शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूरमुळे शिवसेनेची कोंडी पेच : सत्तेत राहायचे की विरोधी भूमिकेत

By admin | Updated: May 15, 2015 05:00 IST

कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना ठणकावून सांगितल्यामुळे आता जैतापूरच्या गुंत्यातून आपला

मुंबई : कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना ठणकावून सांगितल्यामुळे आता जैतापूरच्या गुंत्यातून आपला पाय कसा सोडवून घ्यायचा असा प्रश्न शिवसेना नेतृत्वाला पडला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक झाली. जैतापूर अणुऊर्जा कराराशी आंतरराष्ट्रीय राजकारण व दोन देशांचे संबंध जोडलेले आहेत. त्याचबरोबर जैतापूर प्रकल्पाकरिता ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या त्यांना घसघशीत पॅकेज मिळालेले असल्याने या आंदोलनाला असलेला पाठिंबा कमकुवत झाला आहे. अलीकडेच खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जैतापूरवासीयांचे आंदोलन फ्लॉप झाले होते. त्यामुळे कोकणवासीयांना दिलेले आश्वासन आणि प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदींनी घेतलेली ठाम भूमिका अशा कोंडीत शिवसेना सापडली आहे. जीएसटीमुळे अस्वस्थताजैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पापेक्षा गुडस अँड सर्व्हीसेस टॅक्स (जीएसटी) लागू करण्याचा निर्णय शिवसेनेला अधिक अस्वस्थ करणारा आहे. यामुळे महापालिकेच्या आर्थिक नाड्या केंद्र सरकारच्या हाती जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मागील आठवड्यात ठाकरे यांची भेट घेतली व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही शिवसेनेचे समाधान झालेले नाही. बाळासाहेब ठाकरे शिवग्राम योजनादिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे शिवग्राम योजना सुरु करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. ज्या गावात वीज पुरवठा होत नाही त्या गावात सौरऊर्जा पुरवणे किंवा ज्या गावात पाणीपुरवठा होत नाही त्या गावात स्वच्छ पाणी पुरवायचे अशी ही योजना आहे. मात्र या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंजुरी देतात की कसे, याबाबतही साशंकता आहे.(विशेष प्रतिनिधी)