शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

राज्यात जलयुक्त शिवार अभियान

By admin | Updated: January 8, 2015 00:01 IST

जलसंधारणांतर्गत उपाय : २३ जिल्ह्यात , राज्यातील दहा हजारांपेक्षा अधिक गावांत टंचाईसदृश स्थिती

  रत्नागिरी : शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणांतर्गत उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात राबविणार आहे. एकात्मिक पध्दतीने सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यभरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. रत्नागिरीसह अन्य २२ जिल्ह्यातील १९०५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. त्यासाठी अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. अभियानांतर्गत पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. सिंचनक्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करून पाणीपुरवठ्यात वाढ करणे, भूजल अधिनियम अंमलबजावणी, विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेण्यात येणार आहेत. याशिवाय अस्तित्त्वात असलेल्या निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे / गाव तलाव / पाझर तलाव / सिमेंट बंधारे) इत्यादी पाणी साठवण क्षमता पुन:स्थापित करणे. जलस्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देऊन वृक्ष लागवड करणे. पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव जागृती निर्माण करणे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे, पाणी अडविणे-जिरवणेबाबत लोकसहभाग वाढविण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी समन्वय समितीची जिल्ह्यावरच नव्हे; तर तालुकास्तरीय समितीचीही स्थापना करण्यात येणार आहे. १५ ते जानेवारी १९ जानेवारीअखेर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानासाठी मनरेगा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जिल्हा नियोजन समिती निधी, जिल्हा परिषद सेस निधीतून खर्च करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुक्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या दोन तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे. विभागीय तसेच राज्यस्तरीय पारितोषिकांसाठीही तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे. गावातील लोकांना अभियानाची माहिती देण्यासाठी, गावाचा आराखडा अंतिम करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कृषिसेवकांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असताना अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचा लाभ घेता येईल. (प्रतिनिधी) गावपातळीवर प्रयत्न जलशिवार योजनेंतर्गत गावपातळीवर पाण्यासाठी प्रयत्न . पाण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रभावी प्रयत्नांना अधिक बळकटी देणार. जिल्ह्यातून नव्हे; तर तालुक्यातून जलसंवर्धनसाठी समित्या गठीत करण्याचा प्रयत्न. लोकसहभागातून पाणी साठवणीवर भर देणार. जलप्रबोधनाच्या सर्वंकष प्रयत्नाना सर्व स्तरावर सहकार्य करण्याचे आवाहन. चार वर्षांसाठी अभियान राबविण्यासाठीची जलनीती तयार. संस्थांचा सहभाग व सरकारचे प्रयत्न या दोहोंचा समन्वय ठरणार महत्त्वाचा. ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची ठरणार.