शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

बालभारतीचे अस्तित्व संपवणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 21:22 IST

राज्य शासनाने बालचित्रवाणीपाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’चे अस्तित्व संपवण्याचा घाट घातला आहे.

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. 30- राज्य शासनाने बालचित्रवाणीपाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात ‘बालभारती’चे अस्तित्व संपवण्याचा घाट घातला आहे. गेल्या 50 वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणा-या बालभारतीचे अधिकार अचानकपणे कमी करणे चूकीचे असून पुढील काळात त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते,असे मत बालभारतीच्या माजी संचालकांकडून व्यक्त केले जात आहे.

शासनाने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे नामकरण ‘विद्या प्राधिकरण’असे केले असून बालभारतीचे पुस्तक निर्मितीचे काम काढून विद्या प्राधिकरणाकडे दिले आहे. त्यामुळे 50 वर्षांपासून दर्जेदारपाठ्यपुस्तक निर्मिती करणारी बालभारती संस्था केवळ पुस्तक छपाई करणारा छापखाना म्हणूनच काम पाहणार आहे. बालभारतीमधील कर्मचा-यांची नियुक्ती विद्या प्राधिकरणामध्ये केल्याने आणि कामाचा भार कमी होणार असल्याने कालांतराणे बालभारतीचे अस्तिवच संपणार आहे. बालभारतीला अभ्यासक्रम निर्मितीसाठी स्वयत्तता होती. पहिली पासून दहावी-बारावीपर्यंतचे अभ्यासक्रम व पाठ्य पुस्तक निर्मितीचे काम एकाच संस्थेकडे आले तर त्यातून अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बालभारतीचे अधिकार कमी करू नयेत,अशी भूमिका बालभारतीचे माजी संचालक डॉ.वसंत काळपांडे ,एम.आर. कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 
काळपांडे म्हणाले, बालभारती 1967 पासून स्वतत्त संस्था म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.  बालभारती 50 वर्ष पूर्ण करत असून याच वर्षी संस्थेचे अधिकार कमी करणे दूर्दैवाचे आहे.अनुभवी कर्मचारी व तज्ज्ञ व्यक्तींमुळे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतची पुस्तके चांगल्या पध्दतीने काढली जात होती. बालभारतीकडून नुकतेच प्रसिध्द केलेले इयत्ता सहावीचे पुस्तकही चांगले असून त्याचे कौतुक होत आहे. एकूणच बालभारती चांगले काम करत असल्याने आणि संस्थेतकडे काम करण्याची क्षमता असल्याने नववीच्या पुस्तकाचे कामही देण्यात आले होते. बालभारती आपले 50 वर्षेपूर्ण करत असल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शिक्षण मंत्र्यांनी ही संस्था आपले शताब्दी वर्ष साजरे करील,असे आपल्या मनोगतात सांगितले होते.मात्र,अधिकार कमी करून बालभारतीकडे पुस्तकांची छपाई करणारा कारखाना म्हणून काम सोपवणे चूकीचे आहे.
एम.आर.कदम म्हणाले, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ ही संस्था ज्या उद्देशाने स्थापन करण्यात आली तो उद्देश मागे पडत आहे. पुस्तक निर्मितीसाठी स्वायत्तता असणे गरजेचे आहे. दुस-या संस्थेकडे स्वायत्तता असणार नाही.त्यामुळे दर्जेदार पुस्कनिर्मिती व प्रश्नपत्रिका तयार होतील का? याबाबत साशंकता आहे.