शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

‘जलयुक्त’चा निधी गेला परत

By admin | Updated: May 13, 2016 04:01 IST

राज्याला पाणी संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान युद्धपातळीवर राबविले जात आहे.

नागपूर : राज्याला पाणी संकटातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेले ‘जलयुक्त शिवार’ अभियान युद्धपातळीवर राबविले जात आहे. मात्र नागपूर कृषी विभागाला या अभियानातर्गंत मिळालेला १४ लाख रुपयांचा निधी विहित कालावधीत खर्च न झाल्याने परत गेल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरेड तालुक्यातील हा निधी आहे. कृषी विभागाच्या मते, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांना ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता हा निधी प्राप्त झाला होता. त्यावर कृषी विभागाने लगेच बिल तयार करून, त्याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत सर्व बिले ट्रेझरीमध्ये सादर केलीत. परंतु ट्रेझरीमध्ये ते मंजूर न करता परत पाठविण्यात आले. यामुळे तो निधी अखर्चित म्हणून परत गेल्याचे कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या शिवाय कोरडवाहू अभियान आणि भाडेपट्टीचाही अखर्चित निधी शासनाकडे परत गेल्याचे सांगितले जात आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ अभियानातर्गंत अनेक कामे करण्यात आली. शिवाय त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदासुद्धा होत आहे. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच या अभियानाचा निधी परत गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)