शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

सामंजस्याने वाद सोडवणे शक्य आहे का?

By admin | Updated: February 6, 2016 03:30 IST

रेमण्ड ग्रुपचे अध्यक्ष विजयपथ सिंघानिया आणि त्यांच्या चार नातवंडांमध्ये पूर्वजांच्या संपत्तीवरून सुरू असलेला वाद सामंजस्याने सोडवणे शक्य आहे का? अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने हा वाद

मुंबई : रेमण्ड ग्रुपचे अध्यक्ष विजयपथ सिंघानिया आणि त्यांच्या चार नातवंडांमध्ये पूर्वजांच्या संपत्तीवरून सुरू असलेला वाद सामंजस्याने सोडवणे शक्य आहे का? अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने हा वाद मध्यस्थी करून सोडवण्याची सूचना दोन्ही पक्षांच्या वकिलांना केली.विजयपथ सिंघानिया यांचा मुलगा मधुपती सिंघानिया यांच्यात वाद झाल्याने मधुपती आणि त्यांच्या पत्नी अनुराधा सिंघानिया यांनी १९९८मध्येच पूर्वजांच्या संपत्तीमधील हिस्सा सोडून सिंगापूरला स्थायिक झाले. मात्र त्यांची चार मुले अनन्या (२६), रसलिका (२६), तारिनी (२०) आणि मुलगा रैवथरी (१८) यांनी पूर्वजांच्या संपत्तीत त्यांना हिस्सा मिळावा, यासाठी विजयपथ सिंघानिया यांना उच्च न्यायालयात खेचले आहे.याचिका प्रलंबित असेपर्यंत संबंधित संपत्तीवर तिसऱ्या पक्षाचे अधिकार निर्माण करण्यास स्थगिती द्यावी. तसेच आतापर्यंत सिंघानिया यांच्याकडे असलेल्या संपत्तीची यादी जाहीर करावी, अशी अंतरिम मागणी चारही नातवंडांनी उच्च न्यायालयात केली. मात्र २१ आॅगस्ट २०१५ रोजी उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने नातवंडांना दिलासा देण्यात नकार दिला.त्या आदेशाविरुद्ध चारही नातवंडांनी हायकोर्टाच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. रेवती मोहिते - ढेरे यांच्या खंडपीठापुढे होती.खंडपीठाने २१ आॅगस्टचा निर्णय योग्य ठरवत अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. ‘या टप्प्यावर एकसदस्यीय खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही,’ असे म्हणत न्या. कानडे यांनी या याचिकेवरील अंतिम सुनावणी ६ एप्रिल रोजी ठेवली.आतापर्यंत हे प्रकरण मध्यस्थी करून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला का? अशी विचारणा खंडपीठाने केल्यावर नातवंडांची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकिलांनी हे प्रकरण सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करू, असे म्हटले.‘आजोबांनी नातवंडांसाठी थोडा स्नेह दाखवावा. बघू या, कोण माघार घेतं?’ असे म्हणत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी ६ एप्रिल रोजी ठेवली. (प्रतिनिधी)