शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
2
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
3
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
6
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
7
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
8
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
9
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
10
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
11
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
12
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
17
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
18
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
19
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
20
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा

जायकवाडी, उजनी धरणात अद्याप पाणी का सोडले नाही?

By admin | Updated: August 2, 2016 05:45 IST

मराठवाड्याच्या जायकवाडी आणि उजनी धरणांत पाणी सोडण्याचा वारंवार आदेश देऊनही अद्याप त्याचे पालन का झाले नाही

मुंबई : नाशिक-नगरच्या धरणांतून मराठवाड्याच्या जायकवाडी आणि उजनी धरणांत पाणी सोडण्याचा वारंवार आदेश देऊनही अद्याप त्याचे पालन का झाले नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. याचे स्पष्टीकरण देण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकार व महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक महामंडळाला ९ आॅगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.याशिवाय नाशिक-नगरच्या धरणाचे पाणी नियबाह्यपणे कालव्यांद्वारे वळवण्यात येत असल्याने, न्यायालयाने गोदावरी- मराठवाडा जलसिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना न्यायालयात वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्याचे आदेश देत, याबद्दल त्यांनाही स्पष्टीकरण देण्याचा आदेश दिला आहे.नाशिक-नगरची धरणे तुडुंब भरून वाहत असूनही, राज्य सरकार या धरणांतील पाणी मराठवाड्याच्या जायकवाडी व उजनी धरणांत सोडत नाही. उलट हे पाणी अडवण्यासाठी गोदावरी-मराठवाडा जलसिंचन विकास महामंडळ (जीएमआयडीसी) कालव्यांद्वारे अन्य धरणांत वळवत आहे. राज्य जलसंपत्ती नियामक महामंडळाच्या (एमडब्ल्यूआरआरए) नियमानुसार, सिंचन क्षेत्राच्या मर्यादेबाहेर पाणी सोडले जाऊ शकत नाही, तरीही जीएमआयडीसी धरणांतील पाणी कालव्यांद्वारे वळवत आहे. हा शिक्षापात्र गुन्हा आहे, असे याचिकाकर्ते डॉ. संजय पाटील यांनी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाला सोमवारच्या सुनावणीत सांगितले.‘आम्ही वारंवार आदेश देऊनही अद्याप जायकवाडी व उजनी धरणांत पाणी का सोडले नाही? आम्हाला याबाबत स्पष्टीकरण द्या,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत राज्य सरकार व एमडब्ल्यूआरआरआयला स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले.नियमबाह्यपणे नाशिक-नगरच्या धरणांतील पाणी कालव्यांद्वारे वळवून नाशिक-नगरला पूर आणायचा आहे का? कायद्यात तरतूद नसतानाही सिंचन क्षेत्राच्या बाहेर कालव्यांद्वारे पाणी वळवता कसे, अशी प्रश्नांची सरबत्ती करत, न्यायालयाने जीएमआयडीसीच्या कार्यकारी संचालकांना पुढील सुनावणीस हजर राहण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)>समान तत्त्वावर वाटप का नाही? समान तत्त्वावर पाणीवाटप का करण्यात आले नाही, यापुढे वर्षभर पाण्याचे नियोजन कसे करण्यात येणार आहे, याचीही तपशीलवार माहिती राज्य सरकारला द्यावी लागणार आहे.