शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी ग्रामस्थांनी वाचला असुविधांचा पाढा

By admin | Updated: July 22, 2016 01:17 IST

लोहमार्गावरील महत्त्वपूर्ण असलेल्या ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वे स्थानकास प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली.

जेजुरी : पुणे ते कोल्हापूर या लोहमार्गावरील महत्त्वपूर्ण असलेल्या ब्रिटिशकालीन जेजुरी रेल्वे स्थानकास प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देत पाहणी केली. या वेळी उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. या वेळी ग्रामस्थांनी स्थानकात असलेल्या असुविधांचा पाढाच वाचला. पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील जेजुरी हे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने राज्यातून व राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला आहे. मात्र, येथील रेल्वेस्थानकात सुविधांचा अभाव आहे. येथील रहिवासी व माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, सुभाष दरेकर, विजय खोमणे, संजय माने, रोहिदास कुदळे यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाकडे सतत पाठपुरावा ठेवला आहे. तसेच केंद्र शासनाचे येथील रेल्वे मार्गाचे रुंदीकरण करण्याचे धोरण आहे. त्यानुसार रेल्वे प्रशासनाचे मंडल रेल प्रतिबंधक बी. के. दादाभॉय, वरिष्ठ परिचालन प्रबंधक अशोककुमार तिवारी, निरीक्षक कौशलकुमार तिवारी, आरपीएफ निरीक्षक डी. के. पिल्ले, उपनिरीक्षक राममहेश पांडे, राहुल बनसोडे यांनी गुरुवारी (दि. २१) जेजुरी रेल्वे स्थानकास भेट देत पाहणी केली. या वेळी रेल्वे स्थानकाचे स्टेशनमास्तर गुजरमल मीना, मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे, जयमल्हार पतसंस्थेचे अध्यक्ष सुभाष दरेकर, विजय खोमणे, भाजपाचे सचिन पेशवे आदी उपस्थित होते.रेल्वे स्थानक ब्रिटिशकालीन असून, येथील शेड पावसाळ्यात गळते. त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे. येथील प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्याने रेल्वेत चढ-उतार करताना प्रवाशांचा तोल जातो. यामुळे कित्येकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर, काही जण कायमचे अपंग झाले आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी. स्थानकात कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी पानसरे यांनी केली. जेजुरीत दररोज २०० ते ३०० भाविक रेल्वे मार्गाने देवदर्शनासाठी येतात. तसेच येथे औद्योगिक वसाहत विस्तारत आहे. त्या अनुषंगाने पुणे ते नीरा लोकलसेवा सुरू करावी व या लोकल सेवेला ‘मार्तंडविजय’ नाव द्यावे, अशी मागणी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनी केली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असून, याबाबत लवकरच वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ व खंडोबाची प्रतिमा देऊन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या भेटीदरम्यान नगरपालिका प्रशासनाचा एकही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी उपस्थित नव्हता, याचीच चर्चा होत होती. (वार्ताहर)>अधिकारीवर्गाकडून ग्रामस्थांचे कौतुक सुमारे पाच वर्षांपूर्वी रेल्वे स्थानकानजीक जोधपूरकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला असताना रेल्वे स्टेशननजीक राहणाऱ्या ग्रामस्थांनी अपघातामधील जखमींना डब्यातून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी पोहोचविण्यास मोलाची मदत केली होती. तर, इतर प्रवाशांना पाण्याच्या बाटल्या, जेवणाचे साहित्य पुरविले होते. रेल्वे स्थानकात अपघात झाल्यास येथील रहिवासी मेहबूब पानसरे, संजय माने, विजय खोमणे, सुभाष दरेकर, रोहिदास कुदळे हे अपघातामधील जखमींना उपचारासाठी तातडीची मदत करतात; तसेच स्थानकातील असुविधांबाबत सतत पाठपुरावा ठेवला असल्याने त्यांचे उपस्थित अधिकाऱ्यांनी कौतुक करीत धन्यवाद दिले.