शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

जपानी कंपन्यांकडून २५ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित

By admin | Updated: September 16, 2015 01:13 IST

जपानमधील उद्योगांकडून महाराष्ट्रात २० ते २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी केला. शिवाय जागतिक बँकेच्या सर्वेक्षणात

मुंबई : जपानमधील उद्योगांकडून महाराष्ट्रात २० ते २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचा दावा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी केला. शिवाय जागतिक बँकेच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात आठव्या क्रमांकावर फेकला जाण्याकरिता मागील सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.देसाई म्हणाले की, जपानमधील किमान ४-५ बड्या उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याकरिता सक्रिय सहमती दर्शविली आहे. प्रत्येक उद्योग किमान ५ ते १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकतो या क्षमतेचा आहे. त्यामुळे २० ते २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. मात्र त्यामुळे रोजगार किती उपलब्ध होईल, ते सांगता येणार नाही. कारण प्रत्येक उद्योगाची रोजगारनिर्मितीची क्षमता भिन्न आहे. उद्योगस्नेह वातावरण निर्माण करण्यात महाराष्ट्र आठव्या स्थानावर असल्याच्या जागतिक बँकेच्या निष्कर्षाकडे लक्ष वेधले असता देसाई म्हणाले की, राज्यात नवे सरकार आल्यावर या दिशेने जून महिन्यापर्यंत झालेल्या प्रयत्नांचीच दखल हा अहवाल तयार करताना घेतली गेली. त्यानंतरच्या प्रयत्नांची दखल घेतली गेली असती तर महाराष्ट्राचा क्रमांक वरचा लागला असता. पुढील सर्वेक्षणात महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये लागेल, असा विश्वास देसार्इंनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)