शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

‘समृद्धी’विरोधात आता २० जुलैला जेलभरो!

By admin | Updated: July 17, 2017 01:20 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाबाबत शिवसेना सोयीनुसार भूमिका बदलत असल्याची टीका करत जमिनी घेण्यासाठी दडपशाही

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाबाबत शिवसेना सोयीनुसार भूमिका बदलत असल्याची टीका करत जमिनी घेण्यासाठी दडपशाही सुरू असल्याचा आरोप शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी रविवारी केला. ज्यांनी जमिनी दिल्या, ते जमीन खरेदी-विक्री करणारे दलाल असून शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी असल्याचे सांगत खरेदीच्या नावावर ही दिशाभूल असल्याची टीकाही शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केली आणि दडपशाही अशीच सुरू राहिली, तर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागून हा महामार्ग रोखू, असा इशाराही त्यांनी दिला.जमिनी खरेदीला सुरूवात झाल्याचे आणि त्यासाठी ठाण्यात कार्यक्रम झाल्याचे समजताच संतप्त शेतकऱ्यांनी शेतातील आवणीची कामे सोडून महामार्गाविरोधात तातडीची बैठक घेतली आणि २० जुलैला जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला. या जेलभरो आंदोलनाला शहापुरातून सुरूवात करण्यात येईल, असे जाहीर करतानाच या आंदोलनाच्या नेत्यांनी भूमिका बदलणारे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि रस्ते विकास महामंडळाविरोधात निषेधाचा ठरावही मंजूर केला. या बैठकीस शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार, नेते बबन हरणे, गणेश अधिकारी, रामुशेठ अंदाडे, हरिभाऊ खाडे, आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. या बैठकीत समृद्धी महामार्गाला असलेल्या ठाम विरोधाचा पुनरूच्चार करण्यात आला. शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर संताप व्यक्त करण्यात आला आणि पॅकेजऐवजी वाटाघाटी पद्धतीने सुरू असलेल्या जमीन खरेदीच्या सरकारच्या धोरणाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या संदर्भात संघर्ष समितीचे नेते बबन हरणे म्हणाले, सरकार शेतकऱ्यांशी संवाद साधत नाही. ज्यांच्या जमिनी जातात, त्यांना विश्वासात घेत नाही, रेडिरेकनरचे दर काय आहेत, नेमका कसा आणि किती मोबदला देणार , पॅकेज काय याची माहिती न देता दडपशाही सुरू आहे. उलट नेत्यांबद्दल, आंदोलक शेतकऱ्यांबद्दल गैरसमज पसरवण्याचे काम सुरू आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष विनायक पवार यांनी समृद्धी महामार्गाला असलेला विरोध कायम असल्याचा पुनरूच्चार केला. आम्ही सनदशीर मार्गाने विरोध करीत असतानाही सरकारने पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवून आम्हाला अटक केली. परंतु आम्ही डगमगणार नाही. आता आम्ही या महामार्गाविरोधात, सरकारच्या दडपशाहीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पवार म्हणाले. आमदार पांडुरंग बरोरा यांनी या महमार्गाविरोधातील आंदोलनात शेवटपर्यंत शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार असल्याचे सांगितले.