शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

जयमहेश कारखान्याने दाखविला दोनशे कामगारांना घरचा रस्ता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 20:33 IST

माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील एनएसएल ग्रुपच्या जय महेश साखर कारखान्याने 'लिव्ह आॅफ'च्या नावाखाली चक्क दोनशे कामगारांना पूर्व कल्पना न देता

ऑनलाइन लोकमतबीड, दि. १८ -  माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील एनएसएल ग्रुपच्या जय महेश साखर कारखान्याने 'लिव्ह आॅफ'च्या नावाखाली चक्क दोनशे कामगारांना पूर्व कल्पना न देता कामावरुन काढून टाकले आहे. या विरोधात कामगार युनियनच्या वतीने सोमवारी कारखान्यासमोर कामगारांनी ठिय्या आंदोलन केले.मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह माजलगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. परिणामी शेतकऱ्यांचे ऊस उत्पादन घटले आहे. अशा स्थितीत कामगारांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. जय महेश साखर कारखान्यात काम करणाऱ्या दोनशे मजुरांना कसलीही पूर्व कल्पना न देता कामावरुन काढून टाकले आहे. या प्रकारामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काढून टाकण्यापूर्वी कामगारांना विश्वासात घेणे आवश्यक होते, मात्र  असा कुठलाही प्रयत्न साखर कारखाना प्रशासनाकडून झाला नाही. परिणामी दोनशे गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात संतप्त कामगारांनी कारखानास्थळावर ठिय्या मांडला आहे. मात्र कामगारांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी एकही अधिकारी पुढे आला नाही. आम्हाला तात्काळ काम द्या, त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले. अधिकाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कारखान्याकडे पैसे आहेत, मात्र कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे. कारखान्याने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. या निर्णयामुळे आम्हा कामगारांवर अन्याय झाला असल्याचे दिलेल्या पत्रकात कामगारांनी म्हटले आहे. खाजगी तत्वावर चालणाऱ्या जय महेश साखर कारखान्याने घेतलेल्या निर्णयामुळे सोमवारी कामगार आक्रमक झाले होते. या निर्णयामुळे दोनशे कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.हा तर व्यवस्थापनाचा निर्णयसोमवारी जेंव्हा कामगारांनी ठिय्या आंदोलन केले तेंव्हा कामगारांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्रशासनातील एकही अधिकारी पुढे आला नाही. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही, असा निर्धार कामगार आंदोलकांनी केला आहेकामगार व कारखाना व्यवस्थापन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयाला आम्ही काहीच करू शकत नाहीत. कामगारांबाबतचे काही वाद न्यायालयात देखील सुरू आहेत. व्यवस्थापनाचे निर्णय आहे.- अशोक पवार, जय महेश साखर कारखाना व्यवस्थापक