शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

JNU प्रकरण - पीडीपीबरोबर सत्ता स्थापणा-या भाजपानं देशभक्तीची प्रमाणपत्र वाटू नये - राज ठाकरे

By admin | Updated: February 27, 2016 12:54 IST

जेएनएयू प्रकरणात भाजपा राजकारण आणत आहे, देशभक्तीची प्रमाणपत्रं भाजपानं वाटू नये असं सांगत, अफझल गुरूसंदर्भात ठराव मांडणा-या पीडीपीसोबत भाजपानं सरकार स्थापन केलं आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ - जेएनएयू प्रकरणात भाजपा राजकारण आणत आहे, देशभक्तीची प्रमाणपत्रं भाजपानं वाटू नये असं सांगत, अफझल गुरूसंदर्भात ठराव मांडणा-या पीडीपीसोबत भाजपानं सरकार स्थापन केलं आहे याची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली आहे. देशविरोधी घोषणा कोणी देत असेल तर त्याला तिथं जागच्या जागी फोडायला हवं असं राज ठाकरे म्हणाले. मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अभाविपला जेएनयूमध्ये स्थिरस्थावर करण्यासाठी हे केलं जातंय का असं वाटावं अशी स्थिती असल्याचं राज ठाकरे म्हणाले. अशा मुद्यांमध्ये राजकारण आणू नये आणि जे कोणी देशविरोधी घोषणा देतील त्यांना तिथल्या तिथं फोडावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
टोल, रेल्वेतल्या नोक-या इथपासून ते नरेंद्र मोदींच्या सरकारचं काम इथपर्यंत राज यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
 
- भारतविरोधी घोषणा देणा-यांचा भाजपाला तिटकारा वाटतो मग हाच विचार काश्मीरमध्ये पीडीपीशी युती करताना का आला नाही?
- भारताविरोधात कोणी घोषणा देत असतील तर तिथल्या तिथे फोडून काढा, शिक्षा करा पण त्यावरून कोणीही राजकारण करू नये.
- २००८ नंतर (मनसेच्या आंदोलनानंतर) मराठी चित्रपटांचा ट्रेंड बदलला.
- बाजीराव मावळ्यांसह नाचतात हे पाहिल्यानंतरच माझा त्यातील (चित्रपटातील) रस संपला. इतिहास लोकांसमोर आणताना तो योग्य पद्धतीनेच मांडला गेला पाहिजे, असं मला वाटतं.
- आपण केलेले लिखाण वा कामाला लोकांनी दिलेली पावती, त्यांचं प्रेम हाच सगळ्यात मोठा पुरस्कार असतो असं मला वाटतं.
- टोल घेणे हे सरकारचे काम आहे, मग खासगी कंपन्यांना का दिला जातो?
- टोल बंद करण्याचे श्रेय मनसेला जातं.
- मोदींनी झटक्यात भ्रमनिरास केला, ते उद्योग गुजरातकडे वळवत आहेत.
- मराठीसाठी पुन्हा आंदोलन करण्याची गरज.
- मराठी ही इंग्रजीसारखी सर्वसमावेशक हवी, नवे शब्द सामील करून घ्यायला हवे.
- साहित्य संमेलनातून निष्पन्न काय होते, तरूणांना काय मिळते, याचा विचार करणे आवश्यक आहे.
- आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, दळवी हे माझे आवडते लेखक.
- माणसाला छंद असतील तर त्याल जय-पराजयाची भीती वाटत नाही.
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तकाचे काम सुरू.
- व्यंगचित्रकार काढताना राज ठाकरे असं नाव लिहीत जा ही सूचना बाळासाहेबांनी केली होती.
- माझं पहिलं प्रेम सिनेमा.
- मनसेच्या पाठपुरव्यामुळेच १४०० मुलं मध्य रेल्वेतील नोकरीत कायम झाली.
- मराठी भाषा दिन फक्त एकच दिवस नको ३६५ दिवस हवा.
- आमच्या आंदोलनानंतर रेल्वेच्या जाहिराती मराठी वर्तमानपत्रात येऊ लागल्या.
- मराठी भाषेसाठी लढतच राहणार.