शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे जललेखा आॅडिट

By admin | Updated: June 27, 2016 02:02 IST

पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या जललेखाचे शेतकऱ्यांनी नुकतेच आॅडिट केले आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग- पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या जललेखाचे शेतकऱ्यांनी नुकतेच आॅडिट केले आहे. त्यामुळे आंबा खोरे लाभ क्षेत्राचे खरे वास्तव समोर आले आहे. रिलायन्सच्या औष्णिक प्रकल्पाला कागदावर मंजूर केलेले २०० दलघली (दशलक्ष घनलीटर) पाणी तो प्रकल्प रद्द झाल्याने शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी केली आहे. आंबा खोऱ्याची नेमकी स्थिती काय आहे. याचा अहवाल येत्या एक महिन्यात सादर करण्याचे लघु पाटबंधारे विभागाने मान्य केल्याने गेल्या ४५ वर्षांपासूनची मागणी श्रमिक मुक्ती दलाच्या रेट्यामुळे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.अलिबाग आणि पेण तालुक्यामध्ये २४ एप्रिल १९६९ रोजी आंबा खोरे प्रकल्पाला मान्यता देण्यात आली होती. सरकराने दोन कोटी ८५ लाख रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले होते. त्यानंतर उजवा आणि डावा तीर कालव्यास २ जुलै १९७६ रोजी मान्यता दिली होती. या प्रकल्पामुळे अलिबाग आणि पेण तालुक्यातील २८ गावांतील चार हजार ६६६ हेक्टर शेतीचे क्षेत्र सुजलाम सुफलाम होणार होेते. मात्र गेली ४५ वर्षे उलटूनही हक्काचे पाणी शेतकऱ्यांना अद्याप दिलेले नाही. आंबा खोऱ्यामध्ये २७३ दलघमी (दशलक्ष घनमीटर)पाणीसाठा आहे. त्यातील २७२ दलघमी पाणी बिगर सिंचनासाठी वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी फक्त १८९ दलघमी पाण्याचा वापर होत आहे. त्यातील ८३ दलघमी पाणी शिल्लक आहे. रिलायन्सच्या औष्णिक वीज प्रकल्पासाठी २०० दलघली दररोज पाण्याचे वाटप कागदावर केले आहे. त्याचप्रमाणे पटनी पॉवर ४० दलघली, टाटा पॉवरसाठी ३० दलघली पाण्याचे वाटप केलेले आहे. या पाण्याचा वापर गेली ४५ वर्षे केला गेला नसल्याने कोट्यवधी लीटर पाणी रोजचे समुद्राला जाऊन मिळत आहे. हे सर्व चित्र असताना लघू पाटबंधारे विभागाकडे पाणी शिल्लक नसल्याची ओरड सातत्याने केली जात आहे.आंबा खोऱ्याचे पाणी शेतीला मिळावे, यासाठी श्रमिक मुक्ती दलाने २००७ पासून पाठपुरावा केला. पाटबंधारे विभागाने तयार केलेल्या जललेखाचे आॅडिट नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रिलायन्स कंपनीचा प्रकल्प रद्द झाला आहे. त्यामुळे त्यांना कागदावर मंजूर केलेले २०० दलघली पाणी शेतीला मिळणे शक्य आहे.