शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

जायकवाडी धरण कोरडेठाक ठेवण्याचा डाव

By admin | Updated: June 13, 2016 04:44 IST

प्रवरा आणि मुळा या उपखोऱ्यांची निर्मिती करून जायकवाडी धरण कोरडेठाक ठेवण्याचा घाट गोदावरी एकात्मिक जलविकास आराखड्यात घालण्यात आला

संजय देशपांडे

औरंगाबाद- प्रवरा आणि मुळा या उपखोऱ्यांची निर्मिती करून जायकवाडी धरण कोरडेठाक ठेवण्याचा घाट गोदावरी एकात्मिक जलविकास आराखड्यात घालण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर ते जायकवाडी धरण या १६० कि.मी. क्षेत्रात गोदावरीचे एकच उपखोरे मंजूर असताना या दोन नव्या उपखोऱ्यांच्या निर्मितीमुळे मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गोदावरीच्या उगमापासून पैठणच्या जायकवाडी धरणापर्यंत एकच ऊर्ध्व गोदावरी उपखोरे मंजूर होते. गोदावरी एकात्मिक जलविकास आराखडा तयार करताना या उपखोऱ्याचे ऊर्ध्व गोदावरी, प्रवरा आणि मुळा, असे त्रिभाजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या कलम ११ सी नुसार उपखोरे हाच समन्यायी पाणीवाटपाचा मूळ घटक गृहीत धरण्यात आला आहे. जायकवाडी धरणापर्यंत एक उपखोरे असेल तरच समन्यायीपद्धतीने पाणी मिळण्याचाहक्क मराठवाड्याला पोहोचतो,असा निवाडा जलनियमन प्राधिकरणाने १९ नोव्हेंबर २०१४ रोजी दिलेला आहे. अशा परिस्थितीत तीन उपखोऱ्यांमुळे समन्यायी पद्धतीने गोदावरीचे पाणी मिळण्याचा मराठवाड्याचा हक्क आपोआप संपुष्टात येईल, असे या क्षेत्रातील माहितगार सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>नव्या उपखोऱ्यांमुळे होणार काय?समन्यायी पाणी तत्त्वानुसार जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्यानंतर ऊर्ध्व भागातील धरणे १०० टक्के भरता येतील. जायकवाडी धरण ३३ टक्के भरल्यानंतर ऊर्ध्व धरणात ५० टक्के पाणी साठविता येईल. मुळा व प्रवरा या दोन नव्या उपखोऱ्यांच्या निर्मितीमुळे मराठवाड्याला हक्काचे पाणी मागता येणार नाही. तसेच जायकवाडीत पाणी सोडण्याचे या उपखोऱ्यांना बंधन राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.मेंढेगिरी यांचा राजीनामागोदावरी एकात्मिक जल आराखड्यावर शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या सल्लागारपदाचा हिरालाल मेंढेगिरी यांनी राजीनामा दिला आहे. ऊर्ध्व गोदावरी उपखोऱ्याचे त्रिभाजन करण्याच्या निर्णयावरून मतभेद झाल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.ऊर्ध्व गोदावरी खोऱ्याचे त्रिभाजन करण्याचा निर्णय चुकीचा आहे. गोदावरी एकात्मिक जल आराखड्याच्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत मी त्यावर आक्षेपदेखील घेतला होता. त्रिभाजनामुळे भविष्यात मराठवाड्याच्या अडचणी वाढू शकतात.