शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
6
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
7
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
8
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
9
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
10
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
11
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
12
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
13
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
14
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
15
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
16
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
17
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
18
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
19
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
20
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ

दागिन्यांच्या नोंदीत, मोजमापात गोलमाल

By admin | Updated: February 4, 2015 00:02 IST

मूल्यांकनाचा पत्ता नाही : दानपेट्यांतील व्यवहारही संशयास्पद

इंदुमती गणेश - कोल्हापूर -अंबाबाई व जोतिबा देवस्थानला अर्पण करण्यात आलेल्या सोन्या-चांदीच्या अलंकारांच्या नोंदींत तफावत आहे. मूळ पावती एका दागिन्याची आणि भक्ताला देण्यात आलेली पावती दुसऱ्या दागिन्याची असे प्रकार दोन्ही देवस्थानांमध्ये उघडकीस आले आहेत. सुदैवाने या दोन मंदिरांसह सात देवस्थानांमधील दागिन्यांचे आता मूल्यांकन झाले असले तरी अन्य तीन हजार मंदिरांमध्ये देवाला किती अलंकार येतात, याबाबतच्या नोंदी नाहीत. रेकॉर्डमध्येही अक्षम्य चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. काही मंदिरांतील दानपेट्यांच्या रकमेचे व्यवहारही संशयास्पद आहेत.करवीरनिवासिनी अंबाबाईला भक्तांनी दागिना अर्पण केला की ते सांगतील त्यानुसार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून त्याच्या नोंदी केल्या जातात. नंतर हे अलंकार खजिनदाराकडे सुपूर्द केले जातात. त्या दागिन्यांतील सोन्याची शुद्धता, वजन गोल्ड व्हॅल्युएटरकडून न तपासताच दागिने ताब्यात घेतले जातात. प्रत्येक मौल्यवान वस्तूला विशिष्ट अनुक्रमांक असणे आवश्यक असते. त्यानुसार तो अलंकार सापडला पाहिजे. १९९० सालच्या तपासणीत १०२७ या अनुक्रमांकाला चांदीचा घोडा नोंद असताना तिथे प्रत्यक्षात सोन्याची मोहनमाळ मिळाली. १८ सप्टेंबर २०१३ रोजी अंबाबाईला एका भक्ताने दोन किलो चांदी अर्पण केली; मात्र त्याच क्रमांकाच्या दुसऱ्या पावतीवर सोन्याची नथ अर्पण केल्याची नोंद आहे. रजिस्टरमध्येही नथीचाच उल्लेख आहे. मग दोन किलो चांदी गेली कुठे? हे प्रकरण फक्त एक उदाहरण आहे. बऱ्याचदा दागिन्यांच्या नोंदी करताना त्यांचे अनुक्रमांकही चुकीचे टाकले जातात; त्यामुळे एकाच अनुक्रमांकावर दोन-तीन अलंकार असल्याचे लेखापरीक्षकांच्या निदर्शनास आले. शिवाय पावत्यांनुसार दागिन्यांची रजिस्टरला नोंद नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालातदेखील म्हटले आहे. बऱ्याच दागिन्यांच्या नोंदींपुढे त्यांचे वजनच लिहिलेले नाही. अर्पणपेटीत मिळालेल्या दागिन्यांच्याही नोंदी नसल्याचे शेरे यात मारण्यात आले आहेत. या अलंकारांची नोंद जाप्तेबुकमध्ये केली जाते. त्याव्यतिरिक्त अन्य कोठेही त्याची झेरॉक्स प्रत नाही. जोतिबा देवस्थानातही अलंकारांच्या नोंदी नसल्याचे आढळून आले आहे. नोंदीतील गडबड१९९० सालच्या तपासणीत १०२७ या अनुक्रमांकाला चांदीचा घोडा नोंद असताना तिथे मिळाली सोन्याची मोहनमाळ१८ सप्टेंबर २०१३ रोजी अंबाबाईला एका भक्ताने दोन किलो चांदी अर्पण केली. त्याच क्रमांकाच्या दुसऱ्या पावतीवर मात्र सोन्याची नथ अर्पण केल्याची नोंद.एकाच अनुक्रमांकावर दोन-तीन अलंकार असल्याचे लेखापरीक्षकांच्या निदर्शनास. बऱ्याच दागिन्यांच्या नोंदींपुढे त्यांचे वजनच लिहिलेले नाही. अर्पणपेटीत मिळालेल्या दागिन्यांच्याही नोंदी नसल्याचे शेरे लेखापरीक्षणात.निष्काळजीपणाच जास्त...२०१३ मध्ये अंबाबाई, जोतिबा, दत्तभिक्षालिंग, ओढ्यावरचा गणपती अशा एकूण सात देवस्थानांकडील दागिन्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन त्यानुसार त्याच्या सुयोग्य नोंदी ठेवल्या गेल्या. मात्र, दागिने नोंदीतील निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे भ्रष्टाचार होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी समितीच्या कर्मचाऱ्यांकडूनच दागिने चुकून गहाळ झाल्याचे प्रकरण घडले होते. नंतर त्यांनी ते भरले. यावरून याबाबत किती काळजी घेतली जाणे आवश्यक आहे, याचे गांभीर्य इतक्या वर्षांत व्यवस्थेला जाणवले नाही.रथाची चांदी नक्की किती ?देवस्थान समितीने दिलेल्या खुलाशात देणगी स्वरूपात आलेली चांदी ४५२ किलो असून, समितीने २० किलो चांदी खरेदी केल्याचे नमूद आहे. २०१० मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी शासनाला सादर केलेल्या अहवालात हीच चांदी २८३ किलो व देवस्थानची २० किलो असे नमूद केले आहे. मग १७० किलो चांदी गेली कुठे, असा प्रश्न येतो.