शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरण कोरडेठाक ठेवण्याचा डाव

By admin | Updated: June 13, 2016 04:44 IST

प्रवरा आणि मुळा या उपखोऱ्यांची निर्मिती करून जायकवाडी धरण कोरडेठाक ठेवण्याचा घाट गोदावरी एकात्मिक जलविकास आराखड्यात घालण्यात आला

संजय देशपांडे

औरंगाबाद- प्रवरा आणि मुळा या उपखोऱ्यांची निर्मिती करून जायकवाडी धरण कोरडेठाक ठेवण्याचा घाट गोदावरी एकात्मिक जलविकास आराखड्यात घालण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर ते जायकवाडी धरण या १६० कि.मी. क्षेत्रात गोदावरीचे एकच उपखोरे मंजूर असताना या दोन नव्या उपखोऱ्यांच्या निर्मितीमुळे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदावरीच्या उगमापासून पैठणच्या जायकवाडी धरणापर्यंत एकच ऊर्ध्व गोदावरी उपखोरे मंजूर होते. गोदावरी एकात्मिक जलविकास आराखडा तयार करताना या उपखोऱ्याचे ऊर्ध्व गोदावरी, प्रवरा आणि मुळा, असे त्रिभाजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या कलम ११ सी नुसार उपखोरे हाच समन्यायी पाणीवाटपाचा मूळ घटक गृहीत धरण्यात आला आहे. जायकवाडी धरणापर्यंत एक उपखोरे असेल तरच समन्यायीपद्धतीने पाणी मिळण्याचाहक्क मराठवाड्याला पोहोचतो,असा निवाडा जलनियमन प्राधिकरणाने १९ नोव्हेंबर २०१४ रोजी दिलेला आहे. अशा परिस्थितीत तीन उपखोऱ्यांमुळे समन्यायी पद्धतीने गोदावरीचे पाणी मिळण्याचा मराठवाड्याचा हक्क आपोआप संपुष्टात येईल, असे या क्षेत्रातील माहितगार सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>नव्या उपखोऱ्यांमुळे होणार काय?समन्यायी पाणी तत्त्वानुसार जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्यानंतर ऊर्ध्व भागातील धरणे १०० टक्के भरता येतील. जायकवाडी धरण ३३ टक्के भरल्यानंतर ऊर्ध्व धरणात ५० टक्के पाणी साठविता येईल. मुळा व प्रवरा या दोन नव्या उपखोऱ्यांच्या निर्मितीमुळे मराठवाड्याला हक्काचे पाणी मागता येणार नाही. तसेच जायकवाडीत पाणी सोडण्याचे या उपखोऱ्यांना बंधन राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.मेंढेगिरी यांचा राजीनामागोदावरी एकात्मिक जल आराखड्यावर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या सल्लागारपदाचा हिरालाल मेंढेगिरी यांनी राजीनामा दिला आहे. ऊर्ध्व गोदावरी उपखोऱ्याचे त्रिभाजन करण्याच्या निर्णयावरून मतभेद झाल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.ऊर्ध्व गोदावरी खोऱ्याचे त्रिभाजन करण्याचा निर्णय चुकीचा आहे. गोदावरी एकात्मिक जल आराखड्याच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत मी त्यावर आक्षेपदेखील घेतला होता. त्रिभाजनामुळे भविष्यात मराठवाड्याच्या अडचणी वाढू शकतात.