शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

‘जलयुक्त’चे श्रेय भाजप-शिवसेना दोघांचे

By admin | Updated: July 2, 2016 04:20 IST

शासनाची जलयुक्त शिवार व शिवसेनेची शिव जलक्रांती या योजनांमुळे राज्यात मोठी जलक्रांती झाली आहे.

पुणे : शासनाची जलयुक्त शिवार व शिवसेनेची शिव जलक्रांती या योजनांमुळे राज्यात मोठी जलक्रांती झाली आहे. यामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून या कामांचे श्रेय केवळ शिवसेनेचे नसून भाजप-सेना सरकारचे आहे, त्यामुळे भविष्यात या चांगल्या कामाचे फळ लोक आम्हाला नक्की देतील, असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केले.लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी पालखी सोहळ््यात दर वर्षी स्वच्छता दिंडीचे आयोजन केले जाते. या स्वच्छता दिंडीचे शुक्रवारी पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रस्थान झाले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते. या दोन्ही योजनांमुळे गेल्या वर्षभरात चांगली कामे झाली आहेत. त्याचे परिणाम लातूर आणि धाराशीव सारख्या दुष्काळी भागात दिसत आहेत. स्वच्छ मनातूनच स्वच्छ कारभार होत असतो, स्वच्छ आचार आणि विचार करणारी नवी पिढी घडविण्यासाठी स्वच्छता मोहिम अत्यंत महत्वाची आहे. त्यामुले स्वच्छतेच्या दिंडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)