शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘जीवनदायी’चे सर्वाधिक लाभार्थी मुंबईत!

By admin | Updated: June 14, 2016 03:39 IST

पैशांअभावी कुणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने २ जुलै २०१२ पासून ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. सध्याच्या ‘नामांतरवादी’

- संकेत सातोपे, मुंबई

पैशांअभावी कुणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने २ जुलै २०१२ पासून ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. सध्याच्या ‘नामांतरवादी’ युती शासनाने नुकतेच ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ असे नामांतर करीत याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालविला असला, तरीही आघाडीच्या काळातच ही योजना घराघरांत पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसते. डिसेंबर २०१५ पर्यंत तब्बल ४ लाख ४८ हजार ८५९ गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला असून यातील सर्वाधिक लाभार्थी मुंबई शहर आणि उपनगरातील आहेत.जुलै २०१२ पासून अमरावती, नांदेड, धुळे, गडचिरोली, रायगड, सोलापूर आणि मुंबई शहर- उपनगर या आठ जिल्ह्यांमध्ये ही आरोग्य योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली. आठही जिल्ह्यांत योजनेला मोठे यश मिळाल्यानंतर २१ नोव्हेंबर २०१३ पासून ती उर्वरित महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत प्रत्येक जिल्ह्यात हजारो गरजूंनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई खालोखाल सोलापूर २८ हजार २१९, धुळे २१ हजार ८७५ आणि जळगाव २१ हजार ८१६ या जिल्ह्यांत योजनेचे सर्वाधिक लाभार्थी आहेत. त्यातही योजनेच्या पहिल्या टप्प्यात जळगावचा समावेश नसतानाही या जिल्ह्यातील लाभार्थी संख्या मोठी आहे.हृदयरुग्णांना सर्वाधिक लाभ : या योजनेअंतर्गत हृदयरुग्णांवर सर्वाधिक उपचार करण्यात आल्याचे आकडेवारी सांगते. तीन वर्षांत तब्बल ५५ हजार ७०९ हृदयरुग्णांनी याचा लाभ घेतला. त्या व्यतिरिक्त आणखी ४० हजार २५६ रुग्णांवर हृदय आणि छातीसंदर्भातील शस्त्रक्रियाही या योजनेत करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल ४४ हजार ३६२ जननेंद्रीय संबंधित आजारांचे रुग्ण, कर्करोग-ट्युमर आदी आजारांचे ४१ हजार २१ रुग्ण योजनेचे लाभार्थी आहेत. कृत्रिम अवयव ३९, संसर्गजन्य आजार ६४ आणि त्वचाविकार २७० आदी आजारांसाठी या योजनेचा कमीत कमी वापर झाला आहे.विम्याच्या रकमेत वाढया योजनेअंतर्गत आता प्रतिकुटुंब दीड लाखाऐवजी, दोन लाखांपर्यंतचा उपचार खर्च करण्यात येणार आहे. तसेच या योजनेत समाविष्ठ आजारांची संख्याही ९७१ वरून ११०० करण्यात आली आहे. पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांसोबत शासकीय आश्रमशाळा, अनाथालये, वृद्धाश्रम, आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकरी आणि पत्रकारांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे.उपेक्षितांपर्यंत पोहोचणे आवश्यकदरम्यान, विदर्भातील गडचिरोली (२१२७), भंडारा (२६०३), गोंदिया (२५९७) या दुर्गम आणि तुलनेने अविकसित जिल्ह्यांमध्ये मात्र लाभार्थी संख्या कमी आहे. वास्तविक गरिबी आणि दर्जेदार आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या या जिल्ह्यांत ही योजना अधिक प्रमाणात पोहोचणे आवश्यक आहे. आदिवासीबहुल जिल्हा असलेल्या नंदुरबारमध्येही या योजनेचे सर्वात कमी १ हजार ९०७ लाभार्थी आहेत. राज्यातील दुर्गम भागांपर्यंतसुद्धा ही ‘आरोग्यगंगा’ पोहचविण्याच आव्हान युती शासनापुढे आहे.