शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

जैन तत्त्वज्ञान केंद्र जगात सर्वोत्कृष्ट ठरेल

By admin | Updated: July 20, 2015 01:08 IST

उच्चशिक्षणाची व्यवस्था नसताना कचनेर (ता. औरंगाबाद) येथे जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राला विद्यापीठाची मंजुरी मिळाली आहे.

कचनेर (जि. औरंगाबाद) : उच्चशिक्षणाची व्यवस्था नसताना कचनेर (ता. औरंगाबाद) येथे जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राला विद्यापीठाची मंजुरी मिळाली आहे. मात्र केंद्रातील पायाभूत सुविधा व गं्रथसंपदेमुळे ते जगातील सर्वोत्कृष्ट केंद्र होईल, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी येथे व्यक्त केला. श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेर ट्रस्टअंतर्गत विद्यापीठ मान्यताप्राप्त जैन तत्त्वज्ञान संशोधन केंद्राचे चोपडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. चोपडे म्हणाले की, इतिहासात मानव जातीच्या विकासासाठी भगवान महावीर व भगवान बुद्धांचे विचार अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. या केंद्राद्वारे मानवाच्या विकासाबाबत उत्कृष्ट संशोधन व्हावे.जैन तत्त्वज्ञान आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे मानले जाते. केंद्राच्या माध्यमातून येथे आंतरराष्ट्रीय परिषद घेऊन जैन तत्त्वज्ञानाचा जगभर प्रचार व प्रसार करण्यात मदत होईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष व पुणे विभागाचे विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काले म्हणाले की, जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जैन तत्त्वज्ञानाची आवश्यकता आहे.