शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिया खानच्या आईचा सीबीआयविरोधी पवित्रा

By admin | Updated: December 12, 2015 02:23 IST

बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल जिया खान मृत्यूप्रकरणी तिची आई राबिया यांनी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राला विरोध करीत ही आत्महत्या नसून हे खून प्रकरण असल्याचे म्हटले आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल जिया खान मृत्यूप्रकरणी तिची आई राबिया यांनी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्राला विरोध करीत ही आत्महत्या नसून हे खून प्रकरण असल्याचे म्हटले आहे. सूरज पांचोली याने तिला आत्महत्येस प्रवृत केल्याचा आरोपपत्रातील निष्कर्ष राबिया यांना मान्य नाही. या प्रकरणात सीबीआयने शेवटपर्यंत हे खून प्रकरण असल्याचे भासवले; परंतु ऐनवेळी आत्महत्येचे आरोपपत्र दाखल केले, हे धक्कादायक असल्याची टीकाही राबिया यांनी केली. राबिया म्हणाल्या की, सीबीआयच्या आरोपपत्राने मला आश्चर्यचकित केले आहे. आम्ही संपर्क केलेले डॉ. शर्मा यांचेदेखील म्हणणे आहे की, हा खून आहे. फॉरेन्सिक तज्ज्ञ जेसन यांच्या म्हणण्यानुसार जियावर बोथट हत्याराने वार करण्यात आले. माझ्या मुलीचा खून झाला, हे मला माहीत आहे. सूरज तिला नीट वागवत नव्हता, तेव्हापासून तिने त्याच्याशी संबंध तोडले होते. इतकेच काय घटनेच्या दिवशी तेलगू गाणे मिळाल्यामुळे ती आनंदात गाणे गात होती. तिने आत्महत्या केली, यावर माझा विश्वास नाही. जे काही चालले आहे, ते अमानवीय व पाशवी असून यामागे कसले राजकारण आहे हे मला माहीत नाही. पण हे सर्व बड्या राजकारणाचा भाग आहे हे मात्र निश्चित, असे नमूद करून त्या म्हणाल्या की, मी अद्याप आरोपपत्र वाचले नसले तरी अनेक शंका माझ्या मनात निर्माण झाल्या आहेत. त्याची उत्तरे मी शोधणार आहे. सीबीआयने अधिक खोलात तपास करावा असे मला वाटते, पण ते होत नाही. (विशेष प्रतिनिधी)>>> नैराश्याबाबत सूरजने कल्पना दिली होतीमुंबई : अभिनेत्री जिया खानच्या मनात घोळणारे आत्महत्येचे विचार तसेच काम न मिळाल्यामुळे तिने मनगट कापून केलेला आत्महत्येचा प्रयत्न या बाबी सूरज पांचोलीने तिच्या आईच्या कानावर टाकल्या होत्या, असा उल्लेख सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. जियाचे तिच्या व्यवस्थापकाशी असलेले संबंध संपुष्टात आल्यानंतर तिने मानसोपचार घेतले होते. आरोपपत्रात म्हटले आहे, की १८ मे २०१३ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सूरज जियाच्या घरी आला व तिच्या आईची भेट घेऊन जिया काम न मिळाल्यामुळे तणावाखाली असून, तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगितले. आपल्याला काम करायचे असल्यामुळे थोडी मोकळीक हवी आहे, असेही त्याने तिला सांगितले. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राहुल दत्ता यांनी २००८मध्ये जियावर उपचार केले होते. कारण तिचा सचिव जयदीप याच्याशी असलेले संबंध संपुष्टात आल्यामुळे ती तणावग्रस्त झाली होती. डिसेंबर २०१२मध्ये पुन्हा डॉ. दत्ता यांचे उपचार तिने घेतले. यावेळी मात्र तिने आपल्या तणावाचे कारण स्पष्ट केले नाही, असा उल्लेख करून आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात सूरजने खोटी आश्वासने देऊन आपल्या कारकिर्दीचे नुकसान केल्याचा उल्लेख आहे. गर्भपातानंतर जियाने डायरीत नोट लिहिली, असा उल्लेख करून आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, मी गर्भवती असल्यामुळे घाबरले, पण मी माझे सर्वस्व तुला दिले होते. पण तू मला जे दु:ख दिले त्यामुळे मी उद्ध्वस्त झाले. मी जेव्हा खूप दुखावले गेले तेव्हा मी गर्भपात केला. न्यायवैद्यक पुराव्याची छाननी केल्यानंतर असे स्पष्ट होते की, सूरजने घटनेची खरी कारणे न देता त्याने माहिती दडवली, असे आरोपपत्रात म्हटले आहे. >>> त्या दुर्दैवी रात्री सूरजने जियाला केलेले अुनत्तरित मेसेज!१०:५६ -बोलायची इच्छा असेल तर फोन कर.१०:५६ - जाऊ दे१०:५७ - मी आंधळेपणाने तुझ्यावर विश्वास ठेवला. तू माझ्या आयुष्याचा तुरुंगच केला. माझ्यावर सतत पाळत ठेवली. हा घाणेरडा प्रकार थांबविला नाहीस तर आपलं पटणार कसं? कृपया, मला एकटे सोड.१०:५७ - तूच काय ते ठरव.१०:५८ - मी खूप नाराज आहे.११:०३ - तुझ्या यशाची मला असूया वाटते, असे तुला वाटते.... नीलूशी बोल आणि काय घडले याचा तू स्वत: शोध घे. गुरुवारी तुला आश्चर्यचकित करायचे आहे. नीलूसोबत तू माझ्यावर पाळत कशी ठेऊ शकते?११:०८- लगेच फोन कर.११:२१ - आताच फोन कर.११:२१ - तुझ्याशी बोलण्याची इच्छा आहे.