शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

जवान चंदू चव्हाण मायदेशी

By admin | Updated: January 22, 2017 05:14 IST

चार महिन्यांपूर्वी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले, त्याच दिवशी अनावधानाने प्रत्यक्ष सीमा रेषा

नवी दिल्ली : चार महिन्यांपूर्वी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले, त्याच दिवशी अनावधानाने प्रत्यक्ष सीमा रेषा ओलांडून पलीकडे गेलेल्या चंदू बाबुलाल चव्हाण या भारतीय लष्कराच्या जवानास पाकिस्तानने शनिवारी सुखरूपपणे भारताकडे सुपुर्र्द केले.दुपारी २.३० वाजता पंजाब सीमेवरील वाघा चौकीवर चंदूला पाक लष्कराने भारतीय सैन्याच्या हवाली केले. त्या वेळची जी दृश्ये वाहिन्यांवर दाखविली, त्यात चंदू गडद रंगाची पॅन्ट व काळे जर्किन अशा वेशात दिसला. त्याची रायफल व बहुधा लष्करी गणवेशासह अन्य सामानाची सॅक स्वतंत्रपणे दिली गेली. सूत्रांनुसार शिपाई चव्हाण याचे आधी ‘डिब्रिफिंग’ केले जाईल, वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यानंतरच त्याचे पुढे काय करायचे किंवा त्याला पुढे कुठे जाऊ द्यायचे हे ठरविले जाईल. धुळे जिल्ह्यातील बोरविहीरचा २२ वर्षांचा चंदू लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या ३७ व्या बटालियनमध्ये तैनात होता. काश्मीरच्या मेंधार सेक्टरमधील सीमाचौकीत नेमणुकीवर असताना तो २९ सप्टेंबर रोजी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. आमचा जवान चुकून तुमच्या हद्दीत आला आहे, हे भारताने त्याच दिवशी पाकला कळविले होते. परंतु पाकिस्तानने चंदू चव्हाण त्यांच्या ताब्यात असल्याचे १५ दिवसांनी म्हणजे १३ आॅक्टोबर रोजी मान्य केले होते.भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)धुळे-जळगावात जल्लोषभारतीय सैन्यदलातील राष्ट्रीय रायफल्स तुकडीचे जवान चंदू चव्हाण यांची शनिवारी पाकिस्तानने सुटका केली़ ही आनंदवार्ता चंदूच्या बोरविहीर या गावी पोहोचताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी चंदूचे मोठे भाऊ भूषणना फोनवरून चंदू सुखरूप परतल्याची माहिती दिली़ त्यामुळे नातेवाइकांना अश्रू अनावर झाले होते़ चंदू चव्हाणना भारताच्या ताब्यात सोपविल्याचे वृत्त टीव्हीवर झळकताच बोरविहीरला फटाक्यांची आतशबाजी सुरू झाली. गावातील तरुणांनी डीजेच्या तालावर बेभान नाचत आनंदोत्सव साजरा केला.औदार्यातही पाकिस्तानची कुरापतसद््भावना म्हणून आणि सीमेवर शांतता व सलोखा कायम राखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण चंदू चव्हाण यास भारताच्या हवाली करत असल्याचे पाकिस्तानने म्हटले. हा मोठेपणाचा आव आणतानाही पाक कुरापत काढायला विसरला नाही. चंदू चव्हाण अनावधानाने नव्हे, तर वरिष्ठांकडून वाईट वागणूक मिळत असल्याने तो स्वत:ला नेमून दिलेले ठिकाण सोडून आमच्या लष्करापुढे शरण आला होता. आम्हीच त्याचे भारतात परत जाण्यासाठी मन वळविले, अशा बढाया पाकिस्तानने मारल्या.