शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘जय’ची शोधमोहीम आटोपली

By admin | Updated: September 29, 2016 19:50 IST

उमरेड-करांडा अभयारण्यातून चार महिन्यांपासून बेपत्ता ‘जय’ नामक वाघाच्या शोधासाठी राज्यातील वनांमध्ये बुधवारी मोहीम आटोपली

गणेश वासनिक/ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 29 - पेंच अभयारण्यांतर्गत येणाऱ्या उमरेड-करांडा अभयारण्यातून चार महिन्यांपासून बेपत्ता ‘जय’ नामक वाघाच्या शोधासाठी राज्यातील वनांमध्ये बुधवारी मोहीम आटोपली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी, उपवनसंरक्षक ते मुख्य वनसंरक्षक असा अहवालाचा प्रवास राहणार आहे. या अहवालात ‘जय’च्या अस्तित्वाची माहिती राहणार आहे. २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत वनपाल, वनरक्षकांनी जंगलात पायी वारी करून ‘जय’बाबतचे पुरावे गोळा करण्यासाठी शोधमोहीम पूर्ण केली आहे. ९ एप्रिल २०१६ रोजी ‘जय’ दिसल्याची नोंद वनविभागात करण्यात आली आहे. त्यानंतर ‘जय’ हा कधीही वनकर्मचारी अथवा पर्यटकांना दिसला नाही. ‘जय’ या वाघाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर असताना पेंच अभयारण्य क्षेत्रसंचालकांनी ही माहिती राज्य शासन अथवा प्रधान मुख्य वनसचिवांना का दिली नाही? याबाबत वनविभागात तर्कवितर्क लावले जात आहे. भंडारा- गोंदियाचे खा. नाना पटोले यांनी ‘जय’ कुठे आहे? हा मुद्दा उपस्थित करून वनविभागाच्या कारभारावर बोट ठेवले. त्यानंतर ‘जय’ गायब झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही ‘जय’चा विषय प्रकर्षाने हाताळावा लागला. केंद्राकडे ‘जय’संदर्भात सीबीआय चौकशी करण्याची तयारीदेखील वनमंत्री मुनगंटीवार यांनी दर्शविली. केंद्र आणि राज्य शासन ‘जय’ गायब झाल्याबाबत गांभीर्याने घेत असताना वनविभाग मात्र हा विषय ‘हलक्याने’ घेत असल्याचे वास्तव आहे. ९ एप्रिलनंतर ‘जय’ दिसून आला नाही. ही बाब वरिष्ठांनी पाच महिने का लपवूून ठेवली, यामागे बरेच काही दडले असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात गायब झालेला वाघ निदर्शनास येत नसताना आता पाच महिन्यांनंतर शोधमोहीम म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा वनविभागाचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत शोधमोहीम राबविताना ‘जय’ पेंच सोडून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागपूर रेंज पहिला टप्पा आटोपल्यानंतर राज्यभरात जंगल, व्याघ्र प्रकल्पांमध्ये तीन दिवस विशेष सूक्ष्म निरीक्षण मोहीम राबविण्यात आली. मात्र, या तीन दिवसांत कुठेही ‘जय’बाबतचे ठोस पुरावे आढळले नाहीत. ‘जय’ राज्यातील कोणत्याही जंगलात नसेल तर तो गेला कुठे? याचा खुलासा केव्हा आणि कोण करणार, हा सवाल आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आदी भागात विस्तीर्ण जंगलांमध्ये वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी ‘जय’चा शोध घेण्यासाठी सर्च आॅपेरशन केले असले तरी काहीच पुरावे मिळालेले नाहीत.स्थानिकांवर संशयाची सुईउमरेड-करांडा अभयारण्यातून पाच महिन्यांपूर्वी गायब झालेल्या‘जय’चा अद्यापही शोध लागू शकला नाही. सर्च आॅपरेशन, विशेष शोधमोहीम, तपासकार्य आदी बाबी पूर्ण करूनही ‘जय’चा पत्ता लागला नाही. त्यामुळे ‘जय’बाबत स्थानिकांवर संशयाची सुई वनविभागाने वळविली आहे. वनविभागाच्या रेकॉर्डवर असलेल्या स्थानिक शिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्करांसोबत स्थानिकांचे संबंध त्यानिमित्ताने शोधून काढले जाणार आहेत. ‘‘जिल्ह्यातील चारही वनपरिक्षेत्रस्तराहून ‘जय’ची शोधमोहीम आटोपल्यानंतरचा अहवाल अप्राप्त आहे. सूक्ष्म निरीक्षणांती नेमके अहवालात काय समोर येते, ही माहिती वरिष्ठांकडे पाठविली जाईल.

- हेमंत मीना,उपवनसंरक्षक, अमरावती