शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील माणूस संवेदनशीलता हरवून बसला म्हणणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 03:18 IST

वर्षानुवर्षे गावासाठी काम करणाऱ्यांचा जाणीवपूर्वक केलेला सत्कार म्हणजे सतत गावासाठी काम करणाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानणेच आहे.

रोहा : वर्षानुवर्षे गावासाठी काम करणाऱ्यांचा जाणीवपूर्वक केलेला सत्कार म्हणजे सतत गावासाठी काम करणाऱ्यांचे गावाच्या वतीने आभार मानणेच आहे. सन्मानासाठी ती व्यक्तीच कारणीभूत असते असे नाही तर तो प्रातिनिधिक स्वरूपात असतो. नामच्या कामात गावागावातून कुठलीही अपेक्षा न ठेवता, सन्मानाची अपेक्षा न ठेवता काम करणारे खरे हीरो आहेत. सुमारे ५८० कि.मी. खोलीकरण, लांबीकरण व रुंदीकरणाचे काम केवळ दहा कोटीच्या लोकांमधून आलेल्या पैशातून झाले. शहरातील लोकांनी गावासाठी पैसे दिलेले आहेत म्हणूनच शहरातील सगळ्या धकाधकीत माणूस संवेदना हरवून बसलाय असे म्हणणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी रोहा येथे केले.रोहा शहर राष्ट्रवादीच्या वतीने रोहा अष्टमीमधील विविध क्षेत्रातील मान्यवरांना रोहा मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी ज्येष्ठ सिने अभिनेते नाना पाटेकर बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे होते. मी अजूनही आईकडे राहतो असं सांगत तिच्या बोलण्यातलं मार्दव जास्त आवडतं. सतत समुद्र लहानपणी समोर दिसला, त्याची गाज, विशालपण, अजस्त्रपण पाहिल्याने कधीही मनात छोटे विचार आले नाहीत, त्यामुळे प्रतिकूल स्थितीतही केवळ अभिनयाचं नाणं खणखणीत असल्याने टिकू शकलो. अमर्यादित काम करायला गेलं की आपण ओव्हर एक्सपोज होतो, समाजासाठी केलेले काम एक्सपोज होणे गरजेचे असते तेवढे आपण फुलत जातो. कितीही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयपुरस्कार मिळाले तरीही आज नामच्या माध्यमातून काम करताना जे समाधान मिळतेय ते सर्वात जास्त आहे, असे नाना पाटेकर यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या वतीने नाना पाटेकर, आमदार सुनील तटकरे यांना सन्मानपत्र दिले. निखील दाते यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. डॉ. चिंतामणराव देशमुख सभागृहात झालेल्या या कार्यक्र माला दीड हजार रोहेकर उपस्थित होते. (वार्ताहर)>समाजात संवेदना निर्माण के लीआमदार सुनील तटकरे यांनी ज्या गावानं मला घडवलं त्या गावाला गाव म्हणून घडवणाऱ्यांचा सन्मान करण्याची ही संधी मिळाल्याचे सांगून नाम संस्थेच्या माध्यमातून समाजाबरोबरच सरकारच्या मनातही संवेदना निर्माण करण्याचे काम नाना पाटेकरांनी केल्याचे सांगितले.नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत साळुंखे यांनी नाम संस्थेची महती सांगणारी कविता सादर केली.>पुरस्कार विजेतेकार्यक्र मात किशोर सोमण, गजानन मळेकर, डॉ. नंदकुमार पेंडसे, रवींद्र ढवळे, जाफरखान देशमुख, अहमद नुराजी, कलाब जनाब, अस्मिता सुर्वे, कुमार देशपांडे, मानसी चाफेकर, यशोदा धाटावकर, शैलेश साळुंखे, रमेश गुडेकर, बबन सोलंकी, रजनीकांत शहा, गिंडी काका, रमेश साळवी यांना रोहा मित्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.