शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

जयंतराव, कहानी बहोत पुरानी है!

By admin | Updated: July 23, 2016 04:24 IST

विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी करताना गेल्या १५ वर्षांतील भ्रष्ट कारभाराने राज्याचे अप्रतिष्ठा झाल्याची टीका केली

मुंबई : कलंकित मंत्र्यांबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जोरदार टोलेबाजी करताना गेल्या १५ वर्षांतील भ्रष्ट कारभाराने राज्याचे अप्रतिष्ठा झाल्याची टीका केली. माजी वित्त मंत्री जयंत पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, ‘जयंतराव! कहानी बहोत पुरानी है और इसमे बहोत टिष्ट्वस्ट है!’ काही घोटाळ्यांमध्ये अजित पवार यांचे नाव घेता घेता त्यांनी, जाऊ द्या! आज वाढदिवस आहे, असे म्हटले तेव्हा सभागृहात हशा पिकला. आज मुख्यमंत्री आणि अजित पवार या दोघांचाही वाढदिवस होता.मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी बँकेला ४९ कोटी रुपयांनी फसविल्याचा आरोप हास्यास्पद आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. जयकुमार रावल यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, याचिकाकर्त्यानेच त्याची कोणतीही हरकत नसल्याचे उच्च न्यायालयास गेल्या आठवड्यातच सांगितले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मालकीची जमीन त्यांनी प्रतिज्ञापत्रात दाखविली नाही. या जमिनीच्या मालकीविषयी त्यांना माहितीही नव्हती. तरीही माहिती समोर येताच त्यांनी ती जमीन मूळ मालकाला परत केली. आघाडी सरकारच्या काळात बळकवलेल्या किती जमिनी तुम्ही परत केल्या, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केला. महिला व बालकल्याण विभागाच्या पूरक पोषण आहार खरेदीत एक पैशाचाही गैरव्यवहार झालेला नाही. एकही निविदा उच्च न्यायालयाने रद्द केलेली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)तुमच्याबद्दल काय बोलू? आघाडी सरकारमधील घोटाळ्यांबद्दल काय काय बोलायचे, असा तिरकस सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले, लेंटिन आयोग, पी.बी.सावंत आयोग, न्या.बट्टा आयोगाचे काय झाले? दूध संघ, सुतगिरण्या, पतसंस्था आदींची राखरांगोळी कोणी केली हे सांगायला लावू नका. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी असलेल्या गायी काँग्रेसच्या नेत्यांनी लाटल्या, असा आरोपही त्यांनी केला. (प्रतिनिधी)