शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

जेईईचा अ‍ॅडव्हान्सचा कटआॅफ वाढला

By admin | Updated: June 12, 2017 01:47 IST

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे पेपर गेल्या ११ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच सोपे काढण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी कटआॅफ वाढला आहे

पुणे : जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेचे पेपर गेल्या ११ वर्षांच्या तुलनेत पहिल्यांदाच सोपे काढण्यात आले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांनी कटआॅफ वाढला आहे. देशभरातील २३ आयआयटीमध्ये ११ हजार ३२ जागा उपलब्ध असून, रँक मिळालेल्या ३० हजार विद्यार्थ्यांमध्ये तिथल्या प्रवेशासाठी स्पर्धा होणार आहे. या परीक्षेत पुण्यातील साधारणत: ३०० विद्यार्थ्यांना रँक मिळविण्यात यश आले आहे. देशभरातून १ लाख ७१ हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी किमान ३५ टक्के गुण मिळविणाऱ्या ३० हजार विद्यार्थ्यांना रँक देण्यात आली आहे. पुण्याचा अक्षत चुघ हा देशात दुसरा आला, त्याचबरोबर इतर अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. देशभरातून जेईई मेन्स परीक्षेसाठी बसलेल्या १२ लाख विद्यार्थ्यांपैकी १.३६ लाख विद्यार्थी महाराष्ट्रातून होते, त्यापैकी पुण्याचे १५ हजार विद्यार्थी होते. त्यातून जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेसाठी एक हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. मागील ८ वर्षांत पुण्यातील जेईई अँडव्हान्स परीक्षेत रँक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. २००१मध्ये केवळ २, तर २०१०मध्ये पुण्यातील विद्यार्थ्यांना केवळ १०० आयआयटी रँक प्राप्त झाल्या होत्या यंदाच्या वर्षी हा आकडा ३००पर्यंत पोहोचला आहे. जेईई परीक्षेचे मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले, ‘‘जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा पर्यायी प्रश्नांवर आधारित झाल्यापासून गेल्या ११ वर्षांतील जेईई अ‍ॅडव्हान्स २०१७ची परीक्षा ही अत्यंत सोपी होती. अपेक्षेनुसार विशिष्ट रँकसाठीच्या कट आॅफ गुणांमध्ये वाढ झालेली आहे. उदा. २०१६ मध्ये आॅल इंडिया रँक २००० रँकसाठी ४३.५५%, तर २०१५ मध्ये ४९ % कटआॅफ होता. मात्र, यावर्षी हा कटआॅफ ६८% गुणांवर आला आहे.’’ जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत चाटे शिक्षण समूहाचे २२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सोहन सावंत, शीतल बिजले, अनुप गुरव, हितेश गुंजाल, अदिती खुर्द, गार्गी पाटील, रोहन पाटील, वर्षा सूर्यवंशी, स्नेहल कांबळे यांना रँक मिळविण्यात यश आले.