शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

जय जवान, जय किसान धोरणाला सरकारचा हरताळ !

By admin | Updated: April 26, 2017 17:39 IST

शिवसेनेच्या मंत्र्यांइतके पुचाट मंत्री झाले नसल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 26 - केंद्र व राज्यातील सरकारने जय जवान, जय किसान या धोरणालाच हरताळ फासला असून, राज्याच्या इतिहासात आजवर शिवसेनेच्या मंत्र्यांइतके पुचाट मंत्री झाले नसल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या मागणीसाठी निघालेल्या विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेदरम्यान बुधवारी सकाळी सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तत्पूर्वी संघर्ष यात्रेतील प्रमुख नेत्यांनी दिवंगत लोकनेते व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मारकावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर विखे पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू असिम आझमी आदी प्रमुख नेतेही उपस्थित होते.याप्रसंगी विखे पाटील यांनी बुधवारच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या दोन बातम्यांचा संदर्भ देत सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये झालेला नक्षलवादी हल्ला हे गुप्तचर विभागाचे अपयश असल्याची कबुली वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. काश्मीरपासून छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यापर्यंतच्या असंख्य घटना स्वयंघोषित राष्ट्रभक्त सरकारच्या कर्तबगारीची गाथा सांगण्यास पुरेशा आहेत.दुसरीकडे राज्य सरकारने 22 एप्रिलपर्यंत टोकन मिळालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे जाहीर केले. ही घोषणा तर अशी केली की, जणू ते शेतकऱ्यांवर उपकारच करत आहेत. 22 एप्रिल ही तर मुदतच होती. तोपर्यंत आलेली तूर खरेदी करणे सरकारचे कर्तव्यच आहे. पण प्रश्न 22 एप्रिलपर्यंत आलेल्या तुरीचा नाही, तर त्यानंतरही शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या हजारो क्विंटल तुरीचा आहे, याकडे लक्ष वेधून राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,  नक्षलवादी हल्ल्याबाबत लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेली कबुली आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबत सरकारची अनास्था पाहिली तर या सरकारने जय जवान, जय किसान या धोरणाला हरताळ फासल्याचे स्पष्ट होते. राज्यातील तूर खरेदीचा प्रश्न पेटलेला असताना मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. राज्यातील शेतकऱ्यांना अपेक्षा होती की, तूर खरेदीची मुदतवाढ केली जाईल. पण सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. तूर खरेदी प्रकरणी झालेल्या गोंधळासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याची माफी मागावी तर कृषि व पणन मंत्र्यांनी राजीनामे द्यायला हवेत, अशी मागणी विखे पाटील यांनी केली.तूर खरेदीबाबत शिवसेनेच्या मंत्र्यांनी असा आव आणला की, ते जणू मंत्रिमंडळाच्या बैठकीत भांडण करून तूर खरेदीची मुदत वाढवून घेणार आहेत. परंतु आपल्या खासदाराच्या विमानप्रवासासाठी संसदेत केंद्रीय मंत्र्यांच्या अंगावर धावून जाणारी शिवसेना कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांसाठी भांडायला तयार नाही. राज्याच्या इतिहासात शिवसेनेच्या मंत्र्यांइतके पुचाट मंत्री आजवरच्या कोणत्याही मंत्रिमंडळात झालेले नाहीत, असा घणाघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरही त्यांनी यावेळी तुफानी हल्लाबोल केला. शिवसेनेप्रमाणेच स्वाभिमानी शेतकरी संघटनाही सरकारमध्ये राहून सरकारवरच टीका करण्याचा ढोंगीपणा करत आहेत. या ढोंगीपणात उद्धव ठाकरे बडे मियाँ असतील तर खा. राजू शेट्टी छोटे मियाँ आहेत. खा. राजू शेट्टींनी आपल्या संघटनेच्या नावातून स्वाभिमानी हा शब्द काढून टाकला पाहिजे. त्यांच्या कथनीला आणि करणीला स्वाभिमानी हा शब्द शोभत नाही, या भाषेत विखे पाटील यांनी खा. राजू शेट्टींचा समाचार घेतला.कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरही त्यांनी अनेक प्रहार केले. मंत्रिमंडळात जाऊन सदाभाऊ खोतांना भाजपच्या इव्हेंट मॅनेजमेंटची लागण झाली आहे. मध्यंतरी त्यांनी आठवडी बाजार भरवून भाजी विकण्याचा स्टंट केला. पण वर्तमानपत्रांमधून बातम्या छापून आल्यानंतर खोत आठवडी बाजारांनाही विसरले अन् शेतकऱ्यांनाही विसरले. जनता ज्या वेगाने डोक्यावर घेते, दुप्पट वेगाने खाली आपटते, हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ध्यानात ठेवावे, असा सूचक इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा आणखी एक सनदशीर प्रयत्न म्हणून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी शेतकरी कर्जमाफी व हमीभावाच्या मागणीसाठी ग्रामसभेत ठराव करून ते सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन देखील विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केले. दरम्यान, बुधवारी दुपारपर्यंत संघर्ष यात्रेच्या कवठेमहांकाळ, तासगाव येथे जाहीर सभा झाल्या. सांगलीवरून निघाल्यानंतर अनेक ठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले व कर्जमाफीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कवठेमहांकाळ येथे सर्व प्रमुख नेत्यांची बैलगाडीतून मिरवणूक निघाली.