शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

‘त्या’ बेपत्ता युवकांबाबत पूर्ण चौकशी होईपर्यंत बोलणे अयोग्यच

By admin | Updated: July 18, 2014 02:49 IST

इराकमधील धार्मिक यात्रेसाठी ४० जण गेले होते. त्यातील ३६ जण परत आले असून कल्याणातील ४ युवक बेपत्ता झाले आहेत.

ठाणे : इराकमधील धार्मिक यात्रेसाठी ४० जण गेले होते. त्यातील ३६ जण परत आले असून कल्याणातील ४ युवक बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या पालकांनी याबाबत तक्रार केली आहे. त्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत भाष्य करणे अयोग्य आहे. हे प्रकरण समोर ठेवून मुंब्रा आणि भिवंडीतून अन्य मुलेही बेपत्ता झाल्याची काही वृत्ते येत आहेत. ती चुकीची असून त्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. याबाबत वृत्त देताना प्रसारमाध्यमांनी भान बाळगावे, असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी व्यक्त केले. ते ठाण्यात ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’च्या उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना केले.ठाणे शहर पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’चा शुभारंभ गृहमंत्र्यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे झाला. या वेळी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आमदार निरंजन डावखरे, ठाणे पोलीस आयुक्त विजय कांबळे, ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता, अभिनेते सुनील शेट्टी, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. रवींद्र सिंगल, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) ज्ञानेश्वर फडतरे आदी वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या वेळी बोलताना, हे युनिट राज्याला नाहीतर देशाला मार्गदर्शक ठरेल, असे काम करण्याच्या सूचना ठाणे पोलिसांना त्यांनी केल्या आहेत. ठाणे शहर बालकामगार व अत्याचारमुक्त झाल्यास त्याला नवीन ओळख मिळेल आणि देशातील पहिले शहर ठरेल, असेही त्यांनी सांगितले. तसेच काम करण्यास लहान मुलांना चटके देणाऱ्यांवर दंडुके चालवावे, त्याचबरोबर व्यवस्थापकांना पकडण्याबरोबरच त्यांच्या मालकांनाही पकडण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. विशेष बालकल्याण विभागाचे बजेट कोट्यवधींच्या घरात असतानाही राज्यातील सुधारगृहांची अवस्था दयनीय असल्याची खंतही व्यक्त केली. राज्यात चांगली पोलीस यंत्रणा समाजाला पाहण्यास मिळावी, यासाठी तीन प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. त्यासाठी ठाणे, मुंबई आणि पुण्याची निवड केली असून त्यानंतर औरंगाबाद, नागपूरची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार, समस्या लक्षात घेऊन तेथील सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे सुरक्षित राज्य म्हणून पुन्हा महाराष्ट्राची ओळख निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)