शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जितेंद्र आव्हाड यांनी ठोकले मुंबई विद्यापीठाला ताळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 07:10 IST

ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचे पूर्ण निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला ताळे ठोकले.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 8 - ऑगस्ट महिना अर्ध्यावर आला तरी अद्याप मुंबई विद्यापीठाचे पूर्ण निकाल लागलेले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रात्री मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराला ताळे ठोकले. विद्यापीठाला ताळे ठोकल्यानंतर मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिलेला शब्द आपण पाळला. वेळेत निकाल लावण्यात अपयशी ठरलेल्या विद्यापीठाला आपण ताळे ठोकले, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.  मुंबई विद्यापीठातून पदवी परीक्षेसाठी बसलेले लाखो विद्यार्थी अद्याप निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपूनही निकाल जाहीर करण्यात असमर्थ ठरलेल्या मुंबई विद्यापीठामुळे, राज्यभरातील विधि अभ्यासक्रम प्रक्रिया पुढे ढकलली होती, पण ९ ऑगस्टला विधि प्रवेशाची पहिली यादी लागणार असल्यामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत.आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे मुंबई विद्यापीठाचा निकाल रखडला आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत निकाल जाहीर होणार नाही, याची कल्पना आल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ मागितली होती. तंत्रशिक्षण संचालनालायतर्फे ७ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता ९ ऑगस्टला विधि अभ्यासक्रमाची पहिली यादी जाहीर होणार आहे, तरीही मुंबई विद्यापीठाचे लाखो विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेतच आहेत.