शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

सामाजिक कार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे- मुख्यमंत्री

By admin | Updated: July 2, 2017 18:32 IST

जैन समाजाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सामाजिक कार्यातही जैन समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 2 - जैन समाजाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, सामाजिक कार्यातही जैन समाजाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जैन धर्माचे विचार त्या समाजातील वेगवेगळ्या पदांवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी सर्व समाजापर्यंत पोहोचविण्याचे उत्कृष्ट काम केले आहे. यापद्धतीने पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली "सबका साथ, सबका विकास" हाच नारा घेऊन आम्ही काम करीत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जैन समाज बांधवांच्या वतीने आयोजित जैन इंटरनॅशनल ऑर्गनायजेशन (जिओ) "मेगा बिझनेस जिओ कॉन्फरन्स"मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, अभिनेता जॅकी श्रॉफ, आमदार ॲड. आशिष शेलार, परमपूज्य नया पद्मसागर महाराज, चित्रपट निर्माते आनंद रॉय, गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अंजली विजय रूपानी आदींसह देशातील विविध ठिकाणी कार्यरत असणारे जैन बांधव उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, शतकानुशतके आपण अनेक कथा ऐकत आलो आहोत, त्यानुसार जेव्हा पुण्य एकत्र येते तिथे सर्व जण नतमस्तक होतात. अशा प्रकारे आदरणीय नया पद्मसागर महाराज यांचे जैन समाजासाठीचे कार्य खूप मोठे असल्याने त्यांच्यापुढे सर्वजण नतमस्तक होतात. जैन समाजापर्यंत विचार पोहोचविण्याच्या त्यांच्या कार्याची तुलनाच होऊ शकत नाही. या समाजाने व्यापारी जगतात आपल्या उत्कृष्ट कामगिरीचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे देशाच्या विकासातील त्यांचे योगदान आपल्याला ठळकपणे जाणवणारे आहे. जैन समाजाने 17 हजार गावांत जलसाक्षरतेचे काम केले आहे, ते खरंच उल्लेखनीय आहे. आदरणीय नया पद्मसागर महाराज यांच्या प्रेरणादायी विचारातून या कामाला गती मिळाली. गुजरात सरकारप्रमाणे आम्हीही गोरक्षण करणे महत्वाचे मानतो. कारण ज्याठिकाणी गो-रक्षा केली जात नाही तो प्रदेश, तिथे असणारी जमिनीची सुपीकता कमी होते असे आढळून आले आहे. आपली घटना देखील दुधाळ पशूंचे संवर्धन करावे असे सांगते. गोरक्षण फक्त धार्मिक गोष्टीशी निगडीत नाही, आपले अनेक धर्मातील सिद्धांत विज्ञानाशी जोडले गेले आहेत. नुकताच देशात जीएसटी कायदा लागू झाला असून, एक देश एक कर यामुळे विकासाला चालना मिळेल. जीएसटीच्या माध्यमातून मानव विकास निर्देशांक वाढून रोजगाराच्या संधी निर्माण होतील. यातून देशाचा जीडीपी 4 टक्के वाढण्यास मदत होणार आहे. जीएसटीच्या माध्यमातून देशाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी मदत होणार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.केंद्रीय वित्त राज्यमंत्री मेघवाल म्हणाले, जीएसटीचा सर्वसामान्यांसह सर्वांनाच फायदा होणार आहे. या कायद्याचे आपण सर्वांनी पालन करूया. सर्वसामान्य माणसाचे आयुष्य आनंदी व्हावे, हाच यामागचा हेतू आहे, जीएसटी आपले भविष्य आहे.गुजरातचे मुख्यमंत्री रूपानी म्हणाले, सत्तेच्या माध्यमातून गुणवत्ता आणि अविरत सेवेचे व्रत आम्ही अंगीकारले आहे. मुख्यमंत्री हे पद नसून ती एक जबाबदारी आहे. या पदामुळे मिळालेली प्रतिष्ठा नसून ती परीक्षा आहे. विकासाच्या प्रवाहात शेवटच्या घटकाला सामावून घेण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्नशील आहोत. जगा आणि जगू द्या हे जैन समाजाचे तत्वज्ञान आम्ही आमच्या कार्यातूनही करीत आहोत. गुजरातमध्ये गोरक्षेसाठी कायदा कडक केला आहे. पतंग महोत्सवामध्ये पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी करुणा अभियान राबविले. याप्रमाणेच स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवित आहोत.यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते जिओ भामा पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. जिओ भामा पुरस्काराने निर्मल सेठयाजी, अभय श्रीराम, कांतीलाल राम बिहार, नवनीत परिवारचे बाबूलाल बिहार, नरेशभाई, श्रुतीभाई आदींचा सन्मान करण्यात आला. जैन समाजाच्या वतीने महिला साध्वींच्या श्रमणी विहारम यासाठी 11 कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. जिओ टीमची यावेळी घोषणा करण्यात आली.