शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनदायी’चे सर्वाधिक लाभार्थी मुंबईत!

By admin | Updated: June 14, 2016 03:39 IST

पैशांअभावी कुणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने २ जुलै २०१२ पासून ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. सध्याच्या ‘नामांतरवादी’

- संकेत सातोपे, मुंबई

पैशांअभावी कुणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने २ जुलै २०१२ पासून ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. सध्याच्या ‘नामांतरवादी’ युती शासनाने नुकतेच ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ असे नामांतर करीत याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालविला असला, तरीही आघाडीच्या काळातच ही योजना घराघरांत पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसते. डिसेंबर २०१५ पर्यंत तब्बल ४ लाख ४८ हजार ८५९ गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला असून यातील सर्वाधिक लाभार्थी मुंबई शहर आणि उपनगरातील आहेत.जुलै २०१२ पासून अमरावती, नांदेड, धुळे, गडचिरोली, रायगड, सोलापूर आणि मुंबई शहर- उपनगर या आठ जिल्ह्यांमध्ये ही आरोग्य योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली. आठही जिल्ह्यांत योजनेला मोठे यश मिळाल्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ पासून ती उर्वरित महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत प्रत्येक जिल्ह्यात हजारो गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई खालोखाल सोलापूर २८ हजार २१९, धुळे २१ हजार ८७५ आणि जळगाव २१ हजार ८१६ या जिल्ह्यांत योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत. त्यातही योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगावचा समावेश नसतानाही या जिल्ह्यातील लाभार्थी संख्या मोठी आहे.हृदयरुग्णांना सर्वाधिक लाभ : या योजनेअंतर्गत हृदयरुग्णांवर सर्वाधिक उपचार करण्यात आल्याचे आकडेवारी सांगते. तीन वर्षांत तब्बल ५५ हजार ७०९ हृदयरुग्णांनी याचा लाभ घेतला. त्या व्यतिरिक्त आणखी ४० हजार २५६ रुग्णांवर हृदय आणि छातीसंदर्भातील शस्त्रक्रियाही या योजनेत करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल ४४ हजार ३६२ जननेंद्रीय संबंधित आजारांचे रुग्ण, कर्करोग-ट्युमर आदी आजारांचे ४१ हजार २१ रुग्ण योजनेचे लाभार्थी आहेत. कृत्रिम अवयव ३९, संसर्गजन्य आजार ६४ आणि त्वचाविकार २७० आदी आजारांसाठी या योजनेचा कमीत कमी वापर झाला आहे.विम्याच्या रकमेत वाढया योजनेअंतर्गत आता प्रतिकुटुंब दीड लाखाऐवजी, दोन लाखांपर्यंतचा उपचार खर्च करण्यात येणार आहे. तसेच या योजनेत समाविष्ठ आजारांची संख्याही ९७१ वरून ११०० करण्यात आली आहे. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांसोबत शासकीय आश्रमशाळा, अनाथालये, वृद्धाश्रम, आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकरी आणि पत्रकारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.उपेक्षितांपर्यंत पोहोचणे आवश्यकदरम्यान, विदर्भातील गडचिरोली (२१२७), भंडारा (२६०३), गोंदिया (२५९७) या दुर्गम आणि तुलनेने अविकसित जिल्ह्यांमध्ये मात्र लाभार्थी संख्या कमी आहे. वास्तविक गरिबी आणि दर्जेदार आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या या जिल्ह्यांत ही योजना अधिक प्रमाणात पोहोचणे आवश्यक आहे. आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्येही या योजनेचे सर्वात कमी १ हजार ९०७ लाभार्थी आहेत. राज्यातील दुर्गम भागांपर्यंतसुद्धा ही ‘आरोग्यगंगा’ पोहचविण्याच आव्हान युती शासनापुढे आहे.