ऑनलाइन लोकमत
जालना, दि. ८ - जालना जिल्हयातील भोकरदन तालुक्यातील बेहेड गावात दोन सख्ख्या भावांचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. ईश्वर व अकुंश बावस्कर अशी त्या दोघांची नावे आहेत.
हे दोघेही आज सकाळी शेतात जनावरांना पाणी पाजायला गेले होते. ईश्वर (लहान भाऊ) हा विहीरीतून पाणी काढताना असताना त्याचा तोल गेला व तो विहीरीत पडला. हे पाहताच अंकुशने त्याला वाचवण्यासाठी विहीरीत तत्काळ उडी मारली व पोहत जाऊन त्याने ईश्वरला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ईश्वरने अंकुशला मिठी मारल्याने त्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.