मिरज : रेल्वेच्या स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजनेचे दोन पंप नादुरुस्त झाल्याने लातूरला पाणी घेऊन जाणारी ‘जलदूत’ एक्स्प्रेस सोमवारी रद्द करण्यात आली.रेल्वेच्या स्वतंत्र पाणी पुरवठा केंद्राचे दोन पंप नादुरुस्त झाल्याने, त्याचा परिणाम रेल्वेने लातूरला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यावर झाला. लातूरला रेल्वेच्या ५० टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्राजवळील पंप नादुरुस्तीमुळे हैदरखान विहिरीत पुरेसा पाणीसाठा होऊ शकला नाही. विहिरीवर बसविलेल्या एका पंपाद्वारे पाणी उपसा सुरु होता. विहिरीतील अपुऱ्या पाणी साठ्यामुळे सायंकाळपर्यंत ५० टँकरपैकी २७ टँकरच भरल्याने, लातूरला रवाना होणारी ‘जलदूत’ रद्द करण्यात आली. (वार्ताहर)
पंप बिघडल्याने ‘जलदूत’ रद्द
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST