शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

जायकवाडीत ८६ दशलक्ष लिटर रसायने सोडली

By admin | Updated: March 5, 2015 01:24 IST

जायकवाडी धरणात गेल्या चार वर्षांत तब्बल ८६ दशलक्ष लिटर विषारी रसायन सोडल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यांतील सिंचन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जायकवाडी धरणात गेल्या चार वर्षांत तब्बल ८६ दशलक्ष लिटर विषारी रसायन सोडल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मुंबई, गुजरात, ठाण्यातील पाठीराख्यांच्या मदतीने आगा खान, सुमित खांबेकर यांनी विविध कंपन्यांमधील विषारी रसायनाची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट घेतले. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील घातक रसायनांचे ७ टँकर खाम नदीत सोडणाऱ्या टोळीला रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. त्यात दोघांनाही अटक झाली. २००९ पासून हा बेकायदेशीर प्रकार सुरू असून, चार वर्षांपासून जायकवाडीत स्टरलाईटसह ५०० हून अधिक कंपन्यांतील विषारी रसायन सोडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दररोज ६ टँकर रसायनांची विल्हेवाट लावण्यासाठी कंपनीने कंत्राट दिले होते. १० हजार लिटरचे प्रत्येक टँकर आहे. रोज ६० हजार लिटर रसायन खाम नदी पात्रात सोडण्यात आले. महिन्याला १८ लाख लिटर म्हणजेच वर्षाला २ कोटी १६ लाख तर ४ वर्षांत ८ कोटी ६४ लाख लिटर रसायन जायकवाडीच्या दिशेने गेले. १० लाख लिटरचे १ एमएलडी प्रमाणे चार वर्षांत ८६ एमएलडी रसायन पाण्यात मिसळले गेले.