शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

गणेशोत्सवाआधी जैतापूर पेटणार; संघर्ष समितीचा इशारा

By admin | Updated: August 3, 2016 02:22 IST

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माडबन, जैतापूर, मिठगावणे पंचक्रोशी संघर्ष समितीने दिला आहे.

मुंबई : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाआधी भेट दिली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा माडबन, जैतापूर, मिठगावणे पंचक्रोशी संघर्ष समितीने दिला आहे. संघर्ष समितीने प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मंगळवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघधरे म्हणाले की, प्रकल्पाला सातत्याने विरोध करूनही सरकार दखल घेत नाही. त्यामुळे अखेरचा मार्ग म्हणून जैतापूर प्रकल्पावर मोर्चा काढण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने पर्यावरण राज्यमंत्री रामदास कदम यांची भेट घेतली. त्यात २६ नोव्हेंबर २०१५ रोजी प्रकल्पाची पर्यावरणीय मुदत संपल्याचे संघर्ष समितीने कदम यांच्या निदर्शनास आणून दिले. कायद्यानुसार प्रकल्पाचा अहवाल पुन्हा तयार करून जनसुनावणी आवश्यक असल्याचेही संघर्ष समितीने स्पष्ट केले. यावर कदम यांनी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवले आहे. मात्र जावडेकरांकडून कोणतेही उत्तर आले नसल्याचा आरोप संघर्ष समितीने केला आहे. (प्रतिनिधी)