शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

‘जय’ची शोधमोहीम आटोपली

By admin | Updated: September 29, 2016 19:50 IST

उमरेड-करांडा अभयारण्यातून चार महिन्यांपासून बेपत्ता ‘जय’ नामक वाघाच्या शोधासाठी राज्यातील वनांमध्ये बुधवारी मोहीम आटोपली

गणेश वासनिक/ऑनलाइन लोकमतअमरावती, दि. 29 - पेंच अभयारण्यांतर्गत येणाऱ्या उमरेड-करांडा अभयारण्यातून चार महिन्यांपासून बेपत्ता ‘जय’ नामक वाघाच्या शोधासाठी राज्यातील वनांमध्ये बुधवारी मोहीम आटोपली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी, उपवनसंरक्षक ते मुख्य वनसंरक्षक असा अहवालाचा प्रवास राहणार आहे. या अहवालात ‘जय’च्या अस्तित्वाची माहिती राहणार आहे. २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत वनपाल, वनरक्षकांनी जंगलात पायी वारी करून ‘जय’बाबतचे पुरावे गोळा करण्यासाठी शोधमोहीम पूर्ण केली आहे. ९ एप्रिल २०१६ रोजी ‘जय’ दिसल्याची नोंद वनविभागात करण्यात आली आहे. त्यानंतर ‘जय’ हा कधीही वनकर्मचारी अथवा पर्यटकांना दिसला नाही. ‘जय’ या वाघाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर असताना पेंच अभयारण्य क्षेत्रसंचालकांनी ही माहिती राज्य शासन अथवा प्रधान मुख्य वनसचिवांना का दिली नाही? याबाबत वनविभागात तर्कवितर्क लावले जात आहे. भंडारा- गोंदियाचे खा. नाना पटोले यांनी ‘जय’ कुठे आहे? हा मुद्दा उपस्थित करून वनविभागाच्या कारभारावर बोट ठेवले. त्यानंतर ‘जय’ गायब झाल्याचा मुद्दा ऐरणीवर आला. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही ‘जय’चा विषय प्रकर्षाने हाताळावा लागला. केंद्राकडे ‘जय’संदर्भात सीबीआय चौकशी करण्याची तयारीदेखील वनमंत्री मुनगंटीवार यांनी दर्शविली. केंद्र आणि राज्य शासन ‘जय’ गायब झाल्याबाबत गांभीर्याने घेत असताना वनविभाग मात्र हा विषय ‘हलक्याने’ घेत असल्याचे वास्तव आहे. ९ एप्रिलनंतर ‘जय’ दिसून आला नाही. ही बाब वरिष्ठांनी पाच महिने का लपवूून ठेवली, यामागे बरेच काही दडले असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात गायब झालेला वाघ निदर्शनास येत नसताना आता पाच महिन्यांनंतर शोधमोहीम म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ असा वनविभागाचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत शोधमोहीम राबविताना ‘जय’ पेंच सोडून अन्य ठिकाणी स्थलांतरित झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागपूर रेंज पहिला टप्पा आटोपल्यानंतर राज्यभरात जंगल, व्याघ्र प्रकल्पांमध्ये तीन दिवस विशेष सूक्ष्म निरीक्षण मोहीम राबविण्यात आली. मात्र, या तीन दिवसांत कुठेही ‘जय’बाबतचे ठोस पुरावे आढळले नाहीत. ‘जय’ राज्यातील कोणत्याही जंगलात नसेल तर तो गेला कुठे? याचा खुलासा केव्हा आणि कोण करणार, हा सवाल आहे. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र आदी भागात विस्तीर्ण जंगलांमध्ये वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी ‘जय’चा शोध घेण्यासाठी सर्च आॅपेरशन केले असले तरी काहीच पुरावे मिळालेले नाहीत.स्थानिकांवर संशयाची सुईउमरेड-करांडा अभयारण्यातून पाच महिन्यांपूर्वी गायब झालेल्या‘जय’चा अद्यापही शोध लागू शकला नाही. सर्च आॅपरेशन, विशेष शोधमोहीम, तपासकार्य आदी बाबी पूर्ण करूनही ‘जय’चा पत्ता लागला नाही. त्यामुळे ‘जय’बाबत स्थानिकांवर संशयाची सुई वनविभागाने वळविली आहे. वनविभागाच्या रेकॉर्डवर असलेल्या स्थानिक शिकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्करांसोबत स्थानिकांचे संबंध त्यानिमित्ताने शोधून काढले जाणार आहेत. ‘‘जिल्ह्यातील चारही वनपरिक्षेत्रस्तराहून ‘जय’ची शोधमोहीम आटोपल्यानंतरचा अहवाल अप्राप्त आहे. सूक्ष्म निरीक्षणांती नेमके अहवालात काय समोर येते, ही माहिती वरिष्ठांकडे पाठविली जाईल.

- हेमंत मीना,उपवनसंरक्षक, अमरावती