शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जैतापूरमुळे शिवसेनेची कोंडी पेच : सत्तेत राहायचे की विरोधी भूमिकेत

By admin | Updated: May 15, 2015 05:00 IST

कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना ठणकावून सांगितल्यामुळे आता जैतापूरच्या गुंत्यातून आपला

मुंबई : कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना ठणकावून सांगितल्यामुळे आता जैतापूरच्या गुंत्यातून आपला पाय कसा सोडवून घ्यायचा असा प्रश्न शिवसेना नेतृत्वाला पडला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक झाली. जैतापूर अणुऊर्जा कराराशी आंतरराष्ट्रीय राजकारण व दोन देशांचे संबंध जोडलेले आहेत. त्याचबरोबर जैतापूर प्रकल्पाकरिता ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या त्यांना घसघशीत पॅकेज मिळालेले असल्याने या आंदोलनाला असलेला पाठिंबा कमकुवत झाला आहे. अलीकडेच खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जैतापूरवासीयांचे आंदोलन फ्लॉप झाले होते. त्यामुळे कोकणवासीयांना दिलेले आश्वासन आणि प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदींनी घेतलेली ठाम भूमिका अशा कोंडीत शिवसेना सापडली आहे. जीएसटीमुळे अस्वस्थताजैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पापेक्षा गुडस अँड सर्व्हीसेस टॅक्स (जीएसटी) लागू करण्याचा निर्णय शिवसेनेला अधिक अस्वस्थ करणारा आहे. यामुळे महापालिकेच्या आर्थिक नाड्या केंद्र सरकारच्या हाती जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मागील आठवड्यात ठाकरे यांची भेट घेतली व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही शिवसेनेचे समाधान झालेले नाही. बाळासाहेब ठाकरे शिवग्राम योजनादिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे शिवग्राम योजना सुरु करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. ज्या गावात वीज पुरवठा होत नाही त्या गावात सौरऊर्जा पुरवणे किंवा ज्या गावात पाणीपुरवठा होत नाही त्या गावात स्वच्छ पाणी पुरवायचे अशी ही योजना आहे. मात्र या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंजुरी देतात की कसे, याबाबतही साशंकता आहे.(विशेष प्रतिनिधी)