शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

देशात तीन हजार उद्योगांमध्ये प्रदूषणमापक यंत्र बसविणार जावडेकर : रत्नागिरीत प्रतिपादन

By admin | Updated: February 16, 2015 23:31 IST

. प्रदूषण प्रमाणाच्या बाहेर होत असेल तेव्हा संगणक केंद्रात लाल दिवा लागेल. त्यामुळे उद्योजकांना याबाबत फसवणूक करता येणार नाही,

रत्नागिरी : महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांत औद्योगिक प्रदूषणाची समस्या मोठी आहे. प्रदूषण नियंत्रणासाठीचे उपाय करूनही काही उद्योगांकडून त्याचे पालन होत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे १७ प्रकारच्या प्रदूषणकारी उद्योगांमध्ये मोडणाऱ्या तीन हजार कारखान्यांमध्ये येत्या मार्चअखेर प्रदूषण मापक यंत्र बसविले जाणार आहे. हे यंत्र मुख्य संगणक केंद्राशी जोडले जाणार असून, २४ तास प्रदूषण व्यवस्थेवर लक्ष ठेवणार आहे. प्रदूषण प्रमाणाच्या बाहेर होत असेल तेव्हा संगणक केंद्रात लाल दिवा लागेल. त्यामुळे उद्योजकांना याबाबत फसवणूक करता येणार नाही, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.उद्योगधंद्यांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात राहावे यासाठी अनेक प्रयत्न केले. प्रदूषण कमी करणाऱ्या यंत्रणाही बसविल्या. तरीही शासनाचे अधिकारी पाहणीसाठी येतात. त्यावेळीच या यंत्रणा सुरू राहतात व नंतर नियमभंग केला जातो, अशा तक्रारी आल्यामुळेच प्रदूषणाबाबत २४ तास उद्योगांवर निगराणी राहावी, या उद्देशानेच प्रदूषण मापक यंत्रे बसविली जाणार आहेत.पहिल्या टप्प्यात तीन हजार कारखान्यांमध्ये ही यंत्रणा बसविली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यात आणखी जास्त उद्योगांचा समावेश केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)