शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

‘जीवनदायी’चे सर्वाधिक लाभार्थी मुंबईत!

By admin | Updated: June 14, 2016 03:39 IST

पैशांअभावी कुणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने २ जुलै २०१२ पासून ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. सध्याच्या ‘नामांतरवादी’

- संकेत सातोपे, मुंबई

पैशांअभावी कुणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने २ जुलै २०१२ पासून ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. सध्याच्या ‘नामांतरवादी’ युती शासनाने नुकतेच ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ असे नामांतर करीत याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालविला असला, तरीही आघाडीच्या काळातच ही योजना घराघरांत पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसते. डिसेंबर २०१५ पर्यंत तब्बल ४ लाख ४८ हजार ८५९ गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला असून यातील सर्वाधिक लाभार्थी मुंबई शहर आणि उपनगरातील आहेत.जुलै २०१२ पासून अमरावती, नांदेड, धुळे, गडचिरोली, रायगड, सोलापूर आणि मुंबई शहर- उपनगर या आठ जिल्ह्यांमध्ये ही आरोग्य योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली. आठही जिल्ह्यांत योजनेला मोठे यश मिळाल्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ पासून ती उर्वरित महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत प्रत्येक जिल्ह्यात हजारो गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई खालोखाल सोलापूर २८ हजार २१९, धुळे २१ हजार ८७५ आणि जळगाव २१ हजार ८१६ या जिल्ह्यांत योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत. त्यातही योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगावचा समावेश नसतानाही या जिल्ह्यातील लाभार्थी संख्या मोठी आहे.हृदयरुग्णांना सर्वाधिक लाभ : या योजनेअंतर्गत हृदयरुग्णांवर सर्वाधिक उपचार करण्यात आल्याचे आकडेवारी सांगते. तीन वर्षांत तब्बल ५५ हजार ७०९ हृदयरुग्णांनी याचा लाभ घेतला. त्या व्यतिरिक्त आणखी ४० हजार २५६ रुग्णांवर हृदय आणि छातीसंदर्भातील शस्त्रक्रियाही या योजनेत करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल ४४ हजार ३६२ जननेंद्रीय संबंधित आजारांचे रुग्ण, कर्करोग-ट्युमर आदी आजारांचे ४१ हजार २१ रुग्ण योजनेचे लाभार्थी आहेत. कृत्रिम अवयव ३९, संसर्गजन्य आजार ६४ आणि त्वचाविकार २७० आदी आजारांसाठी या योजनेचा कमीत कमी वापर झाला आहे.विम्याच्या रकमेत वाढया योजनेअंतर्गत आता प्रतिकुटुंब दीड लाखाऐवजी, दोन लाखांपर्यंतचा उपचार खर्च करण्यात येणार आहे. तसेच या योजनेत समाविष्ठ आजारांची संख्याही ९७१ वरून ११०० करण्यात आली आहे. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांसोबत शासकीय आश्रमशाळा, अनाथालये, वृद्धाश्रम, आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकरी आणि पत्रकारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.उपेक्षितांपर्यंत पोहोचणे आवश्यकदरम्यान, विदर्भातील गडचिरोली (२१२७), भंडारा (२६०३), गोंदिया (२५९७) या दुर्गम आणि तुलनेने अविकसित जिल्ह्यांमध्ये मात्र लाभार्थी संख्या कमी आहे. वास्तविक गरिबी आणि दर्जेदार आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या या जिल्ह्यांत ही योजना अधिक प्रमाणात पोहोचणे आवश्यक आहे. आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्येही या योजनेचे सर्वात कमी १ हजार ९०७ लाभार्थी आहेत. राज्यातील दुर्गम भागांपर्यंतसुद्धा ही ‘आरोग्यगंगा’ पोहचविण्याच आव्हान युती शासनापुढे आहे.