शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निगवे खालसा येथील जवान जम्मू येथे शहीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 11:33 IST

Indian Army, kolhapurnews, jammu, pakistan, करवीर तालुक्यातील निगवे ( खालसा) येथील जवान संग्राम शिवाजी पाटील (वय ३५) यांना जम्मू येथील राजौरी येथे सेवा बजावत असताना पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले. शुक्रवारी रात्री दोनच्या दरम्यान ड्युटी संपवून क्वॉटर्सकडे जात असताना ८१ एमएम मोटर सर्च हल्ल्यात ते शाहिद झाले.

ठळक मुद्देनिगवे खालसा येथील जवान जम्मू येथे शहीदपाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण

चुये/कोल्हापूर  : करवीर तालुक्यातील निगवे ( खालसा) येथील जवान संग्राम शिवाजी पाटील (वय ३५) यांना जम्मू येथील राजौरी येथे सेवा बजावत असताना पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात वीरमरण आले. शुक्रवारी रात्री दोनच्या दरम्यान ड्युटी संपवून क्वॉटर्सकडे जात असताना ८१ एमएम मोटर सर्च हल्ल्यात ते शाहिद झाले.संग्राम हे २००२ साली १६ मराठा बटालियन मधून भरती झाले होते. बेळगाव येथे प्रशिक्षण घेवून १८ वर्षे त्यांनी देशसेवा बजावली. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी कमी वयात ते भरती झाले होते. त्यांची १७ वर्ष करार (बॉन्ड) केलेली नोकरी गेल्याच वर्षी संपली होती पण गावी येवून दुसरा काही कामधंदा करण्यापेक्षा देशसेवा करावी म्हणून दोन वर्षासाठी नोकरी वाढवून घेतली होती. ते हवालदार पदावर कार्यरत होते.डिसेंबर महिन्यात १ तारखेला सुट्टीवर येणार असल्याचा फोन संग्राम यांनी घरी व मित्राना गुरुवारी रात्री केला होता. शांत संयमी व मनमिळावू स्वभाव असणाऱ्या संग्राम यांच्या मृत्यूने निगवे गावावर व परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांची दोन्ही मुले लहान असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.संग्राम यांचे पार्थिव रविवार रात्री किंवा सोमवारी सकाळी निगवे खालसा येथे आणले जाणार आहे. संग्राम यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यासाठी ग्रामपंचायतीजवळ असणऱ्या क्रिंडागणावर चबूतरा उभारण्यात आला आहे . त्यांच्या पश्चात पत्नी हेमलता, मुलगा शौर्य ( ८ वर्ष ), मुलगी शिवश्री ( २ वर्ष ) आई, वडील आणि भाऊ - भावजय असा परिवार आहे.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानkolhapurकोल्हापूरJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तान