शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

फूट पाडणाऱ्यांविरुद्ध जिहाद पुकारा

By admin | Updated: February 16, 2016 03:03 IST

भारतात सर्व जाती-धर्मांचे लोक आनंदाने एकत्रित नांदतात. राजकीय स्वार्थासाठी काहीजण गैरसमज पसरवून दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत

मुंबई : भारतात सर्व जाती-धर्मांचे लोक आनंदाने एकत्रित नांदतात. राजकीय स्वार्थासाठी काहीजण गैरसमज पसरवून दोन धर्मांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वधर्मियांनी एकत्र येऊन अशा राजकारण्यांविरुद्ध जिहाद पुकारण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. श्रीपाल सबनीस यांनी केले. आॅल इंडिया कौमी तंजीम संस्थेतर्फे ‘जिहाद अगेन्स्ट टेरिरिझम’ परिषदेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी स्वामी अग्निवेश म्हणाले, ‘देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व जातीधर्मांचा समावेश होता. मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा काडीमात्रही सहभाग नव्हता. एकाही नेत्याचा सहभाग असल्यास मोहन भागवत यांनी सांगावे,’ असे आव्हान त्यांनी दिले. माजी केंद्रीय राज्यमंत्री व खा. तारीक अन्वर यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या सभागृहात रविवारी ही परिषद झाली. ‘स्वत:च्या इंद्रियांवर विजय मिळवून अंतकरण शुद्ध करणे, हा इस्लामी जिहादचा खरा अर्थ आहे,’ असे श्रीपाल सबनीस यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘जिहादचा संबंध काहीजण जाणीवपूर्वक दहशतवादाशी जोडतात. महंमद पैगंबरांनी एका व्यक्तीचा खून हा पूर्ण मानव जातीची हत्या असल्याची शिकवण दिली आहे. त्यामुळेच एका हातात कुराण व दुसऱ्या हातात शस्त्र घेत स्वत:ला खलिफा म्हणवून घेत निरपराधांची कत्तल करणाऱ्या बगदादीचा समस्त इस्लाम धर्मियांनी निषेध केला आहे.’तारीक अन्वर म्हणाले की, ‘इस्लामी जिहाद व दहशतवाद ही परस्परविरुद्ध दोन टोके आहेत. त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. केंद्र सरकार आरएसएसचा अजेंडा पुढे चालवित आहे. अल्पसंख्याका जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकविले जात आहे. त्याविरुद्ध सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र लढा दिला पाहिजे.’ कौमी तंजीमचे प्रदेशाध्यक्ष मुनाफ हकीम यांनी राज्यात जिल्हास्तरावर जिहाद विरुद्ध आतंकवाद ही चळवळ राबविली जाणार असल्याचे सांगितले. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)