शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

जैतापूरमुळे शिवसेनेची कोंडी पेच : सत्तेत राहायचे की विरोधी भूमिकेत

By admin | Updated: May 15, 2015 05:00 IST

कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना ठणकावून सांगितल्यामुळे आता जैतापूरच्या गुंत्यातून आपला

मुंबई : कोणत्याही परिस्थितीत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रद्द केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना ठणकावून सांगितल्यामुळे आता जैतापूरच्या गुंत्यातून आपला पाय कसा सोडवून घ्यायचा असा प्रश्न शिवसेना नेतृत्वाला पडला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासोबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर बैठक झाली. जैतापूर अणुऊर्जा कराराशी आंतरराष्ट्रीय राजकारण व दोन देशांचे संबंध जोडलेले आहेत. त्याचबरोबर जैतापूर प्रकल्पाकरिता ज्यांच्या जमिनी घेण्यात आल्या त्यांना घसघशीत पॅकेज मिळालेले असल्याने या आंदोलनाला असलेला पाठिंबा कमकुवत झाला आहे. अलीकडेच खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जैतापूरवासीयांचे आंदोलन फ्लॉप झाले होते. त्यामुळे कोकणवासीयांना दिलेले आश्वासन आणि प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदींनी घेतलेली ठाम भूमिका अशा कोंडीत शिवसेना सापडली आहे. जीएसटीमुळे अस्वस्थताजैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पापेक्षा गुडस अँड सर्व्हीसेस टॅक्स (जीएसटी) लागू करण्याचा निर्णय शिवसेनेला अधिक अस्वस्थ करणारा आहे. यामुळे महापालिकेच्या आर्थिक नाड्या केंद्र सरकारच्या हाती जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मागील आठवड्यात ठाकरे यांची भेट घेतली व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही शिवसेनेचे समाधान झालेले नाही. बाळासाहेब ठाकरे शिवग्राम योजनादिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे शिवग्राम योजना सुरु करण्याचा शिवसेनेचा मानस आहे. ज्या गावात वीज पुरवठा होत नाही त्या गावात सौरऊर्जा पुरवणे किंवा ज्या गावात पाणीपुरवठा होत नाही त्या गावात स्वच्छ पाणी पुरवायचे अशी ही योजना आहे. मात्र या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंजुरी देतात की कसे, याबाबतही साशंकता आहे.(विशेष प्रतिनिधी)