शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जलयुक्त शिवार अभियान

By admin | Updated: January 8, 2015 00:01 IST

जलसंधारणांतर्गत उपाय : २३ जिल्ह्यात , राज्यातील दहा हजारांपेक्षा अधिक गावांत टंचाईसदृश स्थिती

  रत्नागिरी : शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणांतर्गत उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात राबविणार आहे. एकात्मिक पध्दतीने सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यभरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. रत्नागिरीसह अन्य २२ जिल्ह्यातील १९०५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. त्यासाठी अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. अभियानांतर्गत पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. सिंचनक्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करून पाणीपुरवठ्यात वाढ करणे, भूजल अधिनियम अंमलबजावणी, विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेण्यात येणार आहेत. याशिवाय अस्तित्त्वात असलेल्या निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे / गाव तलाव / पाझर तलाव / सिमेंट बंधारे) इत्यादी पाणी साठवण क्षमता पुन:स्थापित करणे. जलस्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देऊन वृक्ष लागवड करणे. पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव जागृती निर्माण करणे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे, पाणी अडविणे-जिरवणेबाबत लोकसहभाग वाढविण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी समन्वय समितीची जिल्ह्यावरच नव्हे; तर तालुकास्तरीय समितीचीही स्थापना करण्यात येणार आहे. १५ ते जानेवारी १९ जानेवारीअखेर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानासाठी मनरेगा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जिल्हा नियोजन समिती निधी, जिल्हा परिषद सेस निधीतून खर्च करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुक्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या दोन तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे. विभागीय तसेच राज्यस्तरीय पारितोषिकांसाठीही तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे. गावातील लोकांना अभियानाची माहिती देण्यासाठी, गावाचा आराखडा अंतिम करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कृषिसेवकांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असताना अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचा लाभ घेता येईल. (प्रतिनिधी) गावपातळीवर प्रयत्न जलशिवार योजनेंतर्गत गावपातळीवर पाण्यासाठी प्रयत्न . पाण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रभावी प्रयत्नांना अधिक बळकटी देणार. जिल्ह्यातून नव्हे; तर तालुक्यातून जलसंवर्धनसाठी समित्या गठीत करण्याचा प्रयत्न. लोकसहभागातून पाणी साठवणीवर भर देणार. जलप्रबोधनाच्या सर्वंकष प्रयत्नाना सर्व स्तरावर सहकार्य करण्याचे आवाहन. चार वर्षांसाठी अभियान राबविण्यासाठीची जलनीती तयार. संस्थांचा सहभाग व सरकारचे प्रयत्न या दोहोंचा समन्वय ठरणार महत्त्वाचा. ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची ठरणार.