शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
4
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
5
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
6
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
7
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
8
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
9
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
10
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
11
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
12
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
13
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
14
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
15
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
16
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
17
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
18
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
19
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
20
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर

नक्षलग्रस्त गडचिरोलीत जनजागरण मेळावे

By admin | Updated: June 22, 2014 00:53 IST

जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी आयोजित आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे घेतले. त्यात सामूहिक विवाह योजनेंतर्गत एकूण ९८५ जोडप्यांचे शुभमंगल झाले.

९८५ जोडप्यांचा विवाह : २५ हजार २४७ नागरिकांना मेळाव्यातून मिळाली प्रमाणपत्रेगडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी आयोजित आतापर्यंत ४०७ जनजागरण मेळावे घेतले. त्यात सामूहिक विवाह योजनेंतर्गत एकूण ९८५ जोडप्यांचे शुभमंगल झाले. सन २०१३ या वर्षात सर्वाधिक २०१ जनजागरण मेळावे घेऊन २५ हजार २४७ नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करून त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. गडचिरोली पोलिसांतर्फे जनजागरण मेळावा हा एक प्रभावी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मेळाव्यात प्रशासकीय विभाग सहभागी होतात व नागरिकांना संबंधित विभागाकडील शासकीय योजनांबाबतच्या माहितीचे मार्गदर्शन करण्यात येते. या मेळाव्यात संबंधित विभागाकडून वेगवेगळी प्रमाणपत्रं, जमिनीचे सातबारा वितरण, आर्थिक मदतीचे वाटप, क्रीडा स्पर्धा घेऊन बक्षीस वितरण, सामूहिक विवाह, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. सन २००५ ते ३१ मार्च २०१४ पर्यंत एकूण ४०७ जनजागरण मेळावे घेण्यात आले. यात सामूहिक विवाह योजनेतून एकूण ९८५ जोडप्यांचे विवाह करण्यात आले. ७ हजार ४८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. विविध गावांमध्ये ११५ नवीन विद्युत लाइन जोडण्यात आल्या. २२५ नागरिकांना नवीन वाहन शिकाऊ परवाने देण्यात आले. बी-बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विविध योजनांचे १ हजार ३१२ अर्ज वितरीत करण्यात आले.