शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जैतापूर प्रकल्प विरोध कळीचा मुद्दा ठरणार?

By admin | Updated: October 22, 2014 23:16 IST

शिवसेना कात्रीत : भाजपचे ऐकून सत्तेत सहभाग की लोकांसोबत राहणार..

रत्नागिरी : राज्यातील सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावर काय तडजोड होणार, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. पाठिंबा देताना शिवसेना हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी ठाम ठेवणार की प्रकल्प होणार ही भाजपची भूमिका ठाम राहणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.देशातील सुमारे १० हजार मेगावॅट अणुऊर्जा निर्माण करणारा प्रकल्प जैतापूर परिसरात आला असून, त्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पातून होणाऱ्या रेडिएशनमुळे भातशेती, बागायती, मासेमारीसह मानवी जीवनावर दुष्परिणाम होतील, या भीतीमुळे इथल्या जनतेचा कडाडून विरोध आहे. शिवसेनेनेदेखील याच मुद्द्यावरुन प्रकल्पाला प्रखर विरोध करत मागील काही निवडणुकांप्रमाणे यंदा ही निवडणूक जिंकली. केंद्रात व राज्यात आमचे सरकार आल्यावर हा प्रकल्प घालवल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन सेनेने प्रकल्पविरोधकांना अनेकदा दिले होते. त्यानंतर केंद्रात भाजपप्रणित एनडीएचे सरकार स्थापन झाले. त्यामध्ये शिवसेना सहभागी आहे. मात्र, भाजपने या प्रकल्पाचे समर्थन केल्याने शिवसेना अडचणीत सापडली होती. विधानसभा निवडणुकीपर्यंत सेनेला जैतापूर प्रकल्प रद्द करता आला नाही. त्याचा लाभ काँग्रेस-राष्ट्रवादीने घ्यायला सुरुवात केली. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपात तडजोड न झाल्याने युती तुटली आणि अडकित्त्यात सापडलेली सेना सुटली. कारण तुटलेल्या युतीच्या निमित्ताने भाजपवर अणुऊर्जा मुद्द्यावर हल्ला करायला मोकळीक मिळाली होती. पण, ती सेनेने साधली नाही. आता तर भाजपबरोबर शिवसेना सत्ते सहभागी होण्याची वेळ नजिक आली असताना पुन्हा जैतापूरचा मुद्दा पुढे येऊ शकेल असे वाटत आहे. (प्रतिनिधी)