शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

राज्यात जलयुक्त शिवार अभियान

By admin | Updated: January 8, 2015 00:01 IST

जलसंधारणांतर्गत उपाय : २३ जिल्ह्यात , राज्यातील दहा हजारांपेक्षा अधिक गावांत टंचाईसदृश स्थिती

  रत्नागिरी : शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणांतर्गत उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात राबविणार आहे. एकात्मिक पध्दतीने सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यभरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. रत्नागिरीसह अन्य २२ जिल्ह्यातील १९०५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. त्यासाठी अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. अभियानांतर्गत पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. सिंचनक्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करून पाणीपुरवठ्यात वाढ करणे, भूजल अधिनियम अंमलबजावणी, विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेण्यात येणार आहेत. याशिवाय अस्तित्त्वात असलेल्या निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे / गाव तलाव / पाझर तलाव / सिमेंट बंधारे) इत्यादी पाणी साठवण क्षमता पुन:स्थापित करणे. जलस्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देऊन वृक्ष लागवड करणे. पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव जागृती निर्माण करणे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे, पाणी अडविणे-जिरवणेबाबत लोकसहभाग वाढविण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी समन्वय समितीची जिल्ह्यावरच नव्हे; तर तालुकास्तरीय समितीचीही स्थापना करण्यात येणार आहे. १५ ते जानेवारी १९ जानेवारीअखेर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानासाठी मनरेगा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जिल्हा नियोजन समिती निधी, जिल्हा परिषद सेस निधीतून खर्च करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुक्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या दोन तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे. विभागीय तसेच राज्यस्तरीय पारितोषिकांसाठीही तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे. गावातील लोकांना अभियानाची माहिती देण्यासाठी, गावाचा आराखडा अंतिम करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कृषिसेवकांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असताना अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचा लाभ घेता येईल. (प्रतिनिधी) गावपातळीवर प्रयत्न जलशिवार योजनेंतर्गत गावपातळीवर पाण्यासाठी प्रयत्न . पाण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रभावी प्रयत्नांना अधिक बळकटी देणार. जिल्ह्यातून नव्हे; तर तालुक्यातून जलसंवर्धनसाठी समित्या गठीत करण्याचा प्रयत्न. लोकसहभागातून पाणी साठवणीवर भर देणार. जलप्रबोधनाच्या सर्वंकष प्रयत्नाना सर्व स्तरावर सहकार्य करण्याचे आवाहन. चार वर्षांसाठी अभियान राबविण्यासाठीची जलनीती तयार. संस्थांचा सहभाग व सरकारचे प्रयत्न या दोहोंचा समन्वय ठरणार महत्त्वाचा. ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची ठरणार.