शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जैतापूर प्रकल्प करणारच

By admin | Updated: May 24, 2015 01:53 IST

राज्यातील विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी जैतापूर प्रकल्प होणे गरजेचा असून, शिवसेनेचा त्याला पूर्वीपासून विरोध आहे.

कोल्हापूर : राज्यातील विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी जैतापूर प्रकल्प होणे गरजेचा असून, शिवसेनेचा त्याला पूर्वीपासून विरोध आहे. कोणीही, कितीही विरोध केला तरी हा प्रकल्प करणारच, असा निर्धार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. शिवसेनेने प्रत्येक मुद्द्यावर टीका करीत बसण्यापेक्षा एकत्र बसून चर्चा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला. भूकंपग्रस्त नेपाळला मदत केल्याबद्दल शिवसेना व काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याकडे लक्ष वेधले असता दानवे म्हणाले, काँग्रेसने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. शिवसेना सरकारमध्ये आहे; पण त्यांनी दोन-तीन वक्तव्ये चुकीची केलेली आहे. त्यांनी टीका करण्यापेक्षा त्यांच्या शंका व सूचना स्वीकारण्यास आम्ही तयार आहे. सहा महिन्यांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मी स्वत: भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले.ग्रामपंचायत पातळीपर्यंत पक्ष पोहोचविण्याचे आदेश पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याने हा एक प्रकारचा शिवसेनेला शह नव्हे काय, याबाबत बोलताना दानवे म्हणाले, आपापला पक्ष वाढविण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. इतरांनीही ते करावेत. (प्रतिनिधी) अटलजी आमच्या हृदयात कार्यकारिणी बैठकीसाठी लावण्यात आलेल्या डिजिटल पोस्टरवर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा फोटो नाही. भाजपा अटलजींना विसरला काय, असा प्रश्न उपस्थित केला असता फोटो नसला म्हणजे त्याचा अर्थ विसरला असे होत नाही. प्रत्येक पक्षकार्यकर्त्याच्या हृदयात अटलजी असल्याचे दानवे यांनी सांगितले. अधिवेशनापूर्वी विस्तारराज्य मंत्रिमंडळ व महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्याने कोणी नाराज नाही. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची घोषणाही दानवे यांनी केली.