शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जवान चंदू चव्हाण मायदेशी

By admin | Updated: January 22, 2017 05:14 IST

चार महिन्यांपूर्वी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले, त्याच दिवशी अनावधानाने प्रत्यक्ष सीमा रेषा

नवी दिल्ली : चार महिन्यांपूर्वी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक्स’ करून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केले, त्याच दिवशी अनावधानाने प्रत्यक्ष सीमा रेषा ओलांडून पलीकडे गेलेल्या चंदू बाबुलाल चव्हाण या भारतीय लष्कराच्या जवानास पाकिस्तानने शनिवारी सुखरूपपणे भारताकडे सुपुर्र्द केले.दुपारी २.३० वाजता पंजाब सीमेवरील वाघा चौकीवर चंदूला पाक लष्कराने भारतीय सैन्याच्या हवाली केले. त्या वेळची जी दृश्ये वाहिन्यांवर दाखविली, त्यात चंदू गडद रंगाची पॅन्ट व काळे जर्किन अशा वेशात दिसला. त्याची रायफल व बहुधा लष्करी गणवेशासह अन्य सामानाची सॅक स्वतंत्रपणे दिली गेली. सूत्रांनुसार शिपाई चव्हाण याचे आधी ‘डिब्रिफिंग’ केले जाईल, वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यानंतरच त्याचे पुढे काय करायचे किंवा त्याला पुढे कुठे जाऊ द्यायचे हे ठरविले जाईल. धुळे जिल्ह्यातील बोरविहीरचा २२ वर्षांचा चंदू लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सच्या ३७ व्या बटालियनमध्ये तैनात होता. काश्मीरच्या मेंधार सेक्टरमधील सीमाचौकीत नेमणुकीवर असताना तो २९ सप्टेंबर रोजी चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. आमचा जवान चुकून तुमच्या हद्दीत आला आहे, हे भारताने त्याच दिवशी पाकला कळविले होते. परंतु पाकिस्तानने चंदू चव्हाण त्यांच्या ताब्यात असल्याचे १५ दिवसांनी म्हणजे १३ आॅक्टोबर रोजी मान्य केले होते.भारताने लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)धुळे-जळगावात जल्लोषभारतीय सैन्यदलातील राष्ट्रीय रायफल्स तुकडीचे जवान चंदू चव्हाण यांची शनिवारी पाकिस्तानने सुटका केली़ ही आनंदवार्ता चंदूच्या बोरविहीर या गावी पोहोचताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी चंदूचे मोठे भाऊ भूषणना फोनवरून चंदू सुखरूप परतल्याची माहिती दिली़ त्यामुळे नातेवाइकांना अश्रू अनावर झाले होते़ चंदू चव्हाणना भारताच्या ताब्यात सोपविल्याचे वृत्त टीव्हीवर झळकताच बोरविहीरला फटाक्यांची आतशबाजी सुरू झाली. गावातील तरुणांनी डीजेच्या तालावर बेभान नाचत आनंदोत्सव साजरा केला.औदार्यातही पाकिस्तानची कुरापतसद््भावना म्हणून आणि सीमेवर शांतता व सलोखा कायम राखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण चंदू चव्हाण यास भारताच्या हवाली करत असल्याचे पाकिस्तानने म्हटले. हा मोठेपणाचा आव आणतानाही पाक कुरापत काढायला विसरला नाही. चंदू चव्हाण अनावधानाने नव्हे, तर वरिष्ठांकडून वाईट वागणूक मिळत असल्याने तो स्वत:ला नेमून दिलेले ठिकाण सोडून आमच्या लष्करापुढे शरण आला होता. आम्हीच त्याचे भारतात परत जाण्यासाठी मन वळविले, अशा बढाया पाकिस्तानने मारल्या.