शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जलयुक्त शिवार अभियान

By admin | Updated: January 8, 2015 00:01 IST

जलसंधारणांतर्गत उपाय : २३ जिल्ह्यात , राज्यातील दहा हजारांपेक्षा अधिक गावांत टंचाईसदृश स्थिती

  रत्नागिरी : शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्यासाठी जलसंधारणांतर्गत उपाययोजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्यात राबविणार आहे. एकात्मिक पध्दतीने सर्व विभागांच्या समन्वयाने नियोजनबध्द आराखडा तयार करण्यात येणार आहे. राज्यभरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. रत्नागिरीसह अन्य २२ जिल्ह्यातील १९०५९ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती जाहीर झाली आहे. त्यासाठी अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. अभियानांतर्गत पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारात अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. सिंचनक्षेत्रात वाढ करून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुन्हा कार्यान्वित करून पाणीपुरवठ्यात वाढ करणे, भूजल अधिनियम अंमलबजावणी, विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करणे, पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेण्यात येणार आहेत. याशिवाय अस्तित्त्वात असलेल्या निकामी झालेल्या जलस्रोतांची (बंधारे / गाव तलाव / पाझर तलाव / सिमेंट बंधारे) इत्यादी पाणी साठवण क्षमता पुन:स्थापित करणे. जलस्रोतांमधील गाळ लोकसहभागातून काढून पाणीसाठा वाढविणे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देऊन वृक्ष लागवड करणे. पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीव जागृती निर्माण करणे. पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास प्रोत्साहन देणे, पाणी अडविणे-जिरवणेबाबत लोकसहभाग वाढविण्यात येणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी समन्वय समितीची जिल्ह्यावरच नव्हे; तर तालुकास्तरीय समितीचीही स्थापना करण्यात येणार आहे. १५ ते जानेवारी १९ जानेवारीअखेर अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अभियानासाठी मनरेगा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जिल्हा नियोजन समिती निधी, जिल्हा परिषद सेस निधीतून खर्च करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तालुक्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य केलेल्या दोन तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे. विभागीय तसेच राज्यस्तरीय पारितोषिकांसाठीही तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे. गावातील लोकांना अभियानाची माहिती देण्यासाठी, गावाचा आराखडा अंतिम करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कृषिसेवकांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली असताना अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचा लाभ घेता येईल. (प्रतिनिधी) गावपातळीवर प्रयत्न जलशिवार योजनेंतर्गत गावपातळीवर पाण्यासाठी प्रयत्न . पाण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रभावी प्रयत्नांना अधिक बळकटी देणार. जिल्ह्यातून नव्हे; तर तालुक्यातून जलसंवर्धनसाठी समित्या गठीत करण्याचा प्रयत्न. लोकसहभागातून पाणी साठवणीवर भर देणार. जलप्रबोधनाच्या सर्वंकष प्रयत्नाना सर्व स्तरावर सहकार्य करण्याचे आवाहन. चार वर्षांसाठी अभियान राबविण्यासाठीची जलनीती तयार. संस्थांचा सहभाग व सरकारचे प्रयत्न या दोहोंचा समन्वय ठरणार महत्त्वाचा. ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची ठरणार.