पन्न काय होते, तरूणांना काय मिळते, याचा विचार करणे आवश्यक आहे.
- आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, दळवी हे माझे आवडते लेखक.
- माणसाला छंद असतील तर त्याल जय-पराजयाची भीती वाटत नाही.
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तकाचे काम सुरू.
- व्यंगचित्रकार काढताना राज ठाकरे असं नाव लिहीत जा ही सूचना बाळासाहेबांनी केली होती.
- माझं पहिलं प्रेम सिनेमा.
- मनसेच्या पाठपुरव्यामुळेच १४०० मुलं मध्य रेल्वेतील नोकरीत कायम झाली.
- मराठी भाषा दिन फक्त एकच दिवस नको ३६५ दिवस हवा.
- आमच्या आंदोलनानंतर रेल्वेच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात येऊ लागल्या.
- मराठी भाषेसाठी लढतच राहणार.