शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

फूट पाडणाऱ्यांविरुद्ध जिहाद पुकारा

By admin | Updated: February 16, 2016 03:03 IST

भारतात सर्व जाती-धर्मांचे लोक आनंदाने एकत्रित नांदतात. राजकीय स्वार्थासाठी काहीजण गैरसमज पसरवून दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत

मुंबई : भारतात सर्व जाती-धर्मांचे लोक आनंदाने एकत्रित नांदतात. राजकीय स्वार्थासाठी काहीजण गैरसमज पसरवून दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वधर्मियांनी एकत्र येऊन अशा राजकारण्यांविरुद्ध जिहाद पुकारण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. श्रीपाल सबनीस यांनी केले. आॅल इंडिया कौमी तंजीम संस्थेतर्फे ‘जिहाद अगेन्स्ट टेरिरिझम’ परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी स्वामी अग्निवेश म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व जातीधर्मांचा समावेश होता. मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा काडीमात्रही सहभाग नव्हता. एकाही नेत्याचा सहभाग असल्यास मोहन भागवत यांनी सांगावे,’ असे आव्हान त्यांनी दिले. माजी केंद्रीय राज्यमंत्री व खा. तारीक अन्वर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या सभागृहात रविवारी ही परिषद झाली. ‘स्वत:च्या इंद्रियांवर विजय मिळवून अंतकरण शुद्ध करणे, हा इस्लामी जिहादचा खरा अर्थ आहे,’ असे श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘जिहादचा संबंध काहीजण जाणीवपूर्वक दहशतवादाशी जोडतात. महंमद पैगंबरांनी एका व्यक्तीचा खून हा पूर्ण मानव जातीची हत्या असल्याची शिकवण दिली आहे. त्यामुळेच एका हातात कुराण व दुसऱ्या हातात शस्त्र घेत स्वत:ला खलिफा म्हणवून घेत निरपराधांची कत्तल करणाऱ्या बगदादीचा समस्त इस्लाम धर्मियांनी निषेध केला आहे.’तारीक अन्वर म्हणाले की, ‘इस्लामी जिहाद व दहशतवाद ही परस्परविरुद्ध दोन टोके आहेत. त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. केंद्र सरकार आरएसएसचा अजेंडा पुढे चालवित आहे. अल्पसंख्याका जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे. त्याविरुद्ध सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र लढा दिला पाहिजे.’ कौमी तंजीमचे प्रदेशाध्यक्ष मुनाफ हकीम यांनी राज्यात जिल्हास्तरावर जिहाद विरुद्ध आतंकवाद ही चळवळ राबविली जाणार असल्याचे सांगितले. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)