शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
3
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
4
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
5
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
6
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
7
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
8
इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
9
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
10
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
11
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
12
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
13
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
14
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
15
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
16
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
17
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
18
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
19
Iran Israel War: इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
20
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले

सामाजिक कार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे- मुख्यमंत्री

By admin | Updated: July 2, 2017 18:32 IST

जैन समाजाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सामाजिक कार्यातही जैन समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - जैन समाजाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सामाजिक कार्यातही जैन समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जैन धर्माचे विचार त्या समाजातील वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. यापद्धतीने पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली "सबका साथ, सबका विकास" हाच नारा घेऊन आम्ही काम करीत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जैन समाज बांधवांच्या वतीने आयोजित जैन इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन (जिओ) "मेगा बिझनेस जिओ कॉन्फरन्स"मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, अभिनेता जॅकी श्रॉफ, आमदार ॲड. आशिष शेलार, परमपूज्य नया पद्मसागर महाराज, चित्रपट निर्माते आनंद रॉय, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अंजली विजय रूपानी आदींसह देशातील विविध ठिकाणी कार्यरत असणारे जैन बांधव उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, शतकानुशतके आपण अनेक कथा ऐकत आलो आहोत, त्यानुसार जेव्हा पुण्य एकत्र येते तिथे सर्व जण नतमस्तक होतात. अशा प्रकारे आदरणीय नया पद्मसागर महाराज यांचे जैन समाजासाठीचे कार्य खूप मोठे असल्याने त्यांच्यापुढे सर्वजण नतमस्तक होतात. जैन समाजापर्यंत विचार पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत नाही. या समाजाने व्यापारी जगतात आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे देशाच्या विकासातील त्यांचे योगदान आपल्याला ठळकपणे जाणवणारे आहे. जैन समाजाने 17 हजार गावांत जलसाक्षरतेचे काम केले आहे, ते खरंच उल्लेखनीय आहे. आदरणीय नया पद्मसागर महाराज यांच्या प्रेरणादायी विचारातून या कामाला गती मिळाली. गुजरात सरकारप्रमाणे आम्हीही गोरक्षण करणे महत्वाचे मानतो. कारण ज्याठिकाणी गो-रक्षा केली जात नाही तो प्रदेश, तिथे असणारी जमिनीची सुपीकता कमी होते असे आढळून आले आहे. आपली घटना देखील दुधाळ पशूंचे संवर्धन करावे असे सांगते. गोरक्षण फक्त धार्मिक गोष्टीशी निगडीत नाही, आपले अनेक धर्मातील सिद्धांत विज्ञानाशी जोडले गेले आहेत. नुकताच देशात जीएसटी कायदा लागू झाला असून, एक देश एक कर यामुळे विकासाला चालना मिळेल. जीएसटीच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक वाढून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यातून देशाचा जीडीपी 4 टक्के वाढण्यास मदत होणार आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.केंद्रीय वित्त राज्यमंत्री मेघवाल म्हणाले, जीएसटीचा सर्वसामान्यांसह सर्वांनाच फायदा होणार आहे. या कायद्याचे आपण सर्वांनी पालन करूया. सर्वसामान्य माणसाचे आयुष्य आनंदी व्हावे, हाच यामागचा हेतू आहे, जीएसटी आपले भविष्य आहे.गुजरातचे मुख्यमंत्री रूपानी म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून गुणवत्ता आणि अविरत सेवेचे व्रत आम्ही अंगीकारले आहे. मुख्यमंत्री हे पद नसून ती एक जबाबदारी आहे. या पदामुळे मिळालेली प्रतिष्ठा नसून ती परीक्षा आहे. विकासाच्या प्रवाहात शेवटच्या घटकाला सामावून घेण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्नशील आहोत. जगा आणि जगू द्या हे जैन समाजाचे तत्वज्ञान आम्ही आमच्या कार्यातूनही करीत आहोत. गुजरातमध्ये गोरक्षेसाठी कायदा कडक केला आहे. पतंग महोत्सवामध्ये पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी करुणा अभियान राबविले. याप्रमाणेच स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवित आहोत.यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जिओ भामा पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. जिओ भामा पुरस्काराने निर्मल सेठयाजी, अभय श्रीराम, कांतीलाल राम बिहार, नवनीत परिवारचे बाबूलाल बिहार, नरेशभाई, श्रुतीभाई आदींचा सन्मान करण्यात आला. जैन समाजाच्या वतीने महिला साध्वींच्या श्रमणी विहारम यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. जिओ टीमची यावेळी घोषणा करण्यात आली.